भाषा - काही अप काही डाउन
प्रास्ताविक - बहुगुणी यांच्या एका लेखावरून मनात आलेले काही स्वैर विचार....
आपल्या लोकसंगीताच्या खाणीतील काही हिरे-माणके हिंदी चित्रपटगीतांत आणून बंगाली संगीतकारांनी दोन गोष्टी केल्या. एक हिंदी सिनेसंगीत अधिक समृद्ध केले आणि दुसरे म्हणजे, ह्या बंगाली खजिन्याची ओळख उर्वरीत देशवासीयांना करून दिली.
ह्यातील दुसर्या गोष्टीचे मला अधिक अपृप वाटते.
रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळाले त्याचबरोबर अनेक बंगाली कथा-कादंबर्यांची विविध भारतीय भाषांत रुपांतरेदेखिल झाली. परंतु, संगीताचा प्रभाव हा अधिक असतो, समाजातील सर्व स्तरांत झिरपणारा असतो.
नेमके हेच बंगाली संगीतकारांमुळे घडले.
मिसळपाव


ह्यांच्या बदल मी पामर काय लिहणार.... !
