Skip to main content

गाईड

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 04/02/2020 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
गाईड १९६५ चा सिनेमा ही इतकीच या सिनेमाची ओळख नाही. गाईड हा सिनेमा आर के नारायणच्या कादंबरीवर बेतलेला सिनेमा ही पण याची ओळख होत नाही. देव आनंदची ओळख बदलणारा सिनेमा, भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक स्वतःचा ठसा उमटवणारा सिनेमा. असे बरेच काही सांगता येईल याच्या बद्दल. मी जेंव्हा पहिल्यांदा हा सिनेमा पाहिला तेंव्हा राजू नावाचा कोणताही आगापीछा नसलेल्या एका तरुणाची कहाणी इतकेच काहीसे समजले होते. अर्थात एस डी बर्मन चे म्युझीक हा मोठाच प्लस पॉईंट होता. यात नेहमी दिसणारा तो उत्साही देवानंद दिसत नाही. सळसळत्या तारुण्याची नव्हाळी वागवणारी वहिदा रेहमान दिसत नाही. जी दिसतात ती पात्रे दिसतात.

वक्तशीर..

लेखक आजी यांनी सोमवार, 03/02/2020 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी अतिशय वक्तशीर आहे. नोकरी करत असताना ऑफिसला मी अगदी वेळेवर जायची. इतकी की सगळेजण"तू काय ऑफिस झाडायला येतेस का?"अशी माझी चेष्टा करायचे. मी ऑफिसात पोहोचायची तेव्हा कुणीही आलेलं नसायचं. माझी केबीनही साफ केलेली नसायची. टेबल पुसलेलं नसायचं. इतरांवर अवलंबून असलेली माझी कामं खोळंबायची. कँटीनमध्ये कॉफी,खाणं तयार नसायचं. एकूण मीच भोटम ठरायची. कुणी मला पाच वाजता एखाद्या ठिकाणी बोलावलं तर मी पाचच्या ठोक्याला,नव्हे पाच दहा मिनिटं आधीच तिथं जाऊन पोहोचते. त्यासाठी घरातून कितीला निघायचं त्याचा मी हिशेब करते.

सनकी भाग ९

लेखक शब्दांगी यांनी सोमवार, 03/02/2020 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
कायाने सुधीरला रिचाचा काही तरी बंदोबस्त करायचा म्हणून बोलावले होते. काया पीत हॉलमध्ये सोप्यावर बसली होती. सुधीर तिच्या समोर खुर्चीवर बसला होता. काया खुपच जास्त झाली होती. काया बोलू लागली. काया,“ तुला थोडी घे म्हणाल तर नको म्हणतोस,राहू दे नको तर नको.”अस म्हणून तिने तिच्या हातातला ग्लास रिकामा केला. सुधीर, “ दि तू काही तरी काम आहे म्हणून मला बोलवले होतेस आणि हे काय तू पीत बसलीस?”तो नाराजीनेच म्हणाला. काया,“ काम आहे म्हणूनच बोलावले आहे तुला; कामाचा आणि पिण्याचा काय संबंध? बरं ऐक ती रिचा आहे ना ती माझ्या खुप डोक्यात चाललीय. सतत माझ्या शिवीनच्या मागे- मागे फिरते.

शोध बांग्लादेशींचा एक वेगळ विश्लेषण

लेखक माहितगार यांनी सोमवार, 03/02/2020 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
trends.google.com हि एक गूगलची रोचक सेवा आहे. जिचा आधार मिपावर माझी विश्लेषणे देण्यासाठी मी वेळोवेळी केला आहे. महाराष्ट्र विधानसेभेच्या निवडणूकपुर्व काळात शरद पवारांची शोधप्रीयतेचा आलेख चढतो आहे हे मी सांगितल्यानंतर बहुतेकांना माझ्या विश्लेषणांवर विश्वास वाटला नव्हता. असो, या वेळी गूगल ट्रेंडच्या साहाय्याने जरासे वेगळे विश्लेषण विश्लॅषण भारतातील बांग्लादेशींचे! मी सुरवातीसच गूगल ट्रेंडचा दुवा दिला आहे. मी म्हणतो तशा पद्धतीने आपणही गूगल ट्रेंड्सवर शोध देऊन विवीध शक्यतांचा अभ्यास करू शकता.

भाग १६ अंधारछाया अंतिम प्रकरण १५ - ‘पकडा! पकडा! तिच्या वरल्या सावलीला जाळून टाका’ म्हनायला लागला.

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 02/02/2020 23:41 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

पंधरा शशी लाकडं जमवायला पोर येत होती. सकाळपासून मी माझी बॅट, स्टंपा आत टाकल्या कोठीच्या खोलीत. बागेतल्या कॉटच्या फळ्या घरात टाकल्या आणि फाटकाशी होतो लक्ष ठेऊन. कुणी पोरं येत नाहीत ना पहायला! मन आत होते. मावशीपाशी. गेल्या अमावास्येपासून पंधरा दिवसात बोलत नव्हते कुणी फार. दादा रामायणाचे वाचन करीत, ऑफिसमधून आले की. आई मावशीकडून जपाच्या माळा करून घेई. कुणीच कुणाशी गप्पा मारत नव्हते. ना हसून खेळून होते. त्यात आज पौर्णिमा. दादा आईला सांगत होते, ‘आज पुन्हा जपले पाहिजे तिला म्हणून’. परवा माझ्याच्याने राहाववले गेले नाही.

मराठी सिनेमा पॅरॅडिसो.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 02/02/2020 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा पॅरॅडिसो हा चित्रपट बर्‍याच जणांनी पाहिली असेल. म्हणून या लेखाचे नाव असे ठेवले आहे.... .....परवा एक मित्र सिनेमाला गेला होता. सिनेमा झाल्यावर त्याने माझ्या घरी चक्कर मारली. रविवार होता आणि सिनेमाचे तिकीट फारच जास्त होते अशी त्याची तक्रार होती. मी विचारले किती होते तिकीट? "चारशे'' त्याने उत्तर दिले. मला तिकीट महाग झाले आहे याची कल्पना होती पण ती त्याच्या पगाराच्या १% असेल याची मात्र मला मुळीच कल्पना नव्हती. हे त्याच्या लक्षात आणून दिल्यावर मात्र त्याने हळहळ व्यक्त केली पण तो परत तेथेच सिनेमाला जाणार आहे याची मला खात्री आहे. दुसरा पर्याय त्याच्याकडे नाही.

मुंबई-पुणे-मुंबई (भाग २)

लेखक सौरभ नेवगी यांनी रविवार, 02/02/2020 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
१ फेब्रुवारीला लग्न समारंभ उरकल्यानंतर आतील पुण्यातला गोंधळ पाहिला आणि २ तारखेला भावासोबत outskirts मधली शांतता अनुभवली. ३ तारखेला रविवारी परततीचा प्रवास करायचा होता. रात्री उशीरापर्यंत बॅग भरायचा प्रोग्रॅम सुरू होता. २-३ दिवसाचे माझे कपडे मी ३१ आधीच पुण्याला पाठवले होते, आता ते परत बदलापूरला मलाच आणायचे होते. त्यात किलोभर चितळे भाकरवडी होतीच. २-३ lit पाणी, १ रेडबूलचा कॅन, अंडी असा सगळा ६-७ किलोचा संसार पाठीवर येणार होता. भाकरवडीला चिक्कीची सोबत लोणवळ्याला होणार होती. रविवारी ६:०० ला निघायच ठरवल आणि मी ६:३० नंतर भावाच घर सोडल.

'इमॅजिन' (कल्पना कर...)

लेखक कुमार जावडेकर यांनी शनिवार, 01/02/2020 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
(जॉन लेनन यांच्या 'इमॅजिन' या गीताचा स्वैर अनुवाद) सहज कल्पना कर, स्वर्गच नसेल तर.. नरकही नसेल अन् होईल आकाश घर! (कल्पना कर, जगेल जग आजचा प्रहर) न देश, न देशभक्ती मारण्या-मरण्यासाठी न धर्मही जीवनी या भरण्यासाठी जहर (कल्पना कर, शांतता पसरेल दूरवर) भासेल एकले स्वप्न, येतील ज्यात सकल... अन् भिंतींविना दिसेल जग नितांत सुंदर! (कल्पना कर, दृष्टीत येईल उंच शिखर) लोभ, मोह ना अपेक्षा, उपेक्षाही ना कुणाची निनादेल दाही दिशा विश्वबंधुत्वाचा स्वर! (कल्पना कर, होईल हे विश्व बलसागर) भासेल स्वप्न हे माझे, येतील ज्यात इतर... अन् भिंतींविना दिसेल जग नितांत सुंदर! (कल्पना कर, दृष्टीत येईल उंच शिखर) - कुमार
काव्यरस

भाषेतला आप आणि पर

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/02/2020 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रात जवळ जवळ पासष्ट बोली बोलल्या जातात. अनेक बोलीभाषेत पुस्तकेही निघू लागलीत. त्या त्या बोलीतले बरेच व्यासंगी लेखक आहेत. ते सातत्याने आणि विपुल लेखन करीत असतात. शोध व संशोधनात्मक निबंध लिखाणही करीत असतात. विविध चर्चासत्रांतून सादर करत असलेल्या निबंधांसाठीही ते खूप मेहनत घेतात. विद्यावाचस्पती शिस्तीच्या अभ्यासातून त्यांची शैक्षणिक जडणघडण झालेली असल्याने त्यांच्या लिखाणाला वजन प्राप्त होते. त्यांची मातृभाषा जी बोलीभाषा असते त्या बोलीबद्दल साहजिकच त्यांना आत्मियता असते. आपल्या भाषेवर ते भरभरून प्रेम करतात. ते रास्तच आहे.

भाग १५ अंधारछाया प्रकरण १४ - ‘अहो, या पोरटीला घरातून घालवा बरं! माझ्याने आता सहन नाही होत.

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 31/01/2020 19:23 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

चौदा मंगला अशी बोलली ही गधडी तडा तडा. मला सुचेना काय करावं! एरव्ही एक थप्पडच ठेऊन दिली असती. असं अद्वा तद्वा बोलली असती ती तर. पण शारीरिक त्रासानं आधीच बेजार त्यात अमावास्याची रात्र! मी ही आवरलं मनाला. बराच वेळ पुटपुटत होती काही काही. मग आम्ही गाद्या टाकल्या. पडलो. तरी मनातून काही केल्या जाईना तिचे बोलणं. काकांनी पाठवली तिला अभ्यास करायला. तब्बेत सुधारायला. पण हिचं हे लचांड निस्तरता निस्तरता आलेत नाकी नऊ. बरं काकांना कळल तर म्हणतील तुला कोणी सांगितलं होते हे नसते धंदे. त्यांचा आधीच भुता-खेतांवर विश्वास कमी.