Skip to main content

मोठा मासा आणि छोटा मासा .

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 07/10/2019 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
मोठा मासा आणि छोटा मासा .. बारक्याने आपले घारे डोळे थोडेसे आणखीन बारीक केले. हातातील सिगरेटचा एक मोठा झुरका घेऊन तोंडाचा चंबू करून परत एक धुराचे वर्तुळ बाहेर सोडले. मग आपल्या केसावरून एकदा हात फिरवला. मग उगीचच शेजारी बसलेल्या ढापण्याला पाठीत एक गुद्दा ठेऊन दिला. ढापण्या पीत असलेल्या चहाच्या ग्लास मधून थोडा चहा हिंदकळून खाली पडला. नशीब त्याच्या अंगावर सांडला नाही. बारक्या एकदम हसायला लागला. त्याचा गोरा चेहरा एकदम लालबुंद झाला. मग त्याला एकदम ठसकाच लागला. सिगरेटचा धूर आपण बाहेर सोडायचा होता का आत घ्यायचा ?हेच त्याला समजेना आणि त्याचा ठसका परत वाढला.

तब्बेत : ‘त्यांची’ आणि आपली !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 07/10/2019 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस हा एक प्राणी आहे. जीवशास्त्रानुसार प्राण्यांचे प्रजाती आणि जाती ( Genus & Species) असे वर्गीकरण करतात. त्यानुसार माणूस होमो सेपिअन्स या कुळात येतो. ‘सेपिअन’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘शहाणा’ असा आहे. सुमारे २४ लाख वर्षांपूर्वी या कुळाची निर्मिती झाल्याचे मानतात. तिथून पुढे उत्क्रांती होत माणूस आजच्या अवस्थेला पोचला आहे. मानवजातीच्या या अनोख्या इतिहासाचा विस्तृत आढावा युव्हाल नोव्हा हरारी यांनी त्यांच्या बहुचर्चित ‘सेपिअन्स’ या पुस्तकात घेतला आहे. हे विद्वान जेरुसलेम इथल्या विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत.

टेक्नो सॅव्ही..

लेखक आजी यांनी सोमवार, 07/10/2019 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं ज्ञान हे वाळवंटातील एका कणाएवढं आहे" असं प्रत्यक्ष न्यूटन म्हणाला होता. माझं स्वत:चं अज्ञान तर जगातल्या सर्व वाळवंटांइतकं विस्तीर्ण आणि सर्व महासागरांइतकं अथांग आहे. जुनं माहीत आहे पण नवीन काही माहीत नाही. मी मोबाइल वापरते. पण त्याचा उपयोग आलेले फोन घेणे आणि आवश्यक तेवढे फोन करणे एवढाच मी करते. म्हणजे अलीकडेपर्यंत करत होते. आता कसेबसे व्हाट्सऍप वापरते. बस इतकेच. त्याचे काय झाले, मला माझ्या मुलाने वाढदिवसाला नवा फोन घेऊन दिला. कुणीतरी मला प्रश्न विचारला.

झोल्?चच्चडी?

लेखक नूतन यांनी सोमवार, 07/10/2019 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
फोटो चढवणं माझ्यासाठी आव्हान बनलं आहे.पुन्हा एक्दा प्रयत्न करते.

समीक्षा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 06/10/2019 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
‘शब्दमल्हार’ नियतकालिक, ऑक्टोबर 2019 च्या अंकात श्री. रविंद्र पांढरे यांनी लिहिलेला लेख: दांभिकतेवरचं परखड भाष्य: ‘मी गोष्टीत मावत नाही’ - रवींद्र पांढरे सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस हा बहुजन समाजजीवनाचा एक महत्त्वाचा घटक. याचं जगणं म्हणजे समाजजीवनाचं, समाज संस्कृतीचं प्रतिबिंबच. चाकोरीबद्ध आयुष्य हे याचं प्रातिनिधीक वैशिष्ट्य. स्वप्न पाहील, पण ते पूर्णत्वास गेलंच पाहिजे यास्तव आग्रही नाही. समाजकारण, राजकारण, अध्यात्म, साहित्य आणि कामजीवनही, यावर तासनतास चर्चा करेल, त्यावरचं आपलं आग्रही मत हिरीरीने मांडले, पण ते केवळ चर्चेपुरतं, आपआपल्या वर्तुळाच्या मर्यादेत.

झोल? चच्चडी?

लेखक नूतन यांनी रविवार, 06/10/2019 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई पुण्याच्या खाद्यजीवनात दक्षिणेकडील इडली-दोशा, उत्तरेकडील दाल-रोटी, सरसों दा साग तर पश्चिमेकडील खिचडी-कढी ,ढोकळा यांनी अढळ स्थान प्राप्त केले आहे. पण पूर्वेचा संबंध संदेश-रसगुल्ल्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. "काछेर मानुष " (बंगाली भाषेतील एक प्रसिद्ध कादंबरी) वाचताना मध्यमवर्गीय घरातील जेवणाचे बरेच उल्लेख आढळले. साहजिकच आपल्या मराठी घरात होणा-या रोजच्या आमटी-भात,खमंग काकडी, उकडलेल्या बटाट्याची भाजी अशा साध्यासुध्या जिनसांप्रमाणे बंगाली शाकाहारी जेवणात रोज काय करतात ? या प्रश्नाचा उदय झाला. उत्तरासाठी आंतर्जालावर शोध सुरू झाला. त्यातून काही माहिती मिळाली.

India Deserves Better - ४. शेती , राजकारण आणि त्यातील विसंगती आणि समस्या

लेखक गणेशा यांनी शनिवार, 05/10/2019 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
नोट : शेती या विषयाशी माझा डायरेक्ट काही संबंध नाही, पण माझ्या आसपासच्या समस्या मांडताना, शेती आणि शेतकरी हे घटक त्यातुन सुटु शकत नाहीत. त्यामुळे खोल अभ्यास नसला तरी वरवर जे मला थोडेफार माहीती आहे आणि मला जे वाटते आहे , जे वाचले आहे त्यावरुन लिहितो आहे. तरीही शेतीतील नेहमीचे जे प्रश्न आहेत, तेच पुन्हा न मांडता त्या व्यतिरिक्त बोलण्याचा थोडा प्रयत्न करतो. शेतकरी आत्महत्या तर मनाला खुपच क्लेष देवुन जातात म्हणुन तो विषय ही मी येथे घेत नाहीये.. (त्यात आज सकाळी उठल्या ऊठल्या 'आरे' च्या बातमी ने मन विषन्न केले आहे.

मन आणि पृथ्वी

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 05/10/2019 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणे एकदा पृथ्वी मनास, "चल, खेळ एक खेळू, आजमावू आपापली शक्ती खास." ऐसे म्हणुनी पृथ्वी क्षणात खेचे सर्व चेतन,अचेतनास, म्हणे हसुनी," रे मना! तुझ्यासकट ही शरीरांची रास, तुला आकर्षण्या न उरले काही आता, शांत का झालास?" हात जोडोनी सस्मित मन बोले, " माते, तुला हरवण्याची कधीच नव्हती आस, तुझ्या कृपेच्या ओझ्याने दबलेला मी क्षुल्लक अणूमय दास.