Skip to main content

झिम झिम झिम्मड झिम्माड

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 12/04/2019 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
झिम झिम झिम्मड झिम्माड .खेळ खेळू रंगात आज काय पानोळ्या पानोल्या, आल्या खेळुन करवल्या पाने मांडीता मांडीता, साखर सांडून त्या गेल्या. एक करवली हरवली , कोणी नाही देखीली. तीची उरली सावली, माया सारी सम्पली. आई बापाची पोर ती . नवर्‍याने चोरीली. एक फुल चिमुकले. सासूरवाशीन झाले. लगनाच्या होमात. बाळपणी करपले. झिम झिम झिम्मड झिम्माड .खेळ खेळू रंगात.... आज काय खेळू संसारी? कवड्या टाकेन चारी. एक कवडी उलटली, माझी पाटी फुटली. पाटी जशी फुटली, टचकन माया आटली.

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ४

लेखक शेखरमोघे यांनी शुक्रवार, 12/04/2019 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
(या आधी भाग १ लिहितांना मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे) भाग १: http://www.misalpav.com/node/44368 भाग २ : http://www.misalpav.com/node/44372 भाग ३: http://www.misalpav.com/node/44375 दिल्ली शहरांत घुसण्याकरता शहराचे दरवाजे किंवा तट उध्वस्त होऊन शहरांत घुसता येण्याइतके खिंडार पडल्यावर लगेचच पुरेसे सैनिकदेखील त्या खिंडारांतून घुसण्याकरता तयार असायला हवे होते.

धर्म म्हणजे काय?

लेखक हेमंत ववले यांनी गुरुवार, 11/04/2019 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
(धर्म या शब्दाचा मूळ अर्थ : मूळ : धरणे किंवा बांधून राहणे व सवयीनुसार काळजीपूर्वक पालन करणे. धर्म हा संघटितरीत्या मान्य झालेल्या, एकत्रित जुळत असलेल्या सर्व सामाजिक व वितर्कीय कल्पनांचा संग्रह असतो. धर्माचा निसर्गात अस्तित्वात असलेल्या व्यक्ती, वस्तू, विश्व, इत्यादी गोष्टींशी निगडित असण्याचा दावा असतो. महाभारतानुसार 'ध्रियते लोकोनेनेति धर्मः| धारणाद् धर्ममित्याहुऱ् धर्मो धारयते प्रजाः||' अर्थात 'समाज व प्रजा धारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी आहे तो धर्म.' धर्म नावाची ही अशी एक संकल्पना आहे की जिने आजपावेतो जगातील कोट्यवधी लोकांना सुख, शांतता व समाधान दिले.

आकाशाची मोतीमाळ – स्वाती व सप्तर्षी नक्षत्रे

लेखक हेमंत ववले यांनी गुरुवार, 11/04/2019 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
भर्तृहरी एक राजा व महाकवि देखील होता. त्याच्या उत्तरकाळात त्याने तीन मुख्य काव्यरचना केल्या. त्यापुढे शतकत्रयी नावाने प्रसिध्दीस पावल्या. यातीलल एक आहे नीतिशतकम. या मध्ये एक रचना येते ती अशी सागरशुक्तिसंपुटगतं सन्मौक्तिकं जायते ! याचा अर्थ असा की स्वाति नक्षत्रामध्ये होणा-या पावसाचे थेंब जर शिंपल्यांमध्ये गेले तर त्याचे मोती होतात. भर्तृहरीचा काळ ठरविण्यात अजुनही अभ्यासकांची एकवाक्यता नाहीये. पण १५०० ते २००० वर्षापुर्वीचा त्याचा काळ असावा असा अंदाज आहे.

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ३

लेखक शेखरमोघे यांनी गुरुवार, 11/04/2019 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
(या आधी भाग १ लिहितांना मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे) भाग १: http://www.misalpav.com/node/44368 भाग २ : http://www.misalpav.com/node/44372 दिल्लीत अशी वाढती बेबंदशाही पसरत असतांना सैनिकांचा सगळ्यात मोठा जथा बरेलीहून दिल्लीत पोहोचला.

अमृतानुभव - अध्याय पहिला - शिवशक्तीसमावेशनमन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 11/04/2019 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥ देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥ _________________________________/\________________________________ हे सारं स्वान्तःसुखाय आहे. आपल्याला कोणाला काही पटवून द्यायचं नाहीये की कोणाचं काही मत खोडून काढायचं नाही. कोणाला वाटेल हे सारं टनाटनी आहे , कोणाला वाटेल हे अज्ञानमुलक स्वात्मरंजन आहे ! असो , आपला आता कोणताच अभिनिवेश नाही , खरेतर आहेच हे स्वात्मरंजन!

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग २

लेखक शेखरमोघे यांनी बुधवार, 10/04/2019 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
(या आधी मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे) भाग १: http://www.misalpav.com/node/44368#comment-1030023 १८५७ सालाच्या काही काळ आधी दिल्लीच्या भवितव्याबद्दलच्या इंग्रजांच्या काही हालचाली पडद्यामागे सुरू होत्या. कांही वर्षांपासूनच मुघल बादशाहीचा भारतावरचा जो काही पगडा शिल्लक राहिला होता तो देखील कसा कमी होईल किंवा काढूनच टाकता येईल आणि "बहादूरशहानंतर काय" हा विचार इंग्रजांच्या डोक्यांत सुरू झाला होता.

विराट, आयपीएल आणि वर्ल्डकप

लेखक चिनार यांनी मंगळवार, 09/04/2019 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट वर्ल्डकप तोंडावर आले असताना आयपीएलला प्राधान्य देऊन ती स्पर्धा आयोजित केल्याबद्दल बीसीसीआयचे हार्दिक अभिनंदन ! अर्थात कितीतरी धनाढ्यांचे हितसंबंध आयपीएलमध्ये गुंतले असताना वर्ल्डकपसारख्या टुकार स्पर्धेचे शुल्लक कारण देता येत नसते ह्याची मला कल्पना आहे. तर आयपीएल आता रंगात आलेली आहे. आता आमच्यासारखे पूर्वग्रहदूषित आणि प्रतिगामी लोकं आयपीएल बघत नाहीत त्याचा आयपीएलच्या लोकप्रियतेवर घंटा फरक पडत नाही.