Skip to main content

सहज सुचलं म्हणून.......

लेखक अनिल आपटे यांनी सोमवार, 08/11/2010 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द दुय्यम आहेत विचार महत्वाचा त्यामुळे आपण काय विचार करतो या कडे बारकाईने लक्ष द्या - स्वामी विवेकानंद आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला विचार करायला फुरसतच कुठे आहे? आणि विचार करत बसला तर आलेली संधी हुकण्याची शक्यता अधिक पण त्यामुळे अविचाराने केलेल्या गोष्टींचा त्याला कधी कधी मनस्ताप हि फार होतो किंबहुना एखादीच गोष्ट यशस्वी झालेली आढळते. त्यामुळे विचारपूर्वक केलेली कृती हि निश्चितच फलदायी ठरते.

क्ष-किरणांच्या शोधाचा वाढदिवस

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 08/11/2010 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्याप्रमाणे आजचा दिवसही गुगलशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं. इंटरनेट वापरायचं आहे, इंटरनेटवर काही कुठेतरी वाचायचं आहे आणि गुगल वापरलं नाही हे माझ्यासाठी जवळजवळ अशक्य असतं. तसंच आजही काहीतरी धुंडाळताना 'सर्च रिझल्ट्स'च्या डाव्या बाजूला वर गुगलचा चमत्कारिक लोगो दिसला. आज क्ष-किरणांच्या शोधाचा ११५वा वाढदिवस आहे हे गुगलबाबाकडून समजलं. क्ष-किरण सर्वप्रथम शोधले ते जर्मन शास्त्रज्ञ विल्हेम कॉनराद राँतजेन याने, आजचीच तारीख, साल १८९५. आणि या शोधासाठी त्याला नोबेल पुरस्काराची फार वर्ष वाट पहावी लागली नाही, १९०१ साली राँतजेनही नोबेल लॉरिएट झाला.

साद घालतो रानवारा

लेखक दशानन यांनी सोमवार, 08/11/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
चल मित्रा, साद घालतो रानवारा कुठे अडकलास रे अतृप्त जिवा क्षणाची ना उसंत, धावपळ चोहीकडे शहराचा गोंगाट भावला का तुला कि आठवतो अजून ही स्पर्श हिरवा झुळझुळ वाहणारा तो अमृत झरा आकाशामध्ये विसावलेला तो कडा रमलास काय रे, मित्रा पहात इकडे माणसांचा कारखाना अन् वाहनांचा टांडा, विसरलास का, डोंगरमाथ्यावरची ओली हवा वाहणारी सरिता, साथ देणारा गार वारा गडकिल्ल्यांचा स्पर्श अन् आठवतो लढणारा शिवा माणसांचा गरडा बाजूस, तरी पाणावलेल्या नयनकडा कांचेच्या अद्ययावत, गडात तू राहिलास एकटा अजून रेंगाळते का चव , आठवतो का जंगलचा मेवा धुप-तुपाचा वास, नाहीतर मोकळा गाभारा पुरातन मंदिरे,त्या गुंफा, तुटकी ती शिळा हरविलास तू

हे शक्य आहे का?

लेखक प्रमोद सावंत१ यांनी सोमवार, 08/11/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
नेत्यांचे महत्व वाढले म्हणजे देशाची प्रगती झाली असे होत नाही. सामान्य लोकांना जेव्हा जगताना नैराश्य येणार नाही, त्यांच्या गरजा पूर्ण होतील. मुलांच्या नोकरीची खात्री वाटेल, वीज- पाणी- शौचालयाची सोय असेल, तेव्हा आपली प्रगती झाली असे आपण समजू शकतो. हा प्रवास जेव्हा मागासलेल्या जिल्ह्यांत ठोसपणे सुरू होईल व शहरातील झोपडपट्टीचे प्रमाण दरवर्षी किमान १०-१५ टक्क्यांनी होईल, तेव्हाच आपण योग्य मार्गावर चाललो आहोत, असे म्हणता येईल.

मुंबैच्या किनारी ओबामा नाचला.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 08/11/2010 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
'मी हाय कोली..' या सुंदर कोलीगीतावर अखेर ओबामामामाही नाचला.. मिशेलमामी मात्र मला फार आवडल्या.. त्याही मनमोकळ्या नाचल्या.. :) इथे पाहा.. जळ्ळा आमचा परशा कोली.. दोन टाईम फक्त दारू खायची ज्याला फक्त माहिती.. त्याचीच ओबामामामा इथे आल्यापासून सारखी हुशारी सुरू होती की " ओबामामामाला आमच्या कोली गीतांवर नाचवतो की नाय ते बग..! " :) परशाचीही हकिकत लिहून तैय्यार होते आहे..

राज ठाकरे हे नाही करू शकले !

लेखक यकु यांनी सोमवार, 08/11/2010 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरेंचा म.न.से. नुकताच स्थापन झाला होता आणि त्यांची मारा-ठोका छाप भाषणे गाजत होती. पुढे त्यांना अटक झाली - म्हणजे अटकेची एक मोठी मालिकाच सुरु झाली. रस्त्यावरुन जात असताना इथं, औरंगाबादला एक केवीलवाणे चित्र मला दिसले. ठाकरेंचे चार-दोन समर्थक (यापैकी एक म.न.से.कडून पदवीधर मतदार संघाची निवडणुक लढताना पडून आता शिवसेनावासी) रस्त्यावर उतरले होते आणि पोलीस त्यांना गाडीत कोंबत होते.

उजव्या सोंडेचा गणपती

लेखक शुचि यांनी सोमवार, 08/11/2010 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या देवघरात पंज्याच्या आकारमानाचा , उजव्या सोंडेचा शिळेचा सिद्धीविनायक आहे. खाली त्याचे छायाचित्र दिले आहे. डाव्या सोंडेच्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेमध्ये काय फरक असतो यावर जाणकार प्रकाश टाकू शकतील काय? मी असे ऐकले आहे की उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक असते.