मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हडळ जागी भूत जागे

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आमच्या संगीत तबकडीवर खेबूडकरांचे चंद्र आहे साक्षिला वाजत होते आणि आम्ही मिपावर प्रियालीताईंचे भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य वाचायला सुरवात केली .. आणि पान जागे फूल जागे च्या ऐवजी भलतेच काही गुणगुणायला लागलो.. हडळ जागी भूत जागे, खविस सुद्धा जागला, प्रेत आहे साक्षिला, प्रेत आहे साक्षिला लाकडांचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रिला, प्रेत आहे साक्षिला, प्रेत आहे साक्षिला! कफन हे रेशमी, सुतळकाथ्या बोचतो सूर हा, ताल हा, धूप थोडा लावतो तेरड्यांच्या या फुलांनी, देह आहे झाकिला! कावरा, बावरा, हा कुणाचा आतमा अंग ना सोडिसी, हो जीवाचा खातमा आज मुक्तीच्या भयाने, देह त्याचा कंपिला!

वाचने 9493 वाचनखूण प्रतिक्रिया 41

बिपिन कार्यकर्ते 08/10/2010 - 10:45
_/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_

श्रावण मोडक 08/10/2010 - 10:47
च्यायला... लॉगआऊट व्हावं आता.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक 08/10/2010 - 10:54
नको. आज मंतरलेला ताईत नाहीये सोबत. उगा फटका बसायचा... ;)

नितिन थत्ते 08/10/2010 - 10:54
मस्त. हेच राहिले होते. एक सूचना: 'सूर हा ताल हा' ऐवजी 'धूर हा वास हा, धूप थोडा लावतो' कसे वाटते?

In reply to by नितिन थत्ते

केशवसुमार 08/10/2010 - 11:01
थत्तेशेठ, 'धूर हा वास हा, धूप थोडा लावतो' असेच काहीसे अधी सुचले होते.. पण रडण्याचा / भजनांचा सूर ताल आणि धूप असे करावे वाटले.. (पर्यायी)केशवसुमार प्रतिसाद आणि सुचवणी बद्दल धन्यवाद.. (आभारी)केशवसुमार

चेतन 08/10/2010 - 11:19
गुर्जी मस्त जमलयं अवांतरः नशिब या विडंबनात स्वतःची स्वाक्षरी नाही टाकली ;)

परिकथेतील राजकुमार 08/10/2010 - 11:26
'कावरा, बावरा, हा केसुचा आतमा' असेपण चालुन गेले असते ;) अवांतर :- थत्ते चाचांना शेठ म्हणल्याबद्दल ह्या बालदिनी तुम्हाला गुलाबाचे काटे फेकुन मारण्यात येतील.

पैसा 08/10/2010 - 14:22
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम (रामाचं नाव घेतलं की भुतं शांत होतात असं लहान असताना कोणीतरी सांगितलं होतं..)

In reply to by पैसा

प्रियाली 08/10/2010 - 17:49
रामाचं नाव घेतलं की भुतं शांत होतात असं लहान असताना कोणीतरी सांगितलं होतं.
हो कारण रामरामराम म्हणत राहीलं की मरामरामराही होतं. भुतं शांत होतील नाहीतर काय?

In reply to by प्रियाली

पैसा 08/10/2010 - 17:57
सर्वपित्रीला मरा.. मरा.. हेच बरोबर! शिवाय रामाचं नाव घेतलं तर दुसरीच भुतं मानगुटीला बसतील!

In reply to by पैसा

परिकथेतील राजकुमार 08/10/2010 - 18:21
रामाचं नाव घेतलं की भुतं शांत होतात असं लहान असताना कोणीतरी सांगितलं होतं..
तुम्ही लहान असताना , का सांगणारा लहान असताना ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

पैसा 08/10/2010 - 21:12
अवसेला आला परा, वाजवत दात कराकरा || धृ||
खरं तर हे आताच वाचलं होतं त्यामुळे तुमचं नाव बघताच माझी भीतीने गाळण उडाली होती! (घाबरट)

प्रियाली 08/10/2010 - 17:11
काय भयंकर लोक आहेत एकेक आणि बिचार्‍या भुतांना भयानक म्हणतात.

बेसनलाडू 08/10/2010 - 21:15
(नतमस्तक)बेसनलाडू या कवितेला प्रियालीताईंकडून निर्विवाद पहिले पारितोषिक मिळावे. (परीक्षक)बेसनलाडू

चतुरंग 08/10/2010 - 21:27
०()8= खूप दिवसांनी साष्टांगनमस्काराची स्माईली वापरायला दिल्याबद्दल खूष आहे! ;) भयरंग

चन्द्रशेखर गोखले 08/10/2010 - 22:32
भ.. भ.. भ...भयंकर सुंदर रचना !!!!

In reply to by प्रियाली

केशवसुमार 09/10/2010 - 08:38
हे विसरलोच होतो..धन्यवाद प्रियालीताई.. (विसराळू)केशवसुमार.. मस्त धमाल आली तेव्हा

केशवसुमार 09/10/2010 - 17:14
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार.