Skip to main content

पावसाळी भटकंती: वर्धनगड ( Vardhangad)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 17/08/2018 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
एतिहासिक कागदपत्रे वाचताना खुप काळजी घ्यावी लागते, कारण जसा मराठीमधे श्लेष अलंकार आहे, ज्यामधे एकाच वाक्याचे दोन अर्थ निघतात, तसेच मोडी लिपीच्या लिहीण्याच्या सलगतेमुळे कदाचित चुकीचा निष्कर्श निघू शकतो. नेमकी अशीच एक घटना वर्धनगड किल्ल्याबाबत झाली असावी. जेधे शकावली या शिवचरित्राच्या दृष्टीने महत्वाच्या आणि अस्सल साधनामधे एक उल्लेख आहे, "राजश्रीवर्धनगडास जाउन संपुर्ण उष्माकाल राहिले". १२ आक्टोंबर ते नोव्हेंबर १६६१ असे महिनाभर शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते. पण नेमक्या कोणत्या गडावर असा प्रश्न महत्वाचा आहे.

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ११

लेखक टर्मीनेटर यांनी शुक्रवार, 17/08/2018 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
/* W3.CSS 4.13 June 2019 by Jan Egil and Borge Refsnes */ html{box-sizing:border-box}*,*:before,*:after{box-sizing:inherit} /* Extract from normalize.css by Nicolas Gallagher and Jonathan Neal git.io/normalize */ html{-ms-text-size-adjust:100%;-webkit-text-size-adjust:100%}body{margin:0} article,aside,details,figcaption,figure,footer,header,main,menu,nav,section{display:block}summary{display:

सबका साथ सबका विकासाचे आद्य पुरुष - स्वर्गीय अटलजी

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 17/08/2018 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी भाग्यशाली होतो, १९९७ मध्ये प्रधानमंत्री कार्यालयात पोस्टिंग झाली. अटलजी प्रधानमंत्री झाले आणि कार्यालयात एक वेगळीच चेतना आली. कामाचा बोझा एकदम वाढलला. सरकारी दफ्तरात नूतन कल्पना साकारताना, भरपूर कागदी कार्य करावे लागतेच. सकाळी ९ ते रात्री ९ वाजायचे कधी कळायचे नाही. पण देशासाठी आपण काही ठोस कार्य करत आहोत या जाणीवेने त्या कामातहि आनंदच मिळत होता. सबका साथ, सबका विकास याचा अर्थ काय. स्व. अटलजींनी अनेक राजनीतिक दलांना आपल्या सोबत घेऊन सरकार चालवली म्हणजे विकास होतो. नाही. देशात विभिन्न राजनीतिक आणि धार्मिक समूहांना आरक्षण दिल्याने सर्वांचा विकास होतो. नाही.

श्रीहरिश्चंद्रेश्वर मंदिर

लेखक गणेश विजय काळे यांनी शुक्रवार, 17/08/2018 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
“हरिश्चंद्र” हे नाव उच्चारले कि एकतर राजा हरिश्चंद्र आणि त्यावर आधारलेला पहिला मूकपट आठवतो नाहीतर डोंगर भटक्यांसाठी आवडते ठिकाण आणि त्यांच्यासाठी असलेले “पंढरपूर” म्हणजे हरिश्चंद्रगड .पण याच नावाने महाराष्ट्रात असलेले श्रीहरिश्चंद्रेश्वर मंदिर मात्र सगळ्यांसाठी अल्प परिचित आहे आणि हे मंदिर आपल्याच महाराष्ट्रात जुन्नर या तालुक्यात दडलेले आहे .स्वतःच्या वाहनाने जर कधी भिमाशंकरला जात असाल तर, थोडासा वेळ काढून मुद्दाम हे मंदिर पाहण्यास काहीच हरकत नाही.या मंदिराचा थोडक्यात परिचय करून देण्याचा हा माझा पहिला प्रयत्न. पुणे भिमाशंकर महामार्गावर मंचर या गावाच्या पश्चिमेस १२ कि. मी.

कळलावी

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 16/08/2018 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
सुलभ प्रसूतीसाठी आदिवासी आणि पारंपरिक औषधी पद्धतीमध्ये मुळाचा लेप ओटीपोटावर लावला जातो. बाळंतिणीला प्रसूतीच्या वेळी कळा आणण्यासाठी वापर होत असल्याने या वनस्पतीला "कळलावी' म्हटले जाते. ा कळलावीच्या फुलांच्या पाकळ्यांची टोके तांबडी व मधला भाग पिवळा असल्याने अग्निज्वाला असल्याचा भास होतो. अग्निज्वालाप्रमाणे असणार्‍या या पाकळ्या दुरून समईत ज्योती तेवल्याप्रमाणे दिसतात, म्हणूनच या वनस्पतीला ‘अग्निशिखा’ असेही म्हणतात. पावसाळा सोडून इतर ऋतुत याचे कंद जमिनित जिवंत असतात.

कळलावी

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 16/08/2018 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
सुलभ प्रसूतीसाठी आदिवासी आणि पारंपरिक औषधी पद्धतीमध्ये मुळाचा लेप ओटीपोटावर लावला जातो. बाळंतिणीला प्रसूतीच्या वेळी कळा आणण्यासाठी वापर होत असल्याने या वनस्पतीला "कळलावी' म्हटले जाते. ा कळलावीच्या फुलांच्या पाकळ्यांची टोके तांबडी व मधला भाग पिवळा असल्याने अग्निज्वाला असल्याचा भास होतो. अग्निज्वालाप्रमाणे असणार्‍या या पाकळ्या दुरून समईत ज्योती तेवल्याप्रमाणे दिसतात, म्हणूनच या वनस्पतीला ‘अग्निशिखा’ असेही म्हणतात. पावसाळा सोडून इतर ऋतुत याचे कंद जमिनित जिवंत असतात.

श्री.अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली !

लेखक मदनबाण यांनी गुरुवार, 16/08/2018 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
अनुशासन के नाम पर अनुशासन का खून भंग कर दिया संघ को कैसा चढ़ा जुनून कैसा चढ़ा जुनून मातृ-पूजा प्रतिबंधित कुटिल कर रहे केशव-कुल की कीर्ति कलंकित कह कैदी कविराय, तोड़ कानूनी कारा गूंजेगा भारत माता की जय का नारा। ~ श्री अटल बिहारी वाजपेयी राजकारणातील कवी मनाच्या या ॠषीतुल्य व्यक्तीमत्वाला विनम्र श्रद्धांजली !

मन! - २

लेखक राघव यांनी गुरुवार, 16/08/2018 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
मन दु:खाचा तरंग.. मन सुख, अंतरंग.. जसा फणसाचा गर.. कठीणात मऊसर! मन अप्राप्य सागर.. अंतहीन कुतूहल.. जसा सुगंध अल्लड..शब्द-रूपाच्या पल्याड! मन अस्तित्व प्रचिती..मन फक्त विसंगती! जशी रात, न्हायलेली, चांदण-प्रकाशाच्या ज्योती!! मन शब्दांची आरास..कल्पनांचा सहवास! जशी सावली सजग..अव्यक्ताचं व्यक्त जग!! -- मनी मनाचा विचार.. स्वत्व शोध.. निरंकुश! मन आनंद केवळ.. डुंबण्याचा अवकाश!!
काव्यरस

दी टायगर्स असोसिएशन - रहस्यकथा भाग ४

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 15/08/2018 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग 2 भाग 3 सावंतांनी एकदाचा निर्णय घेतला. बाबांना ते म्हणाले , " देशमुख साहेब यावेळी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. ही सगळी कागदे इथे राहू देत. मला सगळ्या गोष्टीचा विचार करायला वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही हे शहर सोडून जाऊ शकत नाही. काही वेगळी बातमी कळाली तर मला कळवत रहा. पुढे काय करावे हे समजतच नव्हते.

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ४

लेखक आदित्य कोरडे यांनी बुधवार, 15/08/2018 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक https://www.misalpav.com/node/43088 https://www.misalpav.com/node/43118 https://www.misalpav.com/node/43144 मागील प्रकरणात आपण मोरोक्को आणि बोस्नियन पेच प्रसंगांची थोडक्यात माहिती घेतली. आता पुढच्या भागात आपण युरोपला पहिल्या महायुद्धाकडे घेऊन जाणाऱ्या कटकटी ज्या बाल्कन देशात/प्रदेशात होत होत्या त्या बाल्कन देशांबद्दल आणि तुर्कस्तानच्या ओट्टोमान साम्राज्याबद्दल थोडी माहिती घेऊयात.तसेच ह्या कटकटी काय होत्या?