मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शाळेचा पहिला दिवस...

कर्नलतपस्वी ·
उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती. एकामागोमाग शाळेच्या बसेस आल्या,चौकात येवून थांबल्या. मुले आई-वडील पांगले. आपापल्या मुलांना बस मधे बसवले. सुचना थांबत नव्हत्या. बस भरली. ड्रायव्हरने निर्विकार पणे बस मार्गस्थ केली. आई-वडील आपापल्या घोळक्यात सामील झाले.

न्यायाधीश 'कॅश'वंत वर्मा...

बाजीगर ·
लेखनविषय:
घ्या कविता... 'कॅश'वंत वर्मा, भोग आता कर्मा, महाभियोगधर्मा सामोरी जा || जर दिला राजीनामा, तर नाही काजीनामा, सांग तुझा कारनामा, निवृत्ती जा || न्यायाधीशाच्या घरी रोकड, आता तो शोधतो बोकड, जो घेईल खांद्यावर जोखड, वाचवण्या || संसदेत घेराव, मांडला ठराव, तरी हे राव, ढिम्म नाही || न्यायाधीश यशवंत पकडला गेला 'कॅश'वंत आता करणार बस वंत घरातच ||

Ee Sala Cup Namde अखेर सत्यात उतरले..

सुजित जाधव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्ही फक्त किडनी, लिव्हर आणि दिलच जिंकू शकता आयपीएल ट्रॉफी तुमच्या नशिबात नाही.. विराट कोहली आरसीबीसाठी पनौती आहे त्याच्यामुळे आरसीबी ट्रॉफी जिंकत नाहीये.. विराटने एकतर टीम बदलावी किंवा आयपीएल खेळणे सोडून द्यावे.. या आणि अशाच प्रकारे विराट, विराट फॅन्स आणि आरसीबीला ट्रोल केले गेले, मजाक उडवला गेला, सल्ले दिले गेले. १८ वर्षे, तब्बल १८ वर्षे आरसीबी एका आयपीएल ट्रॉफी साठी झगडत होती, चाहते तळमळत होते. यादरम्यान २- ४ वेळेस आरसीबी जेतेपदाच्या अगदी जवळ सुद्धा गेली पण कधी नशीब तर कधी समोरील संघाच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना ट्रॉफीने हुलकावणी दिली.

बाजाराचा कल : ९ जूनचा आठवडा

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल : ९ जूनचा आठवडा ==================== मंडळी, मागील आठवड्यात केलेले भाकीत बरोबर ठरले आहे. बाजाराने दमदार रिकव्हरी केली आहे.

त्रिमितीच्या तुरुंगात

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
त्रिमितीच्या तुरुंगात घुसमटे जीव ज्यांचा उघडीन त्यांच्यासाठी मार्ग चवथ्या मितीचा कळसा नंतर पाया तिथे नियम असतो कार्यकारण भावाचा जाच जराही नसतो स्थळ-काळात तिथल्या पेव खाच खळग्यांचे उतरवी वर्तमान भूत वेडे भविष्याचे दोर परतीचे मात्र नाही कापणार नक्की आपापल्या कोठडीची खूण ध्यानी ठेवा पक्की :)

पंचमयकोश

Bhakti ·
लेखनविषय:
साधारणतः सर्वांकडे जी समस्या सुरू होते तिच समस्या आमच्याकडे सुरू झाली आहे. "१०-१२ वर्षांतील मुलांचा चिडचिडेपणा" मुलांच्या बाबतीत आपण खुप गोष्टी ठरवल्या असतात.पण मुलांचे किंचित बंड चिडचिड वाढलेली दिसते.त्यात नोकरी करणारी आई म्हणजे मुलांच्या वाढीमध्ये तारेवरची कसरत ,अनेक अपराधी भावनेने ग्रस्त व्हायला होते.वरती समाजाकडून उठणारे बोटं तो तर वेगळाच विषय.. यावर उपाय म्हणजे आपण हात उगारणे,त्यांना सतत धाक दाखवणे,शिक्षा करणे हे नसते.तर आपण संयमाने सतत तूही संयम दाखव हे दोघांवर बिंबवत राहणे हे असते. याबद्दलचा एक व्हिडिओ पाहण्यात आला.यात भारतीय गुरूकुल पद्धतीत , पूर्वीच्या काळी कशाप्रकारे मुलांशी संवाद

सलाम वेंकी...उत्तम हिंदी चित्रपट

नपा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला हा - काजोल, विशाल जेठवा यांच्यासह आमिर खान ची छोटी भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच 'चॅनेल सर्फिंग' करताना दिसला. एवढ्या सशक्त अभिनेत्यांचा हा कोणता सिनेमा आपण पाहीला नाही, या विचाराने सर्फिंग थांबले. जसजसं कथानक पुढे सरकायला लागलं, तसतसं न पाहिलेल्या भागाचा अंदाज येऊ लागला आणि चित्रपटात गुंतत गेलो - याचे श्रेय नक्कीच दिग्दर्शक रेवती (दक्षिणात्य अभिनेत्री), पटकथा लेखक समीर अरोरा व कौसर मुनीर या त्रयीना जातं. हा चित्रपट श्रीकांत मूर्थी यांच्या The Last Hurrah या पुस्तकांवर आधारित आहे.