Skip to main content

काय चुकतंय ?

लेखक वैशाली . यांनी रविवार, 03/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
हि कायाच नकोशी झालीये आता.. वाटतंय सगळी काढून टाकावी ह्या मनावरून.. तसंच हे आयुष्य!! ह्यात नेमका कसूर तो कुणाचा ?? आज काढला राग त्या आईन्यावर.. माझी मीच नावडले मला.. आज परत वाटून गेलं.. कि काहीतरी चुकतंय.. कळत नाहीये पण काहीतरी वेगळं चाललंय.. मी जे आता दुखाचे हुंकार गातेय ते चुकीचे कि कधी सुखात चिंब भिजायचे ते चुकत होतं.. हि आजची मानसिक कुरूपता चुकीची कि कधी वाटून गेलेली सुंदरता... चुकीचा तो ओला श्वास कि तो ओला गंध मदिर? ते जत्रेत हरवलेला पोर चुकलं होतं कि दोष त्या सुसाट वाऱ्याचा होता .. मी आज फुकट बसलेय ते चुकतंय कि ह्याआधी १२-१२ तास काम करायचे ते चुकत होतं.. आज उगीच कुणावर जीव भाळावं वाटलं हे चुकलं, कि आधी झालेला प्रेमभंग चुकिचा? त्या अथक प्रयत्नांना आलेला अपयश चुकीचं कि ते प्रयत्नच चुकीचे ! कालचा दिवस जाता जाता मला हूर हूर लावून गेला .. रखरखीत वाटला होतं.. आज तोच मला सुंदर वाटतोय!! मग चुकतंय कुठे ?? नक्की चुकतं आहे ना ???
लेखनविषय:

वाचने 2678
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

:) छान

कायतरी चुकल आहे हे नक्की.... ;) आयुष्याच गणित हे बरेचदा चुकलेलच असतं.. :) अन जे उत्तर मिळत तेच बरोबर आहे अस मानायच असत.. :) बाकी छान आहे.....

@मग चुकतंय कुठे ?? नक्की चुकतं आहे ना ??? >>> अश्याच अजुन २/४ कविता लिहा,सगळं बरोब्बर वाटायला लागेल. ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

@मग चुकतंय कुठे ?? तुमच्या समोर व्यक्त केलं हेच चुकलं ,आता सुधारतील पुढ्च्या वेळेला... :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

आयुष्याच गणित हे बरेचदा चुकतच . पण पुन्हा पुन्हा आपण आयुष्याच गणित आयुष्याचा सारिपाठ मांडायचा असतो. बाकी कविता छान आहे. रघू

इथे उत्तरं देणारे एकसोएक आहेत पण तुम्हाला प्रॉब्लमच आयडेंटिफाय करता येत नसेल तर कठीण आहे >P.S. : इस घटना के सभी पत्र काल्पनिक है !! इस घटना का किसीभी जीवित या मृत व्याक्तिसे कोई लेना - देना नहीं !! ही सही आहे की डिस्क्लेमर? का सगळंच "असच कहितरि" मग "काय चुकतंय ?" कुणाला विचारताय?

कवितेच पहिल वाक्य की ओळ म्हणुया? जे काय असेल ते खुप छान, पण पुढे विस्तार नाही जमला एव्हढा. तरीही.....एका वाक्यावरुन अपेक्षा वाढल्यात म्हणेन मी.

In reply to by वैशाली .

टुकार कश्या करता? मला पहिली ओळ अतिशय भावली. मनावरच शरीर उतरवण ही कल्पना अतिशय भावनात्मक आहे. झालय एव्हढच की त्या पुढ थोडा वेळ देउन मग लिहिल असत तरी चालल असत. एकदा अशीच अडकले होते. मग एका जाणत्या व्यक्तीकड संताप व्यक्त केला. तर त्यांनी सांगितला, "फिटे अंधाराचे जाळे .." या काव्याच्या पुर्णतेचा काळ. 'रान जागे झाले सारे..' या अंतरा नंतर दुसरा अंतरा सुचायला तब्बल सहा महिने लागले, अन तेव्हढे देउन हे काव्य पुर्ण केल गेल. ही गोष्ट लक्षात घेउन मी जेंव्हा जेंव्हा हे गाण ऐकते , तेंव्हा तेंव्हा पुन्हा नव्यान सलामी जाते.

फार आशेने धागे उघडतोय. हेच बहूदा चुकतंय.

In reply to by परिकथेतील राजकुमार

डायर्‍या आहेत ना शिल्लक?

असा आरशात बघून वैफल्य जाणवण्याचा एक प्रसंग 'फॅशन' मध्ये आहे. तो अंगावर येतो खूप.