दे दे भाकर
चार भिंती अन डोक्यावरती आहे छप्पर म्हणायला..
जीव जडु दे त्याला लागु आपण ही घर म्हणायला..
मदत घेतली नाही मित्रा इतक्यासाठीच तुझ्याकडुन
लोक लागले मलाच असते तुझाच चाकर म्हणायला
जेव्हा जातो त्याच्यापाशी ह्ट्टापाशी अडुन बसतो..
त्याला आता नकोच आहे कुणीच ईश्वर म्हणायला...
दु:ख जरी तु देवुनि गेलीस हसतमुख मी असे सदा
निमित्त झाले दुनियेला असते दिली तु ठोकर म्हणायला..
सभ्यपणाच्या वस्त्राआडुन मला दाविता पुच्छच त्यानी..
त्यांना देखील हवेच होते मी ही वाSSनर म्हणायला...
क्षितिजावर मी धावुन गेलो लांघुन गेलो सर्व दिशा.
जिथे मी गेलो तिथे लागले दे दे भाकर म्हणायला..
इथे तिथे मी विखरुन गेलो..मोडुन गेलो डाव शेवटी
तिथे कुणी मज उरले नव्हते आवर सावर म्हणायला..
नको जीवना मला दाखवु मरण्याची तु भीती कधी..
मी ही देखील तयार आहे तुलाच जा मर म्हणायला..
---- कानडाऊ योगेशु
---------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
लेखनविषय:
याद्या
1334
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
नको जीवना
मस्त. "जीव
आवडली.