Skip to main content

तेथे कर माझे जुळती !

लेखक यांनी सोमवार, 26/01/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
मूळचे केरळचे रहिवासी असलेले रेनिल्सन आणि निशा आपल्या तीन वर्षे वयाच्या मुलीबरोबर घरी परत जात होते.प्रवासात त्यांच्या गाडीला अपघात झाला त्यात निशा जागीच ठार झाल्या. रेनिल्सन यांना अनेक फ्रॅक्चर्स झाली. छोट्या तमन्नाला जबर दुखापत झाली. डॉक्टरांनी तमन्नाला ब्रेन डेड घोषित केले. ही घटना 20 जानेवारीची. पत्नी अपघातात गेलेली, स्वत: मणिपाल येथील हॉस्पिटल मधे जखमी अवस्थेत अशा परिस्थितीत देखील रेनिल्सन यांनी अपूर्व मनोधैर्य दाखवत स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून तमन्नाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

मिपाची वाटचाल आणि इतिहास

लेखक विंजिनेर यांनी सोमवार, 26/01/2009 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
संपादक/प्रशासक मंडळींना रामराम, मिपाचा जन्म कसा झाला हे काही चर्चांमधुन क्वचित जाणवते(जेव्हा विसोबा नाहितर तात्या काही किस्से सांगतात तेव्हा) पण हा सगळा प्रवास कसा झाला आणि ह्या संकेतस्थळाचा चालविता(ते) धनी कोण, त्यांचा परिचय हे सगळे "मिपाचा प्रवास/मिपाची चित्तरकथा" (Category:About Us) अश्या सदराखाली प्रकाशित करायला काय हरकत आहे? मी मिपाचा सदस्य झाल्यापासून बराच शोध घेतला पण काही सापडले नाही म्हणून विचारत आहे.

ही तशी माझीच आहे गोष्ट पण...

लेखक घाटावरचे भट यांनी सोमवार, 26/01/2009 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकरांची 'ही तुझी माझीच आहे गोष्ट पण....' ही ग़झल. आज मी सारे खरे ते सांगतो मी अताशा नवकवींना टाळतो ते गळी पडणार अंती जाणतो पण तरी मी पूर्ण फिल्डींग लावतो संकटे साहीन मी अन वादळे नवकवी पण धैर्य माझे भेदतो तो पहा मी चाललो वाटेवरी शत्रू माझा वाट माझी रोखतो ऐकताना काव्य त्याचे का मला काळ पुढती जाईनासा वाटतो जांभया देऊनही मी एवढ्या काव्य साला तेच आहे वाचतो सूड म्हणुनि गोष्ट माझी ही कधी मुक्तछंदी मी कुणाला सांगतो टाळती का लोक पण मज ना कळे कालचा मी नवकवी ना आज तो - भटोबा

द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन (२००८)

लेखक अभिजीत यांनी सोमवार, 26/01/2009 03:57 या दिवशी प्रकाशित केले.
द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन (२००८) न्यु ऑर्लिंस मधे एका बाळाचा जन्म होतो तो जराजर्जर व्याधीग्रस्त शरिर घेउनच... त्यात जन्म देणारी बाळाची आई जगाचा निरोप घेते आणि त्याच तिरमिरीत बाप त्या बाळाला एका वृद्धाश्रमाच्या आश्रयाला सोडुन देतो. तिथली कनवाळु केयरटेकर क्वीनी त्याला सांभाळायचा निश्चय करते आणि त्याचं नाव ठेवते "बेंजामिन" ... चित्रपट सुरु होउन १५ मिनिटातच चमत्कृतीपूर्ण घटना आणि विविध धक्कादायक प्रसंग पाहुन प्रेक्षक सरसावून बसले नाहीत तरच विशेष! तर पुढे - शरीर ऐंशीच्या घरातल्या वृद्धासारखे आणि भरीला शारिरीक व्याधी त्यामुळे डॉक्टरांच्या मते ते बाळ जगणं जवळजवळ अशक्यच ...

हे तसे माझेच आहे काव्य पण..

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 26/01/2009 02:29 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा आनिरुद्ध अभ्यंकरांची कविता ही तुझी माझीच आहे गोष्ट पण...

चेहरा सारेच खोटे सांगतो
याचसाठी आरसा तुज दावतो

मज तडी पडणार अंती जाणतो
मी तरी मेसेज 'तसले' धाडतो

कोंबले मी पोट टीशर्टामध्ये
फुंकरीने फुगवल्यागत वाटतो

यायची असतेस तेव्हा का मला
काळ हा येणार आता वाटतो

एवढी साधी नसावी भेळ ती!
पचवण्याला वेळ आहे लागतो

प्रतिभेचा सन्मान..!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 26/01/2009 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
हृदयनाथ मंगेशकर! मराठी भावसंगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे, एक अत्यंत प्रतिभावान संगीतकार! त्यांना या वर्षी भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे! मिपा परिवारातर्फे या अनवट कलाकाराचे मन:पूर्वक अभिनंदन..! त्यांची उत्तमोत्तम गाणी आम्हाला यापुढेही ऐकायला मिळोत हीच सदिच्छा! (हृदयनाथप्रेमी) तात्या.

ही तुझी माझीच आहे गोष्ट पण...

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी सोमवार, 26/01/2009 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
चेहरा सारे खरे ते सांगतो याचसाठी आरसा मी टाळतो वेगळे घडणार अंती जाणतो मी तरी आंदाज माझे बाधतो कोंडली मी वादळे माझ्यामध्ये फुंकरीने मात्र मी घायाळतो माळरानावर मनाच्या एकटा मी कुणाची वाट आहे पाहतो यायची असतेस तेव्हा का मला काळ थोडा थांबल्यागत वाटतो एवढा साधा नसावा प्रश्न तो! उत्तराला वेळ आहे लागतो ही तुझी माझीच आहे गोष्ट पण नाव मी बदलून आता सांगतो मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा आठवांच्या या स्मशानी हिंडतो -अनिरुद्ध अभ्यंकर

प्रजासत्ताक दिन

लेखक नितिन थत्ते यांनी रविवार, 25/01/2009 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या प्रजासत्ताक दिन आहे. बहुतेक सर्व सोसायट्या कॉलन्या आपापल्या आवारात ध्वजवंदन करतील. ठराविक गाणी म्हणतील. ठराविक छापाची भाषणे करतील. यातल्या बहुतेकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन दोन्हीतील फरक माहित नसेल. बहुतेकांच्या लेखी दोन्ही दिवस सारखेच. शर्टावर टाचणीने झेंडा लावून फिरण्याचा. स्वातंत्र्यदिनी आपण ब्रिटिशांपासून स्वतंत्र झालो. तो एक टप्पा होता. प्रजासत्ताक दिनी 'आपण' आपला देश कशा पद्धतीने चालवणार आहोत हे ठरवले. यादिवशी 'आपण' लोकशाहीची स्थापना केली. ही लोकशाही अजून आपल्याला समजली आहे का? आपणच आपला देश (चांगल्या किंवा वाईट रीतीने) चालवीत आहोत अशी भावना दिसत नाही.