मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समुद्र किनारा आणि मी..

निनाव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सकाळी सकाळी समुद्र किनार्या वर उघड्या पायांनी चालतांना उडणाऱ्या पक्ष्यांचे आवाज ऐकतांना आणि डुलणार्या होडी पाहतांना तुझीच आठवण येते दूर नभात उजाड्तांना थंड लाटा भिजवतांना पायात शिंपले टोचतांना तुझीच आठवण येते किनाऱ्याची मिठी मारतांना लाटांचे फेस जवळ येतांना सुसाट वारा केस उडवतांना तुझीच आठवण येते एका हातात चपला धरूनी चालतो आहे मी काही शोधत खाली बघत पण खंर तर काहीच दिसत नाही मला आणिक काहीच ऐकू येत नाही सगळे जसे थांबले आहे ...आणि ... भासते अचानक मला... त्या लाटा आत्ता पाण्या च्या नाहीत त्या तुझ्या बरोबर जगलेल्या प्रत्येक क्षणाच्या आहेत जे आदळत आहेत मना वर माझ्या .. एक एक करूनी असे वाटते किनारा कधी संपूच नये लाटा ह्या थांबूच नये अन मग अचानक शिंपले टोचते पाया अन मी पुन्हा येतो .. समुद्र किनार्या वर ओल्या लाटांमध्ये अन ..जाणवते किती लांब आलो मी निघून.. मग...मागे वळून बघतांना तुझीच आठवण येते....

वाचने 13951 वाचनखूण प्रतिक्रिया 2

प्रकाश१११ 26/02/2011 - 09:26
निनाव - समुद्र किनार्या वर ओल्या लाटांमध्ये अन ..जाणवते किती लांब आलो मी निघून.. मग...मागे वळून बघतांना तुझीच आठवण येते... छान लिहिले आहे

नरेशकुमार 26/02/2011 - 09:32
असे वाटते किनारा कधी संपूच नये लाटा ह्या थांबूच नये
कविता छान आहे. आवडली मनापासुन. समुद्र किनारी गेल्यावर नेमके असेच भाव मनात येतात.