Skip to main content

मनातलं सांगताच येईना ...

लेखक जेनी... यांनी शुक्रवार, 09/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दाशब्दांवर तुझा हक्क मला नाकारता येईना अक्षरांची जुळवणी अर्थाचा अनर्थ करतेय ... वेदनेची बारीक कळही मला दाखवता येईना भरत आलेल्या जखमांचीच परत खपली निघतेय ... नातं होतंच कुठे? पण जे होतं ते मला आता निभवता येईना श्रावणातल्या सरींनी भिजूनही कोरडेच थेंब पुसतेय ... आठवणींची पानं पलटली तरी अजिबातच आवाज होईना कधीतरी तुला आठवण येईल आसवांची समजुत घालतेय ...
लेखनविषय:

वाचने 4700
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

In reply to by जेनी...

भावनांमध्ये वेगळेपणा वाट्टोय. जसं की पहिल्यांदा बुवा आणि बाई एकत्र आहेत नंतर मात्र लांब राहतायत किंवा म्हातारी एकटी उरलीये टाईप. वाईट किंवा चांगलं असं काही नाही. कविता वाचल्यावर एकदम काहीतरी मिसींग असल्यासारखं. (मला कवितांमधलं फारसं ज्ञान नाही हेही आहेच.;))

In reply to by रेवती

कवितांमधलं फारसं ज्ञान मलाही नाही, पण सदर कविता वाचल्यावर काहीतरी 'टच' करून जातं , एवढं मात्र खरं !

पण,
वेदनेची बारीक कळही मला दाखवता येईना भरत आलेल्या जखमांचीच परत खपली निघतेय ...
जम्या नाही. धन्यवाद.

चौथ्या ओळीत यमक आहे आणि भावना आहेत. मुक्त ही नाही आणि मीटर मध्ये ही नाही.

आठवणींची पानं पलटली तरी अजिबातच आवाज होईना कधीतरी तुला आठवण येईल आसवांची समजुत घालतेय ...
अशा वेड्या समजुतीच कधी कधी उद्यावर विश्वास ठेवायला लावतात. कधी ना कधी ही वेदना जिथून आली तिथे पोचती होईल, याची वाट पाहायला लावतात.

आसवान्चि समजुत घालतेय --हि भावना आवदली

ठाकून ठोकून कविता केली आहे असं वाटलं. म्हणजे मुद्दाम वेगळं काही करायच्या प्रयत्नात लय पण आली नाही आणि रेवतीने म्हटल्यासारखं एकसंध परिणाम वाटला नाही. चमत्कृतीपूर्ण शब्दरचना करण्याच्या नादात अर्थाकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. पूजा आज्जे, एवढं कडक लिहिल्याबद्दल "सॉरी" म्हणते. पण खरोखरच बात कुछ जमी नहीं. तू याहून खूप चांगली कविता लिहू शकतेस हे माहिती असल्यामुळेच जे वाटलं ते सपष्ट लिहिलं आहे.

प्रयत्न चांगलाच आहे पण आजच्या युवा पिढीने असे देवदासछाप काही लिहिले की मला तरी बरे वाटत नाही. पण कलेचा एक प्रकार म्हणून ठिक आहे. पूजा एखादे रोखठोक, सकारात्मक, प्रेरणादायी काव्य येऊदे...

शीर्षक एकदम परफेक्ट. नाय आलं तुला सांगता. :( काय होतं, काय आहे हे कळत नाहीये बिल्कुल :( कुठलीतरी वेदना आहे पण ती सुध्दा कशाची आहे कळले नाही.

In reply to by अभ्या..

एक्झॅटली .अब्या .. म्हणुनच हे नाव दीलं कवितेला . नेमकं जे वाटतय ते मांडताच आलं नाहि ... च्यामारी ..मनातलं सांगताच येईना :-/ असो ,कविला\कवयित्रिला परिक्षकांच्या योग्य परिक्षणाची खरच गरज असते , त्याशिवाय त्याला\तिला कविता फुलवायला इंटरेस्ट येत नाहि . आपणच लिहुन आपणच वाचुन चांगलं वाईट म्हणन्यात अज्जिब्बात मज्जा नसते . त्यातल्या चुका ,चांगलं ,वाईट ,पोचलेल्या भावनांची पोचपावती ह्या सगळ्याच गोष्टी वाचकांकडुन ऐकन्यात मजा .. सगळ्यांना धन्यवाद ......! :)

कविता एकदम शुद्ध आणि प्रतिसाद पूजा स्टाईलमधे...
चांगलं वाईट म्हणन्यात, वाचकांकडुन ऐकन्यात मजा
अर्थात, या ओळी मस्त जमल्या आहेत :
अक्षरांची जुळवणी अर्थाचा अनर्थ करतेय ...
नातं होतंच कुठे? पण जे होतं ते मला आता निभवता येईना
आठवणींची पानं पलटली तरी अजिबातच आवाज होईना
आणि या ओळी एकदम खल्लास!
कधीतरी तुला आठवण येईल आसवांची समजुत घालतेय ...
कवितेचं मीटर आणि फ्लो बरोबर आहे

In reply to by जेनी...

पू ssssssssssss.... सुन्दर टची कविता!!...
आठवणींची पानं पलटली तरी अजिबातच आवाज होईना कधीतरी तुला आठवण येईल आसवांची समजुत घालतेय ...
अ प्र ति म ! ! ! :) आवडली कविता!!! :)