मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सोनेरी पानं

निनाव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सोनेरी पानं उगीच का होतात सोनेरी ? हिरवाईचे दिवस जपतात ते कितीतरी अखेर गळतात.. एक दिवस ते ही स्वागत पडुन नव्याचे करतात तरुणाई चे जल्लोषात आगमन मग करते फुटलेले नवे कोंब मुसमुसलेले वळते अखेर त्यांचे ही वय एक दिवस अटळ सत्यच ते सांगुन जातात सोनेरी झाले म्हणून नव्याची नाही अवहेलना अवमानात नाही कुठलीच प्रेरणा उन-पावसाचे वाचलेच संपुर्ण पुस्तक न बोलता बरेच काही सांगुन जातात ती सोनेरी पानं.

वाचन 1106 प्रतिक्रिया 0