मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

यशोधरा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:

वाचने 5624 वाचनखूण प्रतिक्रिया 47

श्रावण मोडक 22/09/2010 - 16:42
क्या बात है! प्रत्येक द्विपदी भावली!!!

जाई अस्सल कोल्हापुरी 22/09/2010 - 16:44
छान जमलिये...!
गझलेच माहित नाही पण प्रत्येक ओळ मस्त जमलेय शेवटची ओळ छान जमलेय (पण पहिल्या सगळ्या ओळींसारखी प्रश्नार्थक नाहि आहे ) चेतन

मितान 22/09/2010 - 17:14
शेवटच्या दोन ओळी खासच !ब पूर्ण गजल वाचताना उन्हाचा भास होतो आणि या दोन ओळीत सावलीचा गारवा ! खूप छान :)

सागर 22/09/2010 - 17:47
वा यशोधरा, सुंदर गझल रचली आहेस खास करुन या ओळी काळीज भेदून आरपार गेल्या पावलांना शाप होता, की तुझा हा डाव होता? सोबती ज्या मानले, पाठीत केला वार त्याने, बोचला काटा, असा चर्येवरी का भाव होता? चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता.. जबरदस्त आणि बहोत बढीया खूप दिवसांनी एका चांगल्या गजलेची कट्यार काळजात घुसली :) मनापासून धन्यवाद

संदीप चित्रे 22/09/2010 - 20:49
पण संपूर्ण गझलेत शेवटचा शेर विशेष आवडला >> चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता... सुरेख कल्पना आहे ही .

सुहास.. 22/09/2010 - 21:08
हाय! का नाही कळाले, वाट होती रोखलेली, पावलांना शाप होता, की तुझा हा डाव होता? सोबती ज्या मानले, पाठीत केला वार त्याने, दंश ज्याचा धर्म तो, का मानला मी साव होता! >>> व्वा !! लेखणीत ऊतरले भाव ,की हा केवळ सराव होता? असा हा अंत असहाय्यतेचा,जणु नशीबाचाच अटकाव होता ?

विदेश 22/09/2010 - 22:36
खास करून पुढील ओळी- सोबती ज्या मानले,पाठीत केला वार त्याने, दंश ज्याचा धर्म तो,का मानला मी साव होता-

नंदन 22/09/2010 - 23:34
घालता कोडे, जवाबाचे तुला का दु:ख झाले? बोचला काटा, असा चर्येवरी का भाव होता?
--- मस्त.
चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता..
--- क्लास! 'घरसे चलें थे हम तो खुशी की तलाशमें' मधल्या भावनेचा व्यत्यास म्हणण्याचा मोह व्हावा अशी द्विपदी.

शुचि 23/09/2010 - 01:01
सुंदर गझल >> चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता...>> :(
हाय! का नाही कळाले, वाट होती रोखलेली, पावलांना शाप होता, की तुझा हा डाव होता? चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता... या दोन द्विपदी विशेष आवडल्या. एकंदर चांगली झाली आहे. (वाचक)बेसनलाडू पाठीत वार नाही; मराठीत पाठीवर वार असतो, असे वाटते; चू. भू. द्या. घ्या. पाठीत वार जरासे हिंदाळलेले आहे (पीठ में छुरा भोंकना चे मराठीकरण?) (मराठी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

यशोधरा 23/09/2010 - 12:16
पाठीत वार नाही; मराठीत पाठीवर वार असतो, असे वाटते; चू. भू. द्या. घ्या. पाठीत वार जरासे हिंदाळलेले आहे (पीठ में छुरा भोंकना चे मराठीकरण?) आता माझाही गोंधळ झाला! हिंदाळलेले की कसे कल्पना नाही, कारण हिंदीत विचार करुन त्याचे मराठी करण करुन मी लिहित नाही किंवा माझे हिंदी वाचनही शून्यच आहे, पण पाठीत खंजिर खुपसला/ खंजिराचा वार केला, अशी वाक्ये वाचली आहेत, त्याचा संदर्भ असावा. मला पाठीत/ पाठीवर दोन्ही बरोबर वाटते खरे सांगायचे तर, माझे चुकतही असेल. कोणी जाणकार सांगेल का? नंदन?

In reply to by यशोधरा

नंदन 23/09/2010 - 12:34
'पाठीवर वार' हे लाक्षणिक अर्थाने - म्हणजे कृतघ्नता, विश्वासघात इ. दर्शवण्यासाठी अधिक बरोबर आहे, असं मला वाटतं. मात्र शब्दशः असेल उदा. गुद्दा, धपाटा, खंजिराचा वार इ. तर पाठीत. तेव्हा या ठिकाणी दोन्ही चालून जावे. (वृत्ताचा तोल अर्थहानी न होता सांभाळला जात असल्यामुळे.) इलाही जमादारांच्या गाजलेल्या गजलेच्या (एका आवृत्तीत/पाठभेदात*) असा शेर आहे - छाती खुली तरीही पाठीत वार केला, दिलदार यार माझा लाजला असावा. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने तो मोगरा असावा. [*पाठभेद म्हणण्याचं कारण की, जालावर १-२ ठिकाणी वाचलं त्यात हा शेर नव्हता.]

गंगाधर मुटे 23/09/2010 - 08:26
मतला आणि मक्ता सुरेख.. :)

ज्ञानेश... 23/09/2010 - 10:24
चांदण्यांनी घेतलेला ठाव आवडला. पुलेशु.

अस्मी 23/09/2010 - 11:14
सुंदर..
चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता
ही द्विपदी सगळ्यात आवडली :)

अवलिया 23/09/2010 - 11:49
!

धमाल मुलगा 23/09/2010 - 17:46
झक्क्कास! :) अवांतरः कसं काय बुवाएव्हढं एव्हढं छान लिहायलं सुचतं लोकांना ?

परिकथेतील राजकुमार 24/09/2010 - 13:57
कविता कुठली गझल कुठली हे आपल्याला बिलकुल कळत नाही. मात्र वर हे जे काय पद्य लिहिले आहे ते एकदम आवडून गेले :) हलकट अवांतर :-
भासली शाबासकी, की घातलेला घाव होता?
ह्या ओळीवरुन आम्हाला दिसामाजी मनात येईल ते खरडणार्‍या एका सदस्येच्या लेखनावर येणार्‍या प्रतिक्रीयांची आठवण झाली. (त्यातल्या ९८% त्यांच्या स्वतःच्याच असतात हा भाग वेगळा) त्या प्रतिक्रीया म्हणजे शाबासकी आहे का धपाटा हे वाचताना कळतच नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

यशोधरा 24/09/2010 - 14:03
पर्‍या, धन्यवाद, आणि सोप्पे केलेय की काम तसे! :) बरे, तुझे अवांतर मला व्यनिमधून उलगडून सांग बरे! :) आणि आता धागा वर आणून दिलाच आहेस, तर (थॅंक्यू! ;) ) तर, धम्या, पुपे आणि सुधांशू धन्यवाद. :)

राजेश घासकडवी 24/09/2010 - 14:32
मस्त जमली आहे गजल.

राघव 26/09/2010 - 07:27
घालता कोडे, जवाबाचे तुला का दु:ख झाले? बोचला काटा, असा चर्येवरी का भाव होता? हे खास आवडले. शेवटचं कडवं मात्र संपूर्ण गझलच्या भावनेशी विसंगत वाटतं. चु.भु.द्या.घ्या.

In reply to by राघव

यशोधरा 27/09/2010 - 19:32
>>शेवटचं कडवं मात्र संपूर्ण गझलच्या भावनेशी विसंगत वाटतं >> नाही खरं तर. संपूर्ण गझलेमधे एक कैफियत मांडायचा प्रयत्न आहे. आजूबाजूला काय सुरु आहे ह्याबद्दल, आणि तोंडावर गोड बोलणारे, पण मागून छुपे वार करणारे म्हणा, स्वतःच्या अधिकारांचा गैरफायदा घेऊन इतरांना त्रास देणारे व तत्सम ह्यांबद्दल. आणि कैफियत मांडता मांडता हे लक्षात आलेलं आहे की निवडलेल्या मार्गात जरी अडचणी आलेल्या असल्या, पुढेही येणार असल्या आणि एकूणातच जरी उद्वेगजन्य, मानसिकदृष्ट्या थकवणारा प्रवास असला तरीही हरकत नाही. कारण आतूनच जर समाधान असेल, तर प्रत्येक मुष्कील सरआंखोंपर! म्हणून, -चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या... तरीही हार मानलेली नाहीये, मानणार नाहीये, कारण, -चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता... अवांतरः - ही ओळ आधी अशी लिहिली होती.. चांदण्याचा ताजवा साथीस आहे, रात होता...

पिवळा डांबिस 26/09/2010 - 11:34
भावना व्यक्तिशः भावली नाही, पण गजल मात्र सुरेख!!! जियो!