Skip to main content

उत्तर शोधायचे आहे!

लेखक ॐकार यांनी सोमवार, 31/03/2008 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
ओशो रजनिश यांच्या संत कबीरांवरील प्रवचनांचे भाषांतर वाचण्याचा योग आला. त्यात ओशोंनी पुढील दाखला दिला आहे - एकदा चार बायका एक प्रसिद्ध सूफी संताकडे ज्ञानप्राप्तीकराता जातात आणि त्याने गुरू बनावे अशी विनवणी करतात. त्यांना त्याच्याकडून ज्ञान म्हणजे काय हे समजून घ्याअय्चे असते. परंतु सूफी संत मात्र तयार होत नाही. त्या बायका तश्याच दाराशी भुकेल्या तहानलेल्या बसून राहतात. अखेर त्याला त्यांची दया येते. तो त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवतो. परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या स्त्रीला शिष्या करून घेण्यास तो तयार होतो.

नशीब एकेकाच

लेखक सुवर्णमयी यांनी सोमवार, 31/03/2008 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
तिने कपाटाचे दार उघडले आणि आत न बघताच हातातले खोके आत भिरकावून दिले. अगदी त्यात काचेची वस्तू आहे अथवा नाही याची एवढीही फिकीर न करता. आत पडताक्षणी मी बघितले तर माझ्यासारखेच काही खोके तिथे होते. काही आपल्या शोभिवंत कागदातून बाहेर आले होते तर काही माझ्याच सारखे रंगीबेरंगी कागदात बंदिस्त. "ए ,ओळखलेस का? " एकदम आलेल्या प्रश्नाने मी जरा बावचळून गेलो खरा. पण लगेचच आठवले की काही महिन्यांपूर्वी त्या खोक्याला मी भेटलो होतो. आमचा अगदी सार्वजनिक पंचनामा झाला होता. वेष्टनातून काढून अगदी आतून बाहेरून लोकांनी आम्हाला बघितले होते.

महाराश्ट्र अन्धरात .. पुण्याचे मात्र लाड

लेखक पान्डू हवालदार यांनी रविवार, 30/03/2008 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
अक्खा महाराश्ट्र अन्धारात बुड्लेला असतान्ना .. पुण्यात झगझगाट ....महावितर् ण मन्त्रि म्ह्ण् ण ता त .. पुणेरी जनतेला काही देणे घेणे नाही ... प्रतिक्रिया ..???

रविवार विशेष

लेखक सृष्टीलावण्या यांनी रविवार, 30/03/2008 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही. बुवा लिहितात - पार्थ म्हणे गा हृषीकेशी, या युद्धाची ऐशीतैशी, बेहत्तर आहे मेलो उपाशी, पण लढणार नाही. धोंड्यात जावो हि लढाई, आपल्या बाच्याने होणार नाही, समोर सारेच बेटे, जावाई, बाप, दादे, काके. अरे लढाई असते का सोपी .. मारे चालते कापाकापी, कित्येक लेकाचे संतापी मुंडकी ही छाटती.

बाबूराव बागुल

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 30/03/2008 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
माणसासाठी लढलेला माणूस. दलित, शोषित, पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे बाबूराव बागुल. 'वेदाआधी तू होतास, परमेश्वराच्याआधीही तू होतास' अशा शब्दातून माणसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबूराव बागुल मराठी साहित्यातले एक मोठं नाव. बाबूराव बागुलांचे ' जेव्हा मी जात चोरली होती' हा कथासंग्रह वाचण्यापूर्वी, साहित्य केवळ ललित असते, ते दलित वगैरे नसते आणि साहित्याचे प्रयोजन केवळ मनोरंजन, आनंदच असते. या वाचन परंपरेला या कथासंग्रहाबरोबर नामदेव ढसाळांच्या गोलपीठा वाचल्यानंतर तडा गेला.

शिवाजी राजे मराठा कि राजपुत ...?

लेखक पान्डू हवालदार यांनी शनिवार, 29/03/2008 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
राजे शिवाजी ... मुळचे सिसोडिया ...रजपुत ... मराठा नव्हेत ..... आपल्याला काय वाट्त ... चर्च्या फक्त लेखा वर लेखकावर नको ...म्हन्जे चच्र्चे ला मजा येइल ...

एप्रिल फ़ूल

लेखक सुधीर कांदळकर यांनी शनिवार, 29/03/2008 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक एप्रिल. एक जादुई दिनांक. या दिवशी असे काय घडले असेल की आपली बुद्धि गायब होते? याचा संबंध बहुदा कालगणनेशी असावा. ग्रेगोरियन कॅलेंडर आस्तित्त्वात येण्यापूर्वी बहुधा दहाच महिने आस्तित्त्वात होते. मी इतिहासज्ञ नसल्यामुळे मला तपशील अचूक ठाऊक नाही. पण आपल्या संकेतस्थळावर लिहिणारे तज्ञ वस्तुस्थिती लिहितीलच. (प्रियालीताई बोरू सरसावा बरे.) तर नव्या महिन्यापैकी एप्रिल हा एक असावा. आणि दिनांक लिहितांना नवीन महिना ज्ञात नसल्यामुळे किंवा सवईमुळे एक एप्रिल ऐवजी एक मे अशी तारीख लोक लिहीत असवेत. जसे आपण जानेवारीच्या आठदहा तारखेपर्यंत जुनेच वर्ष टाकतो. चूक झाली तर खिल्ली उडविण्याचा लोकांचा हक्कच आहे.

जे घुसळे रवी

लेखक अजय जोशी यांनी शनिवार, 29/03/2008 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो दही घुसळून लोणी काढणारी रवी असतो कवीला माहीत घुसळणे फक्त स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो स्निग्धतेच्या अंशासाठी जग सारं धावतंय रवीचं चाक गरागरा फिरतंय तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो

'केशवा' अजब तुझे अवतार!

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 29/03/2008 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
मि.पा.चे विडंबनाचार्य केशवसुमार ह्यांनी दोन दिवस मि.पा.करांना अत्यवस्थ करुन सोडले आणि नंतर पुन्हा झकास विडंबनाने एंट्री मारुन एक सुखद धक्का दिला त्याबद्दल त्यांना हे विडंबन सादर! शब्दप्रभू गदिमांचे शब्द 'उध्दवा अजब तुझे सरकार' ही आमची प्रेरणा! 'केशवा', अजब तुझे अवतार!