जय जवान जय किसान !
२६/११ च्या निमित्ताने....
!!जय जवान जय किसान!!
चला , २६/११ ला एक वर्ष झालं
नको त्या आठवणी म्हटलं तरी , जरा रक्त ओघळ्लं
हुतात्म्यांच बलिदान अगदीच फुकट नाही गेलं
वर्षभरात तसं काहीच नाही घडलं
देशात कुठे कुठे थोडफार झालं
पण आमच्या बापाच , त्यात काय गेलं...?
(बडे बडे शहरोंमे ऐसे छोटे छोटे हादसे होतेही है ! )
तशी आम्हाला सुरक्षेची आजिबात चिंता नाही
आमच्या देशात हुत्तात्म्यांची अगदीच काही कमी नाही
आहो सैनिकांच हेच तर काम असतं
लढता लढला देशासाठी कधीतरी मरायचं असतं
आपलाशेतकरी बघा , फुकटचा मरत असतो
इतके बॉम्बस्फोट होतात , आत्महत्या कशाला करतो...?
मरायच तर लेका , बोम्बस्फोटात मरावं
आपल्या कुटुंबाचं येड्या, भलंतरी करावं
अरे शास्त्रीजींच्या मन्त्राने भरून घे कान
उगीच का म्हणतात ...?
जय जवान जय किसान
लेखनविषय:
याद्या
2031
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
सुरेख
भळभळणार्
!!जय जवान जय
(विषय दिलेला नाही)
भीषण वास्तव!