लेखकचतुरंगयांनी मंगळवार, 13/01/2009 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
"हे ऽऽ काऽऽऽप्पेऽऽऽ" असं बेंबीच्या देठापासनं ओरडत, उन्हानं तावलेल्या लालबुंद चेहेर्यानं गच्चीवरुन धावत जायचं आणि अनवाणी पायांना चटके बसत असले तरी गच्चीवरल्या कुंभीवर चढून कापला गेलेला पतंग कोणत्या पोरांचा होता हे टाचा उंच करुन शोधायचं हे दृश्य आता माझ्यासाठी तरी इतिहासजमा झालं आहे.
जानेवारी महिना आला तरी थंडी सुरुच असायची पण सकाळी-सकाळी उन्हात एकप्रकारचा प्रेमळ उबदारपणा जाणवायला सुरुवात झालेली असायची. संक्रांतीआधी तीनचार दिवस आम्ही मित्रमंडळीचा एककलमी कार्यक्रम पतंग बनवणे आणी मांजा सुतवणे. त्याची तयारी सुद्धा साग्रसंगीत असायची. आधी बाजारात जाऊन मजबूत धागा असलेला दोरा घेऊन येणे.
लेखकविजुभाऊयांनी मंगळवार, 13/01/2009 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
तु बोललीस ते मी ऐकले नाही
मी बोललो काही ते तू ही ऐकले नाही
जरूर नव्हतीच तेंव्हा त्याची
शब्द मुके झाले होते
हातात हात तुझा घेता
स्पर्ष भाषा उमगले होते
ती संध्याकाळ थोडी आगळीच होती
प्रकाश रंगांची सुगंधी उधळण वेगळीच होती
असतो मी एकटाच जेंव्हा
ते सारे गूज आठवते तेंव्हा
तो सोन प्रकाश धावून येतो
रंगांची ती पखरण
पुन्हा सवे घेऊन येतो
मी मोहोरतो , बावरतो
तू नाहीस म्हणून कावरा बावरा ही होतो.
मग काय अचानक जादू होते;
मला तुझ्या स्पर्षाची जाणीव होते
मी माझीच बोटे चुंबतो
डोळे मिटुनी तुला अनुभवतो
लेखकप्राजुयांनी मंगळवार, 13/01/2009 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
एका छोटीचे मनोगत..
कशाला गं आईनं असं मला माललं..
ललून ललून नाक माझं लाल लाल झालं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???
अंगणामध्ये गेले होते बिश्किट खात खात..
टॉमी तिथे बसला होता त्याचा खाऊ खात..
माझ्यातलं थोलं बिश्किट मी त्याला शुद्धा दिलं..
त्याच्या भांड्यातलं थोलं मी ही खाल्लं..
सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं??
बाबांचा पांधला पांधला रूमाल मला मिलाला
त्याच्यावर केचपचा मी लाल सूर्य काढला..
त्यावर मग मी थोडंसं दूध सुद्धा ओतलं..
लेखकअविनाशकुलकर्णीयांनी मंगळवार, 13/01/2009 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो..संक्रांतिला "तिळगुळ घ्या अन गोड बोला"असे म्हणत आपण आपल्या मित्र मैत्रीणिना तिळ्गुळ जरुर द्या पण वाचा आपल्या पुर्वजांच्या रण धुमाळिचि कहाणी...दोन अश्रु डोळ्यातुन बाहेर पडुन त्यांना आदरांजली देवु यात..व त्यांचे स्मरण करु यात....
आज संक्रांत.
संदर्भ - पानिपत -लेखक श्री. विश्वास पाटिल.
आज संक्रांत. संक्रांतिचा दिवस म्हटला की मला आठवतो तो जानेवारी १७६० चा दिवस. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट. याच घाटावर अब्दाली, नजिबखान रोहिला आणि कुतुबशहाने दत्ताजी शिंद्यांवर छापा घातला. घनघोर रणसंग्राम झाला.
लेखकअभिजीत मोटेयांनी मंगळवार, 13/01/2009 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
काल सोमवार म्हणून सहपरीवार शिवमंदिरात गेलो होतो. त्याच वेळी एक सुशीक्षीत कुटुंब मंदिरात आले आणि त्यांच्यापाठोपाठ त्या मंदीराचि पुजारीन धावत आली. आली तशी त्यांच्यावर ओरडायला सुरवात, "तांब्यात काय हाय तुमच्या, दुध आसल तं पिंडीवर वतु नका". तो (कुटुंबप्रमूख) पडला हिंदी, बावळ्यासारखा त्या बाईच्या तोंडाकडं बघू लागला. परत पुजारीन ओरडली "तांब्यात काय हाय तुमच्या, दुध आसल तं पिंडीवर वतु नका. सातच्या नंतर पिंडीवर काय वतायचं नाय. आताच सगळं नीट धून घेतलय". हा आपला परत तीला वीचारअतोय, "क्या हूंऑ". "क्या हूआ क्या राती सात नंतर काय वतायचं नाही देवावर".
लेखकसुनील मोहनयांनी मंगळवार, 13/01/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सरकारने भारतीय नागरिकांना अतिशय सक्षम अशा सुरक्षाव्यवस्थेची हमी दिलेली होती. सर्व राजकारणी लोकांनी अगदी जीव तोडून सांगितले की भारताच्या सर्व तपास यंत्रणा, पोलिस,सी.बी.आय, लष्कर इत्यादींना हाय अलर्ट वर ठेवण्यात आले आहे. पण ह्या सर्व यंत्रणा खरंच कार्यरत आहेत?
बहुधा नसाव्यात अशी दाट शंका यावी अशा दोन बातम्या गेल्या काही दिवसात वाचनात आल्या. आज या दोन घटना घडून सुद्धा अनेक दिवस उलटून गेले आहेत पण सरकार किंवा सुरक्षा यंत्रणा यापैकी कुणाकडूनही काही खुलासा केला गेला नाहीय.