Skip to main content

भुते

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 22/01/2009 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
भुते **भुता बद्दल आपणास काय माहिति आहे का? **भुताचे पाय उलटे असतात का? **उदमांजर नावाच भुत लहान मुलांना पळवुन नेते का? **भुतांचे फोटो काढले गेले आहेत ते खरे आहे का?..आपणा पैकी कुणी पाहिले आहे का??[भुत किंवा फोटो} **हडळ/ डाखीण दिसायला खुप सुंदर असते असे म्हणतात..आपणास काहि अनुभव आहे का? **आसरा, इर, वीर, पिशाच्च, खवीस, वेताळ, गिरा, सटवा‌ई, जखा‌ई, जखीण, कैदाशीण, ड्रॅक्युला, ब्रह्मसमंध, चकवा..डेमन,भानामति..मुंज्या भुत्या..या व्यतिरिकत आपणास आणखि भुते माहित आहे का???? **एखादि स्री जर बाळंत पणात गेली तर तिचे भुत होते व त्याला कैदाशिण असे म्हटले जाते..हि कैदाशिणीला लहान मुले आवडतात...या बद्दल जाणकार

इसकाळचे नवे रूप..

लेखक भाग्यश्री यांनी गुरुवार, 22/01/2009 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच पाहीलं.. सकाळच्या साईटचे रुपडे बदलले आहे! छान दिसतेय आता.. टॅब्स, तुमचा जिल्हा निवडता येणे, असे सगळेच रुप आवडले. पूर्वी फार लवकर वाचून व्हायचा सकाळ.. आता भरपूर बातम्या,विषय इत्यादी भरगच्च आहे असं पहिल्या पानावरून वाटतं.. कदाचित मांडणीमुळे असावे. फाँट बदलूनच घ्या, म्हणजे बदललेला इसकाळ कळेल वगैरे म्हणत आहेत तिथे, पण फाँट काही मला डाउनलोड करता आला नाही! रनटाईम एरर आली, एकंदरीत स्लो झाल्यासारखी वाटली साईट.. :( कदाचित काही दिवसात होईल ठीक.. वेल, तसा काथ्याकुट करण्यासारखा विषय नाहीए. पण एक्साईटमेंट मधे अरे लोकांनी हे पाहीलं का?

पायमोजा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 21/01/2009 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला जेंव्हा पायात मोजा घालायचा असतो तेंव्हा बहुतेक लोक आधि डाव्या पायात पायमोजा घालतात व नंतर उजव्या...असे का? याला काहि खास शाश्त्रीय किंवा मानस शाश्त्रीय कारण असेल का? यावर कुणी प्रकाश टाकु शकेल का? अविनाश

राऊरकेला

लेखक SwanandSolanke यांनी बुधवार, 21/01/2009 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
दिड वर्षांपूर्वी मला स्वप्नात देखिल वाटले नव्हते की, मी एम् टेक करण्यासाठी ओडिसा राज्यात जाईल. ज्या राज्याचा उल्लेख फक्त महानादीच्या पुरापूरता आणि रथ यात्रेपूरता येतो, त्याच राज्यात एक भारत सरकारच्या कायद्यानुसार राष्ट्रीय महत्वाचे इंजीनियरिंग महाविद्यालय आहे, राष्ट्रीय तंत्रद्न्यान संस्था, राऊरकेला , हे त्याचे नाव. असो, मी मिसल पावचा नुकताच सदस्य झालो, भटकंती हा माझ्या अनेक छंदान्पैकी एक, म्हणुन सुरुवात करतांना या राज्याचे सौंदर्य मी आपल्या समोर ठेवत आहे. ओडिसा राज्य जितके निसर्गसुन्दर तितकेच कमालीचे विरोधाभासी आहे.

मनाच्या कुपीतले -क्षण

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 21/01/2009 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा चवथा लेख .........
क्षण
कोणी एक नवा जीव जेंव्हा भूतलावर अवतरतो. तो क्षण त्याचा......... बऱ्याच प्रयत्नानंतर जेंव्हा एक कोवळा जीव टाहो फोडतो. तो क्षण त्याचा. .................. 8-9 महिन्यानंतर चिमुकल्याचे चालणे, ते पहिले पाऊल पडण्याचा क्षण त्याचा. ............. 3 ऱ्या वर्षी जेंव्हा ते बाळ शाळेच्या पहिल्या पायरीवर पाऊल टाकतं. तो क्षण त्याचा. ............. तोच बाळ जेंव्हा । अशी ग ची पहिली रेप ओढतो..... तो क्षण त्याचा............. जेंव्हा एखादा मुलगा पहिले बक्षीस घ्यायला दुडूदुडू धावत जातो.

बजबजपुरी.

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 21/01/2009 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात मराठीतील १/२ चांगली संकेतस्थळे पाहण्यात आली आणि त्याचा परिचय व्हावा म्हणून हा लेखप्रपंच. सर्वात अगोदर चे संकेतस्थळ म्हणजे www.bajbajpuri.com हे स्थळ. या स्थळाचे वैशिष्ट म्हणजे, १. सुंदर असे आरेखन. २. मौजमस्ती, गंमत म्हणून हे स्थळ पहा असा प्रशासनाचा अभिप्राय. ३. आजचे शहाणपण, आ़जची म्हण इत्यादी सदरे ( सदर याचे अनेकवचन चुभुदेघे). ४. मराठी शुद्ध शिका असे म्हणत मनोगत चा दुवा देणे. ५.

महाराष्ट्रातिल गड किल्ले ! इत्यन्म्भुत माहिति

लेखक मानव यांनी बुधवार, 21/01/2009 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातिल गड किल्ले ! इथे बर्याच किल्ल्यान विषयि इत्यन्म्भुत माहिति देन्याचा प्रयत्न केला आहे ! आपल्या प्रतिक्रिया कळवा ,आणखिन अपडॅट लवकरच करनार आहे http://tush9890.blogspot.com/

दिल्ली ते दिल्ली !

लेखक दशानन यांनी बुधवार, 21/01/2009 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
१२ डिसेंबरला घरी जाणार जाणार म्हणून तयारी करत करत मी २२ला जाण्यासाठी मोकळा झालो, पण अचानक टिकीटे तथा काहीच बाकीचे प्लान तयार नव्हते तरी म्हणालो निघायचं आहे तर निघू .. बघू काय होईल ते ! मित्राबरोबर सरळ न्यु दिल्ली रेल्वेस्टेशनला पोहचलो व टिकीटासाठी दोन तास अटापिटा करुन शेवटी मुंबई राजधानीचे टिकीट घेतले व सरळ ४.१५ च्या गाडी बसलो. योग्य वेळ योग्य काम करणे हा माझा धर्मच नाही त्यामूळे गाडीत बसल्यावर विसरलेल्या गोष्टि आठवू लागल्या.. चार्जर घेऊन आला नाहीस.. पैसे सुट्टेच खिश्यात आहेत... नशीब एटीम तथा क्रिडीट कार्ड घेऊन आला आहेस नाही तर मुंबई मध्ये बस भीक मागत..

बेळगाव नक्की कुणाचे?

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी बुधवार, 21/01/2009 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा स॑युक्त महाराष्ट्राच्या चळवळीची 'निपाणी, कारवार, बेळगावसहित स॑युक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!' ही घोषणा गाजू लागली आहे. थोडी-फार कल्पना असली तरी माझ्या पिढीने 'ती' चळवळ पाहिलीच नाही अन त्याविषयी पूर्ण माहीतीही नाही. खर॑ तर सध्याची बरीचशी मराठी मुल॑ कॉन्व्हे॑ट कि॑वा सेमी-कॉन्व्हे॑ट्मध्ये जातात (कि॑वा गेलेली आहेत. उदाहरणच हवे असेल तर माझ्याबरोबर कार्यरत असलेले सत्तर ते ऐ॑शी टक्के मराठी डॉक्टर्स इ॑ग्लीश माध्यमातले आहेत व मराठी वर्तमानपत्रसुद्धा वाचत नाहीत). त्या॑ना स॑युक्त महाराष्ट्र कि॑वा मराठी अस्मिता वगैरे गोष्टी॑बद्दल काडीचे सोयरसुतक नाही. कटू असल॑ तरी सत्य आहे हे.

पाषाण युगामध्ये सुध्दा नालंदा महानगर होते

लेखक दशानन यांनी बुधवार, 21/01/2009 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
बिहार मध्ये नालंदा जिल्हात राजगीर पासुन पचाने नदीच्या जवळ गिरियक पाशी ताम्रपाषाण काळातील एक महानगर शोधुन काढण्यात पुरातनशास्त्रीना यश मिळाले आहे, पाच हजार वर्षा पुर्वी जेव्हा बाकी जग जंगलामध्ये कंद-मुळे खाऊन जिवन व्यतीत करत होते तेव्हा नालंदाच्या घोडांकटोरा मध्ये लोक महानगरीय जिवन सुविधा उपभोगत होते. ते एक समृध्द महानगर होते तसेच ते अखंड भारतातील बाकीच्या १६ महानगरापेक्षा समृध्द होते व ती- ते साढेंतीन हजार वर्ष ते शहर आपल्या समृध्दीच्या उच्चतम सीमेवर होते, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण चे अधीक्षक एन.जी.