Skip to main content

पाकिस्तानी व्रुत्तपत्रांची मान खाली

लेखक शेखर काळे यांनी शनिवार, 11/12/2010 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
ही पहा आजची बातमी - http://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-how-pak-media-used-w… पाकिस्तानी वृत्त संस्था कधी अशी दिलगिरी व्यक्त करत नाहीत. आताच हे असे कसे झाले ?

माणुसकीचा झरा ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शनिवार, 11/12/2010 05:21 या दिवशी प्रकाशित केले.
माणुसकीचा झरा तो शोधात असतो माणसातल्या माणुसकीचा झरा त्याला भेटतात छान अशी माणसे प्रेमाने पाठीवरून हात फिरवणारी माणसे कारण तो एकटा आहे ह्या जगात एखादा भेटतो कपटी नाही असे नाही स्वार्थी .! मतलबी ..!! पण तो माफ करतो नि शोधत बसतो त्यांच्यातील चांगुलपणाला त्यांना पण देतो आपल्या मैत्रीचा सुगंध नि माफ करतो मनापासून त्यांच्यातील स्वार्थीपणाला कुणास ठाऊक कोठून आला हा त्याच्यात गुण कसा फुटला त्याच्या मनात ह्या माणुसकीचा झरा अशे त्याला खूप झरे सापडले डाक्टरच्या रूपाने मैत्रीच्या रूपाने ज्यांनी महारोग्यांना सुद्धा जवळ केले लाखो अंधासाठी आपले कसब लावले नि दिले दृष्टी हिरवी हिरवी
काव्यरस

बिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १

लेखक भानस यांनी शुक्रवार, 10/12/2010 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
जिन्नस * पाच सहा वाट्या सोललेल्या डाळिंब्या * ओले ताजे खवलेले खोबरे सहा-सात चमचे( पाऊण वाटी ) किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी * सात-आठ हिरव्या मिरच्या, पेरभर आले, मूठभर कोथिंबीर * दोन चमचे जिरे, चवीनुसार मीठ व दोन चमचे साखर. * दोन चमचे लाल तिखट. ( शक्यतो रंग येईल अश्या मिरचीचे असावे ) * सहा-सात अमसुले, सहा-सात चमचे फोडणीसाठी तेल. मार्गदर्शन दोन -तीन वाट्या कडवे वाल रात्री किंवा सकाळी भिजत घालावेत. १२ तासानंतर ( वाल व्यवस्थित भिजल्यावर ) उपसून पंचात किंवा फडक्यात( हवा थोडीशी तरी खेळती राहावी असे फडके घ्यावे ) बांधून वर दडपण ठेवून मोड येण्यास ठेवावेत.

इकडची गोची

लेखक रन्गराव यांनी शुक्रवार, 10/12/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
भारताने आपला BPO मधला प्रथम क्रमांक गमावला आहे, ती जागा फिलीपीन्सने बळकावली आहे. http://www.rediff.com/business/slide-show/slide-show-1-philippines-beat… स्वस्तात सेवा करून काय फायदा झालेला दिसत नाही. भारत "information Superpower" आहे असं फार वर्षांपासून एकून आहे. पण अल्गोरिदम ऑलम्पिक्स ह्या स्पर्धेतली आपली कामगिरी आपल्या दाव्याला शोभनारी नाही.

"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-परिचय-प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती-भाग १

लेखक सुधीर काळे यांनी शुक्रवार, 10/12/2010 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-"परिचय"-प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती-भाग १ मूळ लेखकः श्री पवनकुमार वर्मा अनुवादकः सुधीर काळे © मूळ लेखकाच्या वतीने: सुधीर काळे (या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत) "भारतीय असणे म्हणजे काय?" याबाबत एक नवे आणि आणि अगदी 'सोळा आणे' वेगळे संशोधन करणे हाच हे पुस्तक लिहिण्यामागचा मूळ उद्देश आहे! असे संशोधन फक्त भारतासाठीच नव्हे तर सार्‍या जगाच्या बाबतीतही समर्पक आणि प्रसंगोचित आहे.

आई .. मिटलेला श्वास.. १२

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 10/12/2010 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
आई .. मिटलेला श्वास..११ नदीचा सुन्न किनारा पाणी वाहतेय जपून ओल्या हिरव्या तनांवर निळसर घाव थबकून चांदणे हरवलेली सुनी खिन्न गर्भरात प्रतिबिंबित गहिरा रंग मनावर काळसर रंगहीन स्वप्नांचा धुसर स्तब्ध प्रवाह दिशाहीन नेत्रनजर अन निशब्द आठवांचे काहूर - शब्दमेघ

१ विनोद

लेखक अश्फाक यांनी शुक्रवार, 10/12/2010 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
राहुल घरी आला तर पत्नीला रडतांना पाहिले आणि विचारले , काय झाले ? पत्नी :तुमच्या आइने माझी बेइज्जती केली आहे . पति :आइ असे कसे करु शकते ती तर ताइ कडे युरोप फिरायला गेलि आहे . पत्नी : आज तुमच्या आइ चा मेल आला होता तुमच्या मेल एड्रेस वर , त्यात शेवटी लिहले होते "सटवी वाचल्यानंतर माझ्या मुलालाही वाचायला सांग"

देशातली लोकसंख्या

लेखक रणजित चितळे यांनी शुक्रवार, 10/12/2010 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशातली लोकसंख्या काहीच वर्षात चायनाच्या पेक्षा जास्त होणार. आपल्या देशात एवढी लोकसंख्या का ह्या वर कोणी प्रकाश टाकू शकेल का. १. फॅमिली प्लॅनिंग उशीरा सुरु करणे किंवा नसणे - हे कारण वाढत्या लोकसंख्येला देता येणार नाही. कारण अमेरीकेत सुद्धा ३० मुले होती पुर्वीच्या काळी एका कुटुंबात अशा नोंदी आहेत. २. आपला देश मागासलेला असला कारणाने प्राथमिक वैद्यकीय उपचार न मिळाल्या मुळे होणारे मृत्युचे प्रमाण जास्त असुन देखील लोकसंख्या वाढत आहे. ३.

"इकडचे" आणि "तिकडचे"..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 10/12/2010 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
खूप पूर्वी मनात आलेलं आणि लिहिलेलं काही आज पुन्हा दिसलं आणि आणि त्यातले काही पॉईंट्स उचलून चर्चेला आणावेसे वाटले म्हणून.. खाली जे काही लिहिलंय ते आडपडदा न ठेवता किंवा मुद्दाम "न्यूट्रल" राहण्याचा कोणताही प्रयत्न न करता "ज्याचे अनेक (जवळ जवळ सर्वच) रोजच्या कट्ट्यावरचे मित्र परदेशात गेले आहेत आणि कायमचे राहिले आहेत" अशा भारतात "उरलेल्या" म्हणा किंवा "राहिलेल्या" म्हणा, माणसाच्या मनातून हे लिहिलं आहे : -------------------------- जो कोणी अमेरिकेला (किंवा यू.के. वगैरेला) जातो..