अद्रुश्य भावनांचे,
अस्तित्व जाणवावे.
विसरुनी या जगाला,
तुजला मिठीत घ्यावे.
स्पंदनांनी ही मग,
वेगळे नसावे.
असल्या एका क्षणाचे,
मी काय मोल द्यावे.
असता जवळ तूची,
इतरत्र क्षुद्र आहे.
बिन तू चातक हा मी,
तव-वृष्टी वाट पाहे.
आठवणी तुझ्याच,
एकेक गोड आहे.
या कोरड्या निशांना,
तुझीच ओढ आहे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1932
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा!
सुंदर.....
छान आहे
सूंदर
मस्त गुंफण...।
मस्तच