Skip to main content

वाळूचे विरहगीत

लेखक मायमराठी यांनी बुधवार, 07/08/2019 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
।। वाळूचे विरहगीत ।। उन्हात चमके साज रुपेरी, खेचत नेई ओढ ना टळे। पसरुनी चमचम धरतीवरती, पाहुनी रात्री चांदही चळे। उधाण घेऊनी नायक येई, भिजवुनी जाई अंगही बळे। राग न यावा यात तिलाही, सरसर लाटेमागुनी पळे । अर्ध्यामुर्ध्या खुणांत रुतवी, निरोपांचे शंखशिंपले । जीव मोहरे येता भरती, युगायुगांचा नवस फळे। सुना किनारा होता ओहोटी, मुकी वेदना गात्रं छळे । सोडुनी जाई घाव जिव्हारी, त्या लाटांना हे न कळे । वाहत येई गाळ सुगंधी, ज्या वासाचे तिस लळे । खेळ मांडला पृथ्वीवरती, खेळणी वाळू सागर सगळे । रित्या नद्या होत तरीही, गोड होई खारे सगळे । अजाण सागर याच रहस्यी, वाळूमधुनी विरह ओघळे । पाय आपले जात रु

युगांतर - आरंभ अंताचा भाग 23

लेखक मृणालिनी यांनी बुधवार, 07/08/2019 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
युगांतर-आरंभ अंताचा भाग २३ हस्तिनापुरात आनंदाचे ढोल, नगारे वाजत होते. आपल्या अनूजाला पुत्र होणार ही वार्ता कळल्यावर धृतराष्ट्राने मिष्टान्न वाटले. सर्व नगरीत अन्न-वस्त्र वाटून भीष्मांनी पंडुकडेही मिष्टान्न पाठवले. "प्रणाम महाराज !" "शकुनी.... बोल." "महाराज, तुम्ही काय करताय हे?" "काय करताय म्हणजे? स्वागत करतोय! राजपरिवाराच्या नव्या सदस्याचे! आनंद साजरा करतोय मी शकुनी!" "पण कसला आनंद महाराज?" "अरे तू ऐकलं नाहीस? पंडुला पुत्रप्राप्ती....." "ते ऐकलं महाराज. म्हणूनच आश्चर्य वाटते आहे तुमच्या वागण्याचे!" "पण का? त्यात आश्चर्य वाटण्यासारखे आहे तरी काय?" "महाराज तुम्ही विसरता आहात.

सुंदरसा तो पाऊस यावा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 07/08/2019 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
सुंदरसा तो पाऊस यावा -------------------------- सुंदरसा तो पाऊस यावा भिजून जावी सारी धरती या मातीचा दरवळ व्हावा इंद्रधनु उमटावे वरती अशा धुंद त्या वातावरणी तुझी नि माझी भेट व्हावी त्या समयाची होऊन करणी नजर हृद्गते थेट व्हावी गुपित काही नच उरावे पण ते दोघांनाच कळावे मिटवून मग सारे पुरावे जगापासून दूर पळावे ----------------------- बिपीन

सुषमा स्वराजांना श्रद्धांजली

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 06/08/2019 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजांच्या दुख्खद निधनाची बातमी येते आहे. सुषमा स्वराजांना श्रद्धांजली __/\-__

डोक्याला शॉट [द्वितीया]

लेखक गड्डा झब्बू यांनी मंगळवार, 06/08/2019 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: निवेदन आणि उपास (बटाट्याची चाळ) रताळ्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही! अण्णा पावशांच्या मुलींच्या कुंडल्या त्यांनी खणातून केव्हा काढल्या, गुपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमण बिल्डिंगमधल्या उकिडव्यांच्या घरी केव्हा नेल्या, ही गोष्ट पावशीण- काकूंना कळायच्या आत आमच्या कुंटुबाला कळली! एच्च.

पावसाळ्यातील एक प्रवास!

लेखक लई भारी यांनी मंगळवार, 06/08/2019 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात काही महत्वाच्या कारणांमुळे भर पावसात मुंबई-पुणे-निपाणी आणि परत पुणे असा प्रवास करावा लागला. त्या दरम्यान आलेले काही अनुभव लिहावे म्हटलं! तस म्हटलं तर खूप काही वेगळं, थरारक नाही पण माझ्यासाठी तरी बऱ्याच गोष्टी कायम लक्षात राहतील अशा होत्या. मुंबई मध्ये पाऊस वाढू लागला आणि शनिवारी दुपारी मी पुण्यासाठी बसने निघालो. प्रचंड पाऊस अपेक्षित असल्यामुळे रस्त्यावर तुलनेने गर्दी कमी होती, पण एकंदरीत पावसामुळे वेळ लागलाच. एका बोगद्यात आम्ही पोचायच्या आधी एक कार पलटी झालेली बघितली आणि धस्स झालं! घाटामधून दिसणारे धबधबे बघत ४ तासात पोचलो.

युगांतर आरंभ अंताचा भाग २२

लेखक मृणालिनी यांनी मंगळवार, 06/08/2019 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
"कुंती, माद्री, ऐकलंत का?" हातातली रवी तशीच सोडून कुंती बाहेर आली. "काय झालं आर्य?" शेतावरून मधेच परत आल्याने दोघींना काळजी वाटली. पंडुच्या नाजूक तब्येतीने त्याला काही होणार तर नाही ना ही सतत मनाला लागलेली भिती! त्यात किंदम ऋषींचा शाप.... कुंतीने माद्रीला सांगितले तेव्हा तिची अवस्था गर्भगळीत झाल्यासारखी झाली होती. राजमहल सोडून कुटीत राहायला आली तेव्हाही तिच्या चेहऱ्यावर कधी दु:खी भाव नव्हते. या शापाने मात्र तिला एकटे पाडले होते. गांधारीची सुंदरता आणि माद्रीचे लोभस रुप यात एक साम्य होतं..... लागलेलं ग्रहण! गांधारीच्या रुपाला अंधत्वाचं आणि माद्रीच्या रुपाला शापाचं!

रक्षाबंधन - भाग १

लेखक मायमराठी यांनी सोमवार, 05/08/2019 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
' रक्षाबंधन ' भाग १ भारतीय समाज केव्हा बरं अडचणीत सापडतो, असा विचार केल्यावर काय काय सुचेल? आकाशात जेवढे ग्रह तारे एवढी उत्तरे आठवली तरी एक उत्तर नक्कीच ध्रुव ताऱ्यासारखे असणार. 'सण आले की..'हेच ते तेजस्वी उत्तर असे वाटते. वरवर पाहता हे पटणार नाही किंवा लिहिणारा गोंधळात पडलेला आहे असे वाटेल कदाचित, पण आता असे वाटतंय तर लिहून तर बघू. आपल्या देशात महिनाभर सुट्ट्या सणांमुळे असतात, त्यामुळे मुख्य पंचाईत अशी की कोणत्या सणाचा गोंधळ साजरा करायचा?