Skip to main content

सप्रेम निमंत्रण

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 25/01/2020 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
 नांदेड सिटी सिंहगड रस्ता , पुणे, येथे आयोजित वरील कार्क्रमास उपस्थित राहावे ही विनंती. सौ. नेहा पराग प्रधान

सोलाण्याचं पिठलं

लेखक नूतन सावंत यांनी शुक्रवार, 24/01/2020 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
#सोलाण्याचं_पिठलं (#Fresh_green_chickpeas_curry) पिठलं हा मराठी माणसाच्या आयुष्यातला जिव्हाळ्याचा पदार्थ आहे.आणि गृहिणींच्या तर प्रेमाचा विषय आहे.कोणत्याही वेळी अभ्यागत आले की, गृहिणींचा आधार म्हणजे पिठलं-भातच. पूर्वी नाटक कंपन्याच्या संगीत नाटकांचे प्रयोग रात्रौ उशिरा कदाचित पहाटेपर्यंत रंगत, अशावेळी बाहेरगावी होणाऱ्या प्रयोगानंतत कंपनीचा बल्लव पिठलं-भाताचा हातखंडा प्रयोग करत असे. शिवाय कडू घास म्हणजे एखाद्याचं निधन झालं की त्याचे क्रियाकर्म आटपून घरी आल्यावरचं जेवण,जे शेजाऱ्यांकडून येतं तेही पिठल-भाताचंच असतं.यात दोन हेतू असावेत,असं मला वाटतं, एक म्हणजे शेजारचेही घरच्यांइतकेच दमलेले आणि

"शर"

लेखक परशु यांनी शुक्रवार, 24/01/2020 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वडिलांची ५० वर्षांपूर्वीची कवितांची डायरी सांभाळून ठेवली आहे. वडील पत्रकार, कवी, संपादक होते. तरुण असतानाच गेले. त्या डायरीतील कविता खाली टंकत आहे. कवितेतला मला फारसा गंध नाही. मिपाकरांकडून जर काही रसग्रहण झाले वा प्रकाश पडला तर बरे ह्या उद्देशाने मिपावर टाकत आहे.
काव्यरस

नागझिरा - बिबट्या (बघण्या) साठीचा थरार

लेखक लाल गेंडा यांनी शुक्रवार, 24/01/2020 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
ही आमची चौथी सफारी होती. आल्यापासून आम्ही बिबट्याच्या मागावर होतो. पहिल्या दिवशी पहिल्या सफरीला फार अपेक्षा नव्हत्या. आधी दोन सफारीना जाऊन आलो असल्यामुळे एखादं जनावर लगेच दिसेल किंवा दिसावं अशी हौशी अपेक्षा तर बिलकुल नव्हती. आमचं कन्यारत्नसुद्धा नवीन जंगल म्हणून शांत होतं. आम्ही निघालो किंबहुना आत शिरलो तेव्हा तीन वाजले होते. आधी बघितलेल्या जिम कॉर्बेट किंवा रणथम्बोरपेक्षा हे नक्कीच वेगळं होतं. या अभयारण्याला पश्चिम घाटाचा वास होता, प्रत्यक्षात घाटापासून कितीतरी लांब असूनही एक आपलेपणा होता त्याचा. महाराष्ट्रात होत म्हणून मी असा विचार करत होतो का?

'तंबोरा' एक जीवलग - ९

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी शुक्रवार, 24/01/2020 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
सारांश काय तर गळ्यात सूर हवा. सच्चा सूर निरागसच असतो. त्याला बळेच निरागस करता येत नाही. त्या गाण्यात त्यांना बहूतेक, 'माझ्या कंठात असा निरागस सूर वसूदेत' असं गणपतीला म्हणायचं असावं. माझ्या गळ्यातला सूर निरागस होवो याला काही अर्थ नाही. म्हणजे आधी लुच्च्या होता तो निरागस होवो. अशक्य. काहीजण अस्सा निरागस सूर आधीच्या भागात सांगितलेल्या सगळ्या गुणवत्तेसकट कंठात घेऊनच जन्माला येतात. याला दैवी नाही तर काय म्हणावे! हे लिहिताना अशा मी काही ऐकलेल्या गवय्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणि सूर कानात गुंजतो आहे. त्या आगोदर मी न ऐकलेल्या पण ज्यांच्या सुराबद्दल ऐकलेल्या गवय्यांबद्दल.

भाग ११ अंधारछाया प्रकरण १० - ‘बगतो थोड दीस. मला चोरी मारी करावीशी वाटतिया! ही फुसकी! काय गज वाकवतीया का कुल्प तोडतीया?

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 24/01/2020 12:27 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

दहा मंगला गुरूजींना आलो भेटून सांगलीहून. अजून सत्तेचाळीस माळा व्हायच्या होत्या. गुरूजी म्हणाले, ‘आता तीच करेल जप स्वतः. पाहू काय होतय ते. ही मंतरलेली विभूती देतोय ती फक्त सकाळी लावा. फरक दिसेल. नंतर हे आणि गुरूजी बसले होते बराच वेळ गप्पा मारत. मी बेबीला घेऊन, ब्रेड थोडी भाजीबीजी घेऊन स्टँडवर गेले. हे म्हणाले, ‘लॉर्ड्समधे कटींग वगैरे करून येतो. सावकाश’. बेबी हात पाय धुवून बसली देवासमोर. माळ हातात घेऊन. म्हणाली, ‘करू सुरू माळा? तू आणि मी दोघीही म्हणूया बरोबरच! ‘चला, आज हात धरून म्हणावे लागले नाही म्हणायचे’.

साडेसातीतले वास्तविक उपाय!

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 24/01/2020 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो! आज दिनांक २४/१/२०२० रोजी सकाळी ९.५४ पासून शनी मकर राशीत प्रवेश करेल.याचाच अर्थ असा की वृश्चिक राशीची साडेसाती संपेल आणि कुंभ राशीची साडेसाती सुरु होईल.म्हणजेच एकूणात धनु,मकर,कुंभ या तीन राशींना साडेसाती असेल. साडेसाती आली की सोशल मिडियावर "घाबरुन जाऊ नका.शनीला अभिषेक करा,शनिवार करा अडचणी कमी होतील वगैरे वगैरे त्यात लिहिलेलं आढळेल.एवढंच नाही तर पुढे शनी हा हाडाचा शिक्षक आहे, तो कष्ट देऊन शिकवतो तिथपासून ते आपल्या पूर्वकर्मांची फळेच साडेसातीत मिळत असतात"वगैरे तत्वज्ञान वाटल्याचेही आढळेल. पण वास्तवात असं आहे का?

'तंबोरा' एक जीवलग - ८

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी गुरुवार, 23/01/2020 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज बर्‍याच दिवसांनी आले इथं. दिवाळी अंकातील माझा लेख तुम्ही सगळ्यांनी भरभरून वाचला, आवडला, हे पाहून बरे वाटले. नंतर काही कारणाने माझी भ्रमंती सुरू होती. ती आतापर्यंत. मग लिहायला जमले नाही. तरी चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते. हवाही प्रतिकूल पडली होती त्या मुळे प्रकृतीचे आढेवेढे नेहमीचेच त्यातून आताच जरा सावरलेय पुढे लिहिण्याची थोडी उमेद वाटते आहे असो. तालिम सुरू झाली इथपर्यंत लिहिले होते. काही हकिकतीही सांगितल्या होत्या. गाणार्‍याच्या आयुष्यात असे किस्से हकिकती असायच्याच.

भाग १० अंधारछाया प्रकरण ९ - आत्ता पर्यंत मेलेले जर मानगुटीवर बसायचे म्हणाले, तर प्रत्येकाला एक एक तरी घ्यावा लागेल उरावर!

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 23/01/2020 12:27 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

नऊ दादा मंगला आत बेबीकडून जप करून घेत होती. पडल्या पडल्या मी विचार करत होतो. आता यापुढे काय होईल? या संबंधी. भूत-पिशाच निकट नहीं आवै । महाबीर जब नाम सुनावै ।। हनुमान चालिसातील चरण आठवला! वाटले की ही भूत पिश्शाच योनी आपण मानतो! एखाद्याचा आत्मा अतृप्त राहिला की त्याची वासनापूर्ती होईतो आत्मा फिरत राहातो अंतरिक्षात. आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. या जन्माची फळे पुढच्या जन्मात भोगायची असे आपले शास्त्र सांगते. पुर्वीचे बारा जन्म आपण कोण कोण होतो याची स्मृती बहिणाबाई सारखी अडाणी संतबाई ही सांगते! इंग्लंड-अमेरिकेतही लोक आहेत बरेच ते ही आठवतात आपला पुर्वजन्म!