Skip to main content

जंजिरा - इतिहास

लेखक सुमीत यांनी मंगळवार, 05/05/2009 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
जंजीरा चा अर्थच मुळी समुद्राने वेढलेला किल्ला, तसा जंजीरा आपल्या स्वराज्या साठी अजेय राहिला. मुरूडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. जंजिरा किल्ला राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटा वर बांधलेला आहे. भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता. या तोफां मध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. जंजिरा स्वतंत्र कोळी राजाच्या सत्तेखाली होता, कदाचित हा शासक जंजिऱ्याचा जनक असला पाहिजे.

कर्नाळा - इतिहास

लेखक सुमीत यांनी मंगळवार, 05/05/2009 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर दिड वर्षात पहिल्यांदा लेख प्रकाशीत करत आहे, गड किल्ल्यांचा रंजक इतिहास थोडक्यात वर्णन करावा ह्या हेतूने मी कर्नाळा आणि जंजीरा वर हे लेख लिहून इतर संकेत स्थळां वर प्रकाशित केले आहेत. गेल्या दीड वर्षात वैयक्तीक कारनां मुळे ना मुशाफिर करता आली ना लेखन. आज सहज गप्पा मारताना कैवल्य (धमाल मुलगा) ने हे जुने लेखन पुनःप्रकाशन करण्यास आग्रह केला. पण आता मी पण वेळ मिळेल तसे इतर किल्ल्यांचा इतिहासा बद्दल थोडक्यात लेखन करत राहीन. ===================================================== कर्नाळा किल्ल्या बद्दल बऱ्याच लोकांना ठोस माहिती नाही व इतर बऱ्याच ऐतिहासिक वाड:मयात देखील कर्नाळा बद्दल पूर्ण उल्लेख नाही. लोकांना कर्नाळाची तोंडओळख आहे ती पक्षी अभयारण्य म्हणून पण ह्या किल्ल्याने देखील ईतिहासात बऱ्याच लढाया पाहिलेल्या आहेत. कर्नाळाचा ईतिहास मी तिथे नमूद केलेल्या फलका वरील मजकुरावरून माझ्या भाषेत लिहितं आहे. प्राचीन काळी पनवेल व बोर घाटातून (त्यावेळच्या) मुंबई व चौल बंदराकडे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचा उपयोग होत असे. चौल हे ठिकाण अलिबागच्या पुढे रेवदंडा जवळ मुरूडच्या वाटेवर आहे. तिथून येणारा माल कर्नाळा वरून त्या काळच्या पुणे, ठाणे येथील बाजारपेठेत पोहचवला जायचा. कर्नाळावर देवगिरी यादवांचे १२४८ ते १३१८ पर्यंत राज्य होते, किल्ल्याचे बांधकाम कोणी केले याचा पुरावा दिला नसला तरी देवगिरी यादवांनीच कर्नाळा बांधला असावा. बहुतेक करून महाराष्ट्रातील प्राचीन किल्ल्यां पैकी एक असा बहुमान कर्नाळ्याला आपण देऊ शकतो (चुकीची दुरुस्ती करण्यात यावी.). पुढे सन १३१८ ते १३४७ पर्यंत दौलताबादाच्या मुस्लिम शासकाकडे कर्नाळ्याचा ताबा होता. तेव्हा कर्नाळा उत्तर कोंकण म्हणजेच ठाणे व रायगड ह्यांचे मुख्यालय होते.दौलताबाद कडून कर्नाळाचा ताबा गुजरातच्या फौजे कडे गेला. हा गुजराती शासक कोण होता ह्याचा उल्लेख कुठेच नाही आहे, तसा मला पण ह्या बद्दल कोडे आहे कारण गुजराती शासकाने कर्नाळा पर्यंत मारलेली मजल ह्या बद्दल कुठेच अजून पर्यंत वाचनात आलेले नाही. १५४० मध्ये अहमदनगरच्या निजामाने हा किल्ला जिंकला, पण गुजराती शासकाने पोर्तुगीजांच्या साहाय्याने कर्नाळा परत मिळवला. परत एकदा निजाम चालून आला असता गुजराती शासकाने कर्नाळा पोर्तुगीजांना बहाल केला, वसईच्या कॅप्टनने निजामाच्या सैन्याचा वेढा मोडून काढून स्वतःचा अंमल स्थापन केला आणि किल्ल्याच्या संरक्षणार्थ ३०० युरोपियन सैनिक तैनात केले. पुढे पोर्तुगीज व निजाम यांच्या मध्ये झालेल्या मैत्रीच्या तहात वार्षिक १७५० पौंड ह्या ठराविक खंडणीच्या रकमेवर पोर्तुगीजांनी हा किल्ला निजामशहाकाडे सोपविला. एवढा उहापोह पाहिल्या नंतर त्या काळात कर्नाळाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते. निजामशहा कडून मग हा किल्ला मुघलांकडे होता, ह्या बद्दल सविस्तर माहिती मिळाली नाही. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी कर्नाळा मुघलांकडून जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला. मिर्झाराजा जयसिंग बरोबर झालेल्या पुरंदरा च्या तहात कर्नाळ्याचा देखील बळी गेला होता पण लवकरच इतर किल्ल्यां बरोबर कर्नाळ्याचे स्वराज्यात पुनरागमन झाले. महाराजांच्या मृत्यू नंतर औरंगजेबाने कर्नाळा परत जिंकला आणि कर्नाळा पारतंत्र्याच्या साखळदंडा मध्ये जेरबंद झाला. सन १७४० मध्ये पेशव्यांनी कर्नाळ्याला परत स्वराज्यात आणले. १८०३ मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाच्या वतीने गडाचा ताबा घेतला व १८१८ मध्ये स्वतःचा अंमल जाहीर केला. सन १८१८ पर्यंत क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके ह्यांचे आजोबा कर्नाळ्याचे किल्लेदार होते. ह्याच कर्नाळाच्या बेलाग सुळक्याने तरूण वासुदेव ह्यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली आणि ह्या आद्य क्रांतीकाराला एडनच्या तुरंगाची भिंत पण थोपवू नाही शकली.

क्षुल्लक

लेखक जागु यांनी मंगळवार, 05/05/2009 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
सागराच्या सामर्थी थेंबा-थेंबाची उसळण, थेंबाच्या बळावर महासागराचे विशालपण ! घराच्या बळकटपणी पायाचं खोल रुतणं, सजिव, निर्जिव भार पेलत घराचं छप्परही सजलेलं चंदनाचे महानपणी सहाणेचं झिजणं, उगाळताना खड्डा सोसून चंदनाचे गुणं टिकवलेलं ! क्षुल्लक गोष्टीतही विसावलं थोरपण, थोरपण जपण्यासाठी जपाव जाणिवेचं उदारपण !
Taxonomy upgrade extras

तीच खरी श्रध्दांजली....!

लेखक विनायक पाचलग यांनी मंगळवार, 05/05/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारचा दिवस हा साहित्यसृष्टीतीलच काही काळया दिवसांपैकी एक होता. का ते तुम्ही जाणताच! ज्येष्ठ साहित्यीक, वक्ते, राम शेवाळकर काल अनंतात विलीन झाले. माझे भाग्य की, दोन वर्षापूर्वी आणि 2-3 महिन्यापुर्वी असे दोनदा या सारस्वातातीलच हि-याचे शब्द मला कानात साठवण्याचा योग आला.

रसग्रहण : सुन्या सुन्या मैफलीत माझ्या.

लेखक अनंता यांनी मंगळवार, 05/05/2009 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! चांगले, समृद्ध करणारे, ऐकावे असे काही! मध्ये सुन्या - सुन्या मैफिलीत माझ्या ...ऐकण्याचा योग आला. वाचून अगदीच राहवेना. गाणं ऐकून कधी समाधी लागली तेच कळलं नाही! सुरेश भटांची सुरेख शब्दरचना, पं. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, स्मिता पाटीलचा जिवंत अभिनय आणि दीदींच्या सुरांचे नक्षीदार कोंदण! केवळ अप्रतिम.हजार ऑस्कर एका पारड्यात नि हे गीत एका पारड्यात! समाजातील उपेक्षीतांसाठी झटणार्‍यांच्या वैयक्तीक आयुष्यात जेव्हा वादळ उठते, तेव्हाच्या मनोवस्थेचं वर्णन भटसाहेबांनी अचूक पकडलेय.

गाभ्रीचा पाऊस - परीक्षण

लेखक फारएन्ड यांनी मंगळवार, 05/05/2009 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
गाभ्रीचा पाऊस हे नाव थोडेफार ऐकले होते. कोणत्यातरी महोत्सवात दाखवला होता आणि कदाचित पारितोषिक ही मिळाले म्हणून. पुण्यात होतो तेव्हा लागला नव्हता आणि कोठे परीक्षण ही वाचले नाही. मग येथे अमेरिकेत लॉस एन्जेलिस आणि नंतर बे एरियात याचे शो झाले. त्याबरोबर निर्माते प्रशांत पेठे ('वळू' सुद्धा यांचाच) आणि लेखक्-दिग्दर्शक सतीश मन्वार (उच्चार नीट माहीत नाही) हे ही आले होते. मी बे एरियात सॅन होजे ला दाखवला येथील 'कला' या संस्थेने, तेव्हा बघितला. चांगला चित्रपट आहे, बघण्यासारखा.

ऐतीहासीक अजरामर वाक्ये...

लेखक अडाणि यांनी मंगळवार, 05/05/2009 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
काही वाक्ये अशी आहेत कि त्याला फार मोठा इतीहास आहे आणि ती अजरामर झालेली आहेत. मला माहित असलेली काही टंकत आहे, तुम्हिही भर घाला. वाक्यांबरोबर त्यांचा संदर्भ, काल अशी पुरक माहिती पण द्यावी. १. "माझ्या बंधु आणि भगिनींनो" - स्वामी विवेकानंदांचे हे (अर्ध) वाक्य अतिशय प्रसिद्ध् तर आहेच, पण आपल्या भारतिय संस्कॄतीची सर्व जगाला ओळख करून देणारे आहे. स्थळ - शिकागो. २. "I have a Dream" - मार्टीन ल्युथर किंग ह्यांचे हे वाक्य (आणि त्या नंतरचे भाषण) वर्णद्वेषाविरूद्द् चळवळीचा एक मोठा भाग मानला जातो. - स्थळ - वॉशिंटन ३.

अष्टौप्रहर.....

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 05/05/2009 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
अष्टौप्रहर..... येते अशीच केंव्हा केंव्हा पहाट ताजी ओठांत अमृताची देतेस ठेव माझी ! येते अशीच केंव्हा केंव्हा तरी सकाळ करतेस दाट आणिक जवळीक फार माझी ! येते अशीच केंव्हा केंव्हा तरी दुपार डोळ्यांत धुंद दिसते , मिठी अनिवार माझी ! येते अशीच केंव्हा केंव्हा चुकार संध्या गाण्यात छेडतो मी , मनची सतार माझी ! येते अशीच केंव्हा केंव्हा तरीच रात्र येतो सुगंध, फुलते , "जाई" क्षणांत माझी ! ------------------२७ जुलै १९८४.....................
Taxonomy upgrade extras

आयुष्य

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 05/05/2009 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
रमत गमत जगायचं, हसत हसत मरायचं जन्मभर उन्हाच्या झळा सोसून सावलीसाठी झुरायचं बकुळगंधाच्या स्मृती घेऊन बाभुळबनात फिरायचं एकाकीपण विसरून जाऊन मैफलीत बहरायचं निखळलेल्या प्रतिबिंबातलं चांदणं हाती धरायचं निसटलेल्या क्षणांमधली स्वप्नं शोधत फिरायचं हळूच मिटल्या पापणीतला अश्रू होऊन झरायचं तृणावरच्या दंवासारखं कोवळ्या उन्हात विरायचं तहानल्या जीवांसाठी मेघ होऊन उतरायचं वाळवंटातल्या पथिकामागे सावली होऊन फिरायचं रित्या ओंजळीला गोड गुलाबी आठवणींनी भरायचं बहरासाठी वाटा सजवून पाचोळ्याचं आयुष्य सरायचं

आपला तो संस्कार, त्यांचा तो उर्मटपणा!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 05/05/2009 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची मुलगी सध्या हिंदी शिकतेय. म्हणजे, तसं ती गेली दोन वर्षं शिकतेय! (शिकवायला बापच ..सॉरी...पिताश्री असल्यावर कसं व्हायचं पोरीचं?) पिताश्रींनी तिला इंग्रजी-हिंदी शिकवायचं व्रत घेतल्याला काही वर्षं लोटली. (आधी स्वतः शिका म्हणावं!) आता ती "पाच मिनिट थांबो' अशा दर्जाचं हिंदी बोलतेय. जमलं नाही, तर तोंडाला येईल ते ठोकून देते. (पिताश्रींची परीक्षेतली सवय!) काही महिन्यांपूर्वी असंच तिला कळू नये म्हणून मी आणि बायको एक विषय इंग्रजीतून बोलत होतो. ("तसलं' काहीही बोलत नव्हतो! चहाटळ कुठले! "तसलं' मराठीतून बोलायची बोंब. इंग्रजीतून काय बोलताय?) थोडा वेळ पाहिलं पाहिलं आणि पोरगी वैतागली.