Skip to main content

हे सुरांनो चंद्र व्हा

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 02/11/2010 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
हे गाणे मी पहिल्यांदा कॉपी पेस्ट्च्या वयांत ऎकलं, म्हणजे १७-१८चा असताना. दुरदर्शन वर बहुधा आरती पाटिल अश्या नावाची कोणी गायिका होती. आता नाव नक्की आठवत नाही, पण त्या काळांत गाणं जास्त लक्षात राहिलं ते त्या गायिकेच्या दिसण्यामुळं, तिचा चेहरा आणि तिची तवला वाजवणा-या कडं पाहतानाची नजर, त्या नजरेत एक प्रकारचा धाक होता किंवा अधिकार होता. हे गाणं चारच ऒळींचं, अगदि टिपीकल नाट्यसंगीत, थोडेसेच शब्द आणि त्या बरोबरच्या सुर, आलाप, तानांच्या नाना हरकती.

काही अतरंगी संभाषणे.

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 01/11/2010 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी तशा खुप प्रकारच्या लोकांना भेटलो आहे,त्यांच्याबद्दल जास्त काही लिहु ईच्छीत नाही,पण त्यात उच्च पातळीच्या वैज्ञानिकांपासुन ते 'भाई' ह्या श्रेणीत येणारे सर्व येतात.मग मी प्रत्येकाशी बोलताना वापरले जाणारे शब्द,चेह-यावरचे भाव इतकेच काय अंगात घातलेले कपडे ह्यांचाही विचार करतो,हे सर्व 'जैसा देस वैसा भेस' ह्या नियमाचे कटेकोर पालन व्हावं ह्या उद्देशाने केलेले असते. पण संभाषणावेळी कधी कधी काय होतं,पुढची व्यक्ती मी गृहीत धरलेल्या तिच्या प्रतिभेला तडा जाईल असे काही शब्द बोलते,मी चाट पडतो,"अरे हेच बोलले का?". मला जे सांगायचय ते मी काही उदारणांसहीत स्पष्ट करतो. १) मी.नेने,ह्या माणसात तशे खुप गुण,त्यातल

बैल

लेखक जयदेव यांनी सोमवार, 01/11/2010 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
दोन जिवाची घालमेल निस्तेज सन्साराची तीन दगडी चुल मान्डण्यासाठी १० बाय १० चे खुराडे जगण्या मरण्याच्या आणाभाका खान्यासाठी पालिकेच्या नळाची थेम्ब थेम्ब धार सारा सन्सार धूवून जिवाची तहान भागविण्यासाठी सरकारचे अधीक्रुत दुकान उच्चत्तम निक्रुष्ट दर्जाच्या धान्यासाठी जिवाच्या करमणुकीची प्रसारमाध्यमे ऐकुन किटतात कान अन धिजतात डोळे कारण त्यात जाहिराती असतात बैलान्च्या अन बातम्या असतात महाबैलान्च्या महाबैल रवन्थ न करता पचवतो कोटीकोटी अन त्याच सत्यकथ्येची रवन्थ करत आपण जळतो घडोघडी महाबैलान्नी गिळ्लेल्या पेन्डीचा एक दिवस जनता करेल हिशोब कारण सामान्य जनता ही गाय आहे ह्या सार्‍या बैला-महाबैला

चेरी टोमॅटोची पिशवी.

लेखक लतिका धुमाळे यांनी सोमवार, 01/11/2010 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
चेरी टोमॅटोची पिशवी ५- ६ वर्षांपूर्वी आम्ही जर्मनीत एक छोट्या गावात रहात होतो. आमच्या घरा समोरच एक छोटेसे सुपर मार्केट होते, तेथे रोज लागणारया गोष्टी, भाजी व फळे मिळत. त्या दुकानासमोरच एक १२- १३ वर्षांचा मुलगा चेरी टोमॅटोच्या अर्ध्या किलोच्या पिशव्या विकत होता. जरासा गबदुलच होता.जर्मन नव्हता, अतिपूर्वेकडिल कोणत्यातरी देशातील होता. उन्हाळा खूपच असल्याने घामाने थबथबत होता. हातातील बास्केटवर "चेरी टोमॅटो २ युरो पिशवी" असा बोर्ड लावून त्या विकायचा प्रयत्न करत होता. निदान ७-८ बायकांना तरी विचारून झाले, पण पदरी निराशाच येत होती. भाजीच्या दुकानासमोर टोमॅटो विकणारया त्या मुलाचे मला कौतुक वाटले.

फराळ फटाके: जीवनाच्या दिवाळीतले!!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 01/11/2010 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्या सणांमध्ये दिवाळीचा वेगाळाच थाट सर्वांना अंधारामध्ये दाखवी प्रकाशाची वाट ... ... प्रकाश पसरवते पणतीची पेटलेली वात या दिवा़ळसणामध्ये करा दु:खावर मात ... ... निराशेच्या "भुईचक्राला" लावून टाका आग गोल गोल फिरत स्वतःमध्ये निराशा होईल खाक ... ... "फुलबाजीच्या" झगमगत्या आनंदी तुषारांद्वारे फुलवा मनामनांत आनंदाचे "झाड"... ... सद्वीचारांची ठीणगी लावा रॉकेटच्या मुखात महत्त्वाकांक्षेचे "रॉकेट" उडू द्या उंचच उंच आकाशात ... ... सुतळी "बॉम्बसारखे" छिन्नविछिन्न होवू द्या मनातले नकारात्मक कीडलेले भाग ... ... "शंकरपाळ्यांसारखी" चौकट तोडा बघा मोकळ्या मनाने
काव्यरस

(बॉडी डबल)

लेखक सुनील यांनी सोमवार, 01/11/2010 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
चित्र जालवरून साभार.

त्रिशंकुच ...

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 01/11/2010 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १०७ पैकी १०६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. शिवसेना-३१, भाजप-९ राष्ट्रवादी-१५ काँग्रेस-१५, मनसे-२६, अपक्ष-११ चित्र जवळपास स्पष्ट आहे. महापालिकेत शेवटी "त्रिशुंक" परिस्थीती निर्माण झाली आहे. आता शक्य सोल्युशन्स असे आहेत. राष्ट्रवादी + काँग्रेस = ३० / ३१ सेना-भाजपा = ४० / ४१ मनसे = २६ / २७ इतर = ११ सरकार बनवण्यासाठी हवे आहेत किमान ५४ नगरसेवक. मग उपलब्ध शक्यता अशा बनतात किंवा ह्यातले काहीच शक्य नाही असे वाटते. १. काँग्रेस + राष्ट्रवादी + मनसे ( बाहेरुन पाठिंबा ) = ५६ / ५७ २.

एक होती म्हातारी .............

लेखक पियुशा यांनी सोमवार, 01/11/2010 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
हाय मि पियुशा पहिलच प्रयत्न आहे माझा ,लिखनतिल चुका बद्दल साम्भालुन घ्या, एक होती म्हातारी ............. खूप खूप वर्षापूर्वी आट-पाट नगर होते , त्यात एक खावून पिवून सुखी असे कुटुंब राहत होते ,नवरा बायको आणि ४ मुले ,थोडीशीच शेती त्यावर संसार अवलंबून होता , मुले मोठी होऊ लागली तशा-तशा गरजा वाढू लागल्या ,त्यांची शाळा वही पुस्तके ,यांचा खर्चामुळे घरच्या माऊलीला शेतात मजुरी करावी लागायची ,आईबापाने जणू चंगच बांधला होता कि आपण अडाणी राहिलो पण मुलांना शिकवून मोठे साहेब करायचे , म्हणून मायबाप रात्रीचा दिवस करू लागली मुलांच्या गरजा