काय करावे मन तळमळते !
लेखनविषय:
काव्यरस
साधे सोपे सहज शब्द ते
एकापुढती एक ठेवले ,
कांगावा काही ना करता
निमुटपणे ते कविता बनले !
याला तुम्ही कविता म्हणता ?
-उसळुन सारे धावत आले ,
शांतच होती माझी कविता
घाव किती अंगावर पडले !
अगम्य असभ्य शब्द कोषिचे
एकापुढती एक ठेविले ,
डोक्यावरती घेऊन सारे
कविता सापडली म्हणाले !
ही कविता की ती कविता मज
अजूनही पुरते ना कळते ,
भीत रहावे - लढत रहावे -
काय करावे मन तळमळते !
वाचने
1592
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
चमचमीत मसालेदार बुफे ते
एकापुढती एक ठेवले
कांगावा काही न करता
निमुटपणे ते मी रिचविले!
याला तुम्ही जेवण म्हणता
उसळुन सारे वरती आले ,
तरी शांतच होतो मी वरवरी
जठरात ते डचमळले तरी!
अगम्य अनंत ते मसाले
एकामध्ये अनेक मिसळीले
पोटात होवुनी कालव सारे
पित्त वाढले असे म्हणाले!
हा पदार्थ की तो पदार्थ
खावू किती ते ना कळते
उपाशी राहावे-चरतच राहावे
काय करावे पोट मळमळते!
In reply to छान कविता by प्रचेतस
हसुन फुटलो!! 

छान कविता आहे. आवडली. संदेश पोहोचला.
प्रसिद्धीचे निकष बदलत असले तरी गुणवत्तेचे निकष कसे बदलतील, नाही का? तेंव्हा, तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे! :)
In reply to छान! by मेघवेडा
ये लगा मेवे का सिक्सर !! खरंच तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. त्याही पुढे चित्ती असू द्यावें समाधान. ;)
छान कविता