पार्टी
३१/१२/२०१९
वेळ:संध्याकाळ
अजून घेणार आहेस
नको, उद्या त्रास होईल
काही नाही होत रे, हाच प्रॉब्लेम असतो तुम्हा कधीतरी करणाऱ्यांचा. फार थोडक्यात आटपता.
अरे काय करू तुझ्या सारखे आम्ही पिढीजात नाही, आमच्या वंशावळीत हे सेवन करणारे आम्ही पहिलेच, त्यामुळं जपून करावं लागत. घरी कळलं तर पिताश्री हाकलून काढतील.
हो यार, पाहिलंय तुझ्या घरात मी. एकदा चुकून नाव काढलं तरी तुझा बाप मी धर्म भ्रष्ट केला असं बघत होता.
जाऊदे आज तुझे बाबा कंपनी द्यायला नाहीयेत?
अरे आई बरोबर गावी गेलेत. नाहीतर दोघांनीही मस्त कंपनी दिली असती.
हातावरील पोट
तसं पाहिलं तर मिपावरून जवळपास मी रजाच घेतली आहे. माझ्या दोन लेखांवरील काही आक्रस्ताळ्या, मुजोर आणि हीनतेचा तळ गाठणारी एक प्रतिक्रिया यामुळे मी लिहिणं आणि प्रतिसाद देणं थांबविलं आहे. सहसा प्रवाहाविरुध्ध मतं मांडताना अवहेलना हि अपेक्षितच असते. परंतु कधी कधी आब राखणं आपल्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक असते. त्यामुळेच असा निर्णय मी घेतला आहे. आता या लेखाच्या निमित्ताने मी प्रकट होत आहे त्याचे कारणच तितके महत्वाचे आहे.
कष्टकरी लोकांची आपल्याला आठवण सर्वसाधारण पावसाळ्यात होतेच होते.
दिवस... पक्ष्यांचा, आणि माणसांचा!
सकाळ उजाडली, उन्हं अंगावर आली तरी आपापल्या घरट्यात आज पक्ष्यांना जागच आली नाही. कशी येणार? रस्त्यावर आणि आजुबाजूला कुठेही कसलाच आवाजही येत नव्हता. गाड्यांच्या आणि कर्कश्श आवाज करीत पहाटरंगी प्रकाशाला चिरत पळणाऱ्या मोटारसायकलींचा सवयीचा ध्वनी अजून कानावरही पडलाच नव्हता. कॅरियरला लटकावलेल्या दुधाच्या किटल्या सांभाळत सायकल चालविताना रस्त्यावरच्या खड्ड्यात सायकल आदळून होणारा किटल्यांचा आवाजही उजाडल्याची वर्दीच देत नव्हता.
तमसो मा ज्योतिर्गमय ...
तमसो मा ज्योतिर्गमय ...
मुख्याध्यापक केतन कदम सरांनी आपला शाळेचा फेरा संपवला. ते नेहमी शाळेत शाळा सुरु होण्याआधी अर्धा तास शाळेत येत आणि सर्व शाळेत एक फेरी मारीत असत. सगळीकडे अगदी बारीक नजरेने पहात ते आपल्या हातातील एका वहीत आपली निरीक्षणे नोंदवून ठेवीत असत. मग ऑफिसमध्ये गेले की योग्य व्यक्तीला ते ते काम सुपूर्त करत असत . असा त्यांचा दिनक्रम असे. आपण काम केव्हा सांगितले आणि ते केव्हापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे हे पण त्या व्यक्तीशी बोलून ते त्या वहीत ते नोंद करून ठेवीत असत. शाळेच्या पटांगणात दोन तीन महिन्यापूर्वी लावलेल्या झाडांची निगा हा त्यांचा आवडीचा विषय होता.
मोगँबो - २
हा सारंग ना नेहमी असेच करतो. ढोलकीवाल्याला आणायला दुसर्या कोणाला पाठवलं असते तर निदान तो तरी मिळाला असत अगिटारवर. हा कार्यक्रम होऊन जाऊदेत मग बघु या त्याला. "अरे हे आपण दरवेळी ठरवतो आणि होतं काय! कार्यक्रम झाला की सारंगसाहेब अभिनंदन स्वीकारत बसतात. आणि आपण लोकांना दिसतही नाही. " मीनाच्या बोलण्यात तक्रारीपेक्षाही कौतूकाचाच सूर होता. तीच काय पण सारंग बद्दल कोणीही तसेच बोलायचा. होताच तसा तो.मागील दुवा : http://misalpav.com/node/46242 मीना च्या बोलण्यात तथ्य आहे या अर्थाने सर्वांनीच माना डोलावल्या.
कृतघ्न -5
याआधीचे भाग
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154
भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159
भाग 3: https://www.misalpav.com/node/46183
भाग 4:
https://www.misalpav.com/node/46203
आता पुढे
माऊली विचारात पडला कि या बाबतीत स्वतः हस्तक्षेप करावा कि नाही, रामदास ला तुकाराम च्या भरोश्यावर सोडून द्यावे कि आपण मदत करावी.
मास्कमधून
नाहीत तुला पाय तरी
देशोदेशी जाशील
गावागावा-वस्त्यांमधून
द्वाडासारखा फिरशील
तुझी असंख्य भावंडे
माजवतील हाहाकार
पण घे लक्षात, आमच्यात
आहे शिल्लक प्रतिकार
जितका झपाट्याने तू
पोखरत जाशील आत
तितकीच उसळून उठेल
अशी माणसाची जात
माणूस मारणं कदाचित
असेल सोपं काम रे
पण दाखव जिंकून त्याला
म्हणशील मनात 'राम रे!'
माहिती नसेलच तुला
जगणं-जगवणं कोरोना
बघ बापाला, मास्कमधून
पापी पोराला देताना
संदीप भानुदास चांदणे (२२/०३/२०२०)
काव्यरस
मिसळपाव