Skip to main content

पुनुकु

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 24/06/2008 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
पुनुकु साहित्य--एक वाटी तांदूळ,अर्धा वाटी उडदाची डाळ,बारीक चिरलेला कांदा,मिरचीचे तुकडे,मीठ्,कोथिंबीर,तेल क्रुती-रात्री तांदूळ व डाळ वेगवेगळी भिजवावे,सकाळी मिक्सरवर एकत्र बारीक वाटावेत,नंतर त्यात कांदा ,मिरची,कोथिंबीर,मीठ व थोडे तेल घालून मिश्रण एक्जीव करावे,मिश्रण इडलीपीठाइतपत सैलसर ठेवावे.तेल तापवून भज्यांसारखे लहान लहान गोळे त्यात सोडून तळावेत.कोणत्याही पातळ चटणीबरोबर खायला द्यावेत

छत्रपती शिवरायांची माणसे - यावरील पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन आणि वितरण

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 24/06/2008 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा चे समस्त सुजाण वाचक, सप्रे नमस्कार. मी गेले बरेच दिवस "छत्रपती शिवरायांची माणसे" यावर क्रमशः लिहितोय्.यापैकी प्रथम भाग : बाजी पासलकर लिहून तयार आहे.या संबंधात मी अनेक प्रकाशकांशी बोललो आणि काल या सगळ्याचा गोषवारा काढला तो पुढीलप्रमाणे : १. हे ३२ पानी पुस्तक आहे ज्याची किंमत ३५/- रुपये आहे. २.

अरे संस्कार,संस्कार

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 24/06/2008 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
"अमेरिकेत प्रथमच येणाऱ्यानी आपले जूने संस्कार विसरूं नयेत, तसंच इथल्या चांगल्या गोष्टी शिकून आपली सुधारणा करून रहावं.इकडच्या गोष्टीचं अंधानूकरण करून राहिल्यास आपलीच पंचाईत करून घेतो.याची नंतर खंत करणं हे काय बरोबर नाही." असं एकदा प्रो. देसाई मला भेटताभेटताच म्हणाले. मी त्याना म्हणालो, " हे बघा भाऊसाहेब कायदा न मोडता आपल्याला हवं ते करायला इकडे स्वातंत्र आहे.संस्कार म्हटलंत तर "तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा"हेच इकडचे संस्कार आहेत"कसले संस्कार घेऊन बसलात?" थोडसं नाराज होवून मला महणाले, "सामंत,बहिणाबाईची ती कविता आठवते का? अरे संसार संसार.

जिवलगा...

लेखक फटू यांनी मंगळवार, 24/06/2008 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
व्हायचं ते तसं होऊन गेलं आहे फक्त आठवणी उरल्यात आता कालचा दिवस केव्हाच संपला आलीस सोडून तू काटेरी वाटा समजायचं तसं ते एक वादळ होतं आयुष्याला फिरवून ते निघून गेलं किती खंबीर आहेस तू मनाने हेच जाता जाता त्यानं जाणवून दिलं वेदनांमधून सार्‍या बाहेर पड आता एक छान हसरं आयुष्य दिसेल तुला पुन्हा एकदा भर मनात उत्साह जरा दिसेल जागोजागी प्राजक्त फुललेला तुझ्या निरागस भावी आयुष्यामध्ये माझी भाबडी साथ तुला चालेल का तुझा जीवनसाथी होण्याचं भाग्य जिवलगा, सांग मला मिळेल का ? (ही कविता ऑन डिमांड पाडलेली आहे.
Taxonomy upgrade extras

कांदेपोहे - सनई चौघडे चित्रपटातुन

लेखक अथांग सागर यांनी मंगळवार, 24/06/2008 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
कांदेपोहे- सनई चौघडे चित्रपटातुन भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मन न् कांती, पुढील सर्व काव्य येथून काढून टाकलेले आहे.

उद्धवा! अजब तुझे सरकार

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 24/06/2008 03:20 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस उजाडूनी होतो सुरू होतात अवहेलना अन तक्रारी त्याही पेक्षा ती रात्र बरी उजळणी होते रात्रीची स्मरूनी बाचाबाची सकाळची तू तू अन मी मी ची अन खऱ्या खोट्याची उद्धवा! अजब तुझे सरकार जनार्धनाची हीच तक्रार तुझ्याच दारी न्यायमंदिरी खोटे बोलणे झाले असुनी खरे मानण्याची कसली जबरी सत्तेची ही कसली खूमखूमी श्रीकृष्ण सामंत

दाखविली मातेची व्यथा कौतुके

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 23/06/2008 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
तू जन्मी येता देवून प्रचंड वेदना न्याहळते ती तुला घेवून गोड चुंबना घेई तुला ती माऊली पोटाशी रडून मात्र तू जग डोक्यावर घेशी वेळी अवेळी जवळ घेवूनी पाजिते ती तुला घेवूनी पदराशी दुदु पिताना तू मात्र तिला लाथेने धुसक्या मारिशी शिकविले चालण्या जिने तुला हांक मारता दूर धावशी सोडून तिला तुला खेळण्या आणे ती खेळणी एक एक करूनी टाकशी तू मोडूनी गोड खाऊ करूनी देते तुला बशी जमिनीवर तू खाऊ तुझा उडवून देशी छान छान कपडे तुला तिने आणिले खेळुनी मातीत तु ते सर्व मळविले शिकवीण्या शाळेमधे घेवून गेली तुला न जाण्याचा रडूनी गोंधळ तू घातला संगीत शिकण्या दाखल केले शाळेला रियाज करण्याचा सराव तू सोडुनी दिला मित्रासंगे

कहाणी अक्कलदाढेची: भाग दोन

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी सोमवार, 23/06/2008 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
".. पण डॉक्टर अक्कलदाढ येता॑ना माझा गाल का सुजलाय.. असह्य दुखत॑य..दोन दिवस झोप नाहिये.. सेशनल्स तो॑डावर आल्यात आणि ही दाढ मला हातात पुस्तक घेऊन देत नाहिये.." मेघनाच्या डोळ्यात पाणी आल॑ होत॑. अक्कलदाढ तो॑डात उगवण्याचा प्रयत्न करीत असेल तर पुष्कळदा शेजारच्या दाढेच्या मुळा॑वर खूप दाब पडतो व त्यामुळे वेदना होतात. सामान्यतः दाताच्या वेदना फक्त एकाच जागी जाणवत नाहीत (लोकलाईझ होत नाही) तर जबड्याची ती बाजू व आसपासचे अवयवसुद्धा (कान, डोके इ.) ठणकतात. (पेन रेडिएट होते). क्वचित प्रस॑गी कानात वेग-वेगळे आवाजही येतात (टिनिटस).

MANGO- LASSI

लेखक राधा यांनी सोमवार, 23/06/2008 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- एक वाटी आंबट दही, एक वाटी आंब्याचा रस किंवा चिरलेला आंबा, चवीला साखर , वेलची पुड क्रुती :- १) दही रवीने व्यवस्थीत घुसळून घ्यावे २)आता त्यात आंब्याचा रस, साखर व वेलची पुद घालावी ३)थोडे पाणी घालुन पुना चांगले घुसलावे ही लस्सी फ्रीज मधे थंड करावी किंवा बर्फ टाकुन प्यायला द्यावी.

आम्‍ही आणि आम्‍ही लावलेले दिवे

लेखक विकी शिरपूरकर यांनी सोमवार, 23/06/2008 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
संकलनः विकास शिरपूरकर फिल्मोग्राफी 1. आमिर खान बॉलीवूड मध्ये ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमीर खान चित्रपटांमध्ये चॉकलेटी हिरोच्या रूपात स्थिरावला. प्रत्येक चित्रपट करताना त्याबद़दल प्रचंड 'चुझी' असलेल्या आमीरने आपल्या अनेक वर्षांच्या कारकीर्दीत खूप कमी चित्रपट केले. एरवी कोणत्याही पुरस्कार व प्रसिद्धीपासून दूर राहणारा आमीर सध्या आपला ब्लॉग लिहायला लागल्यापासून बराच चर्चेत आला आहे.