Skip to main content

नशीब भाग २१ ते २५

लेखक विनायक रानडे यांनी गुरुवार, 31/12/2009 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
"नशीब भाग १५ ते २०" शब्दाचे भाषांतर केल्यास विनोद निर्माण होणार परंतु कवी भावना समजल्यास कवितेचा आनंद घेता येईल, जगात सगळीकडे कवी भावना सारख्याच असतात बदलतात ते फक्त शब्द. भाषांतर काराने त्या भावना समजूनच त्या त्या भाषेत भाषांतर करणे आवश्यक असते.

"निरोप नवव्या वर्षाचा, स्वागत नव्या वर्षाचे..."

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 30/12/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
चला उरलेल्या आयुष्याला, नव्याने सामोरे जाऊ परत! आणि करुया एका नव्या वर्षाचे, जोमाने स्वागत! सोबत असू द्यावी, शुभ विचारांची संगत! मग वाढेल, जीवन जगण्यातील रंगत! चला तर मग करूया, २०१० चे जोमाने स्वागत...!!! "निरोप नवव्या वर्षाचा, स्वागत नव्या वर्षाचे..."
काव्यरस

"हीएइ ह्योए ह्याई हीयेहे" चे रहस्य...!!!

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 30/12/2009 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
टशन या हिंदी चित्रपटातले शिर्षक गीत ऐकले असेलच. (ताली बजावे, नचे गावे). इतर गाण्यांपेक्षा त्यात काहीतरी वेगळेपणा हवा म्हणून त्यांनी वरील "हीएइ ह्योए ह्याई हीयेहे" अशा विचित्र कोरस ने त्या गाण्याची सुरूवात केली आहे. आठवून बघा गाणे! असलाच काहितरी आवाज आहे तो! असे वाटते की चार पाच भूते कुणालातरी घाबरवायला आली आहेत आणि अचानक त्यांना थंडी वाजते. आणि त्यांचे दात दुखायला लागतात. तेव्हा मग त्या स्थितीत माणसांना घावरवतांना त्यांचा होणारा आवाज म्हणजे "हीएइह्योए ह्याईहीयेहे" दर शुक्रवारी अर्धा डझन चित्रपट रिलीज होतात. त्या प्रत्येकात किमान चार तरी गाणी असावी लागतात.

२०१०-विजयी भव!!!

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 30/12/2009 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
२०१० च्या वर्षाची सुरवात होण्यास काही तासांचाच अवकाश आहे. एक वर्ष संपणार आणि दुसरे सुरु होणार. पाश्चात्य विचारांत जी काही कमी अथवा आक्रमकता असो, पण आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन मात्र उत्साहाचा आणि उमेदीचा आहे. माणुसमात्र अनेक अनियमितता अथवा बंधनाने बांधला गेला आहे, परंतु अश्या वर्षाच्या सुरवातीस मात्र त्याचा कल हा आशावादी आणि संकल्पाचा असतो ही बाजु मला जमेची वाटते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक गोष्टी करण्याच्या राहुन जातात त्यांना अश्या वर्षाच्या सुरवातीच्या कल्पनेने परत एकदा उजाला देता येतो.

धागे

लेखक कवटी यांनी बुधवार, 30/12/2009 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
मला १ ओळीचे धागे काढायचे आहेत. तुम्हाला माहीत असतील तर मदत करा प्लिज.

भारतातून चावट शोध बंद...

लेखक चिंतातुर जंतू यांनी बुधवार, 30/12/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या वाचनात आलेल्या खबरीनुसार याहू शोध, फ्लिकर आणि बिंग शोध या संस्थळांनी भारतीय जनतेला आंतरजालावरील अश्लील स्थळांपर्यंत पोहोचू न देण्याचा विडा उचलला आहे. बातमीमध्ये असेही प्रतिपादन केले आहे की आपल्या भारतमातेच्या सुकन्या/पुत्रांचे 'सेक्स'शी संबंधित शोध करण्याचे प्रमाण इतर देशांच्या पुत्र/कन्यांपेक्षा अधिक आहे.

धाकोबा आणि दुर्ग

लेखक जीएस यांनी बुधवार, 30/12/2009 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
१९ डिसेंबरला, जवळ जवळ वीस वर्षांनी भेटलेल्या आमच्या शाळेच्या, पार्ले टिळकच्या सोबत्यांना घेउन गोरखगडाला गेलो होतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेसमोर कोकणात मुरबाडजवळ तुलनेने छोटासा गोरखगड उभा आहे. त्यावर उभे राहून, सह्याद्रीच्या भिंतीचे, एकामागून एक को़कणात सरळ कोसळणार्‍या कड्यांचे दृष्य पहात बसणे हा एक भान हरपायला लावणारा उद्योग आहे. उजवीकडे सिद्धगड, त्याच्या मागे भीमाशंकर, समोरचा दमदम्या, बाजुला आहुपे गावाकडे वर जाणारी घाटवाट, त्याही बाजुला दुर्ग, अजून पलिकडे, जीवधन, नानाचा अंगठा अशी सगळी ओळखपरेड सुरू असतांनाच, या सर्व उत्तुंग भिंतींवरूनही डोके वर काढून आकाशात घुसलेले एक रूंद शिखर दिसते.

गेम्स

लेखक जागु यांनी बुधवार, 30/12/2009 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला ३१ च्या पार्टी सेलिब्रेशन साठी कपल गेम व लहान मुलांचे गेम हवे आहेत. तुम्हाला माहीत असतील तर मदत करा प्लिज.

वीर धरण परिसरातले पाहुणे पक्षी: "बार हेडेड गीज"

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी बुधवार, 30/12/2009 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याजवळच सासवडजवळ वीर नावाचे गाव आहे. पुणे जिल्ह्यातील बऱ्याच कुटुंबांचे वीरचा नाथ म्हस्कोबा हे कुलदैवत आहे. त्या मंदिरापासून जवळच म्हणजे १ किमीवर वीर धरण आहे. सासवडला पाणीपुरवठा याच धरणातून होतो. त्याचा जलाशय आम्हा भटक्यांमध्ये प्रसिद्ध आहे तो हिवाळ्यात येणाऱ्या पाहुण्या पक्षांसाठी. विशेषतः सायबेरियातून येणाऱ्या "बार हेडेड गीज" (मराठी नाव माहीत नाही) या पक्षांचे हे वीर धरण आश्रयस्थान आहे. परवा तिकडे एक चक्कर टाकली. पाहुणे आलेले असले तरी अजूनही हव्या तेवढ्या संख्येने नाहीत.

पर्यावरणवादी व शास्त्रज्ञांना सुचना

लेखक अमृतांजन यांनी बुधवार, 30/12/2009 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
कोपनहेगनची परिषद निष्फळ झाल्यामुळे मला राहवले नाही व मी निराश झाले. पृथ्वीवासियांना ग्लोबल वार्मिंगमुळे पडणाऱ्या कडाकाच्या थंडीत थोडीशी वैचारीक ऊब कशी देता येईल ह्याचा मी खूप विचार करता मला पुढील पर्याय दिसले; तेच मी आपणासमोर मांडत आहे. १. समुद्रात परागकण, बिया, सोडावीत. त्या तरंगतील व ढगांची निर्मीती होतांना त्या ढगात जातील. पावसाबरोबर जमीनीवर पडतील व विनासायास सगळीकडे जंगले वाढतील २. वरील उपायांबरोबरच खतेही अशाच प्रकारे त्या बियांबरोबर पुढील नक्षत्राच्या पावसाबरोबर पोहोचवता येतील. ३.