Skip to main content

समर्थ रामदासांनी वन-बागा निर्मितीसाठी केलेले काव्य...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 02/03/2011 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, खालील फोटो पहाण्यात आला. त्यातील संत रामदासांनी परळीच्या मठस्थापने करता बागा व वने निर्माण करण्यासाठी विविध २६० ( प्रत्येक ओवीत सरसकट १० नावे असे धरले तर २६ ओव्यात) झाडांची माहिती देऊन केलेले मार्गदर्शन रंजक वाटले. मिसळपावच्या खाऊभाऊंना हा काव्य-फलाहार आवडेल. त्यातील सध्या ज्ञात नसलेल्या वनस्पतींची माहिती काही मिपाकर देतील तर काहींना त्यातील दुर्मिळ वनस्पतींचे फोटो सादर करायला प्रेरणा मिळेल असे वाटून डॉ. आमट्यांच्या हेमलकशाला भेट देताना त्यातील एका बागेत उमानेनेंच्या नातलगांनी टिपलेले चित्र त्यांच्या संमतीने सादर. " alt="" />
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3902
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

:) समर्थांची खूप सुन्दर रचना! :) स्वगत : ह्म्म! तरीच पूर्वी "लाल महाला" भोवती खूप सारे औषधी वनस्पती होते... अनेक फळबागा, फुलबागा होत्या... असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते! ;) ;) पण पुढे पेशव्यांनी शनवारवाडा थोडासा "एक्सटेन्ड" केला.. तेव्हा त्या लाल महाला'च्या बागांमधले काही प्लॅन्ट्स त्यांनी ऑफिशियली "अ‍ॅडॉप्ट" केले.. जे की आजही शनवारवाड्याच्या दुसर्‍या मजल्यावरच्या बागेत पाहायला मिळतात! ;) जय जय रघुवीर समर्थ! ओम नम: शिवाय | :)

खरोखर उत्तम माहिती दिली ओक काका तुम्ही. समर्थांनी हा विदा गोळा करायला अन तो काव्यबद्ध करायला किती मेहनत घेतली हे कळून येते. शेवटी त्यांचा विनयही किती मोठा आहे बघा : "अल्प बोलिलो श्रोतीं | क्षमा केली पाहिजे ||" असल्या समर्थाचरणी वंदन. जय जय रघुवीर समर्थ ||

सुंदर माहिती! समर्थांना बागकामाची नाडी अचूक सापडली होती असं म्हणायला वाव आहे तर :)