Skip to main content

पाणीपुरी आणि त्यानिमित्ताने बरेच काही......

लेखक आशिष अनिल म्हात्रे यांनी रविवार, 01/05/2011 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात मुंबईजवळील ठाण्यामध्ये एक हिंदी भाषिक पाणीपुरीवाला पुरीमध्ये उकडलेल्या मुगासमावेत जे तिखटगोड पेयजल घालून देतात आणि नंतर मिटक्या मारीत एकामागून एक पुर्‍या पोटात रिचवितात त्या पेयजलात आपली लघुशंका मिसळतांना पकडला गेला किंवा एका भांड्यात त्याने लघवी केली आणि तेच भांडे लोकांना पाणीपुरी खिलवितांना त्यांने वापरले अशा काहीशा संशयाने ठाण्यात आणि मुंबईत भीतीची आणि संतापाची लाट उसळली आणि जो दिसेल त्

यांना कमरेतून उचलून फेकून द्या !

लेखक आशिष अनिल म्हात्रे यांनी रविवार, 01/05/2011 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी पुणे लोकमान्य टिळकांमुळे ओळखले जात होते. अजूनही जाते. परंतु शरद पवार आणि त्यांचे एकेकाळचे पट्टशिष्य सुरेश कलमाडी यांनी आपल्या कर्तृत्वाने या पुण्यनगरीला नवी अस्मिता देण्याचा जणू विडा उचलला आहे. शंभर वर्षांपूर्वी टिळक राजद्रोहाच्या आरोपाखाली दूर मंडालेच्या कारागृहात बंदिस्त होते. आज सुरेश कलमाडी दिल्लीत न्यायालयीन कोठडीत गजाआड झाले आहेत.

मराठी माणूस आणि महाराष्ट्र : चांगले-वाईट अनुभव !

लेखक आशिष अनिल म्हात्रे यांनी रविवार, 01/05/2011 10:14 या दिवशी प्रकाशित केले.

१ मे म्हणजे आज महाराष्ट्र राज्य ५१वा वर्धापनदिन साजरा करत आहे. ही अर्धशतकोत्तर वाटचाल करतांना राज्याने काय कमावले आणि काय गमावले, यांविषयीचा परामर्श घेणार्‍या आमच्या संग्रहातील काही गोष्टी पुढे दिल्या आहेत. मराठी भाषिकांनी त्यांचा यथायोग्य अभ्यास केला, तर राज्याच्या प्रतिष्ठेसाठी बर्‍याच गोष्टी करायच्या शिल्लक आहेत, हे लक्षात येईल आणि त्यासाठी मराठी माणसाला स्वतःचा सहभाग वाढवण्याची स्फूर्ती मिळेल.

१. मराठी माणसांचे सद्गुण !

१ अ.

मराठी माणूस आणि महाराष्ट्र : चांगले-वाईट अनुभव !

लेखक आशिष अनिल म्हात्रे यांनी रविवार, 01/05/2011 10:08 या दिवशी प्रकाशित केले.

१ मे म्हणजे आज महाराष्ट्र राज्य ५१वा वर्धापनदिन साजरा करत आहे. ही अर्धशतकोत्तर वाटचाल करतांना राज्याने काय कमावले आणि काय गमावले, यांविषयीचा परामर्श घेणार्‍या आमच्या संग्रहातील काही गोष्टी पुढे दिल्या आहेत. मराठी भाषिकांनी त्यांचा यथायोग्य अभ्यास केला, तर राज्याच्या प्रतिष्ठेसाठी बर्‍याच गोष्टी करायच्या शिल्लक आहेत, हे लक्षात येईल आणि त्यासाठी मराठी माणसाला स्वतःचा सहभाग वाढवण्याची स्फूर्ती मिळेल.

१. मराठी माणसांचे सद्गुण !

१ अ.

१ मे : द हार्ट कनेक्षन

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 01/05/2011 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
कलेला भाषेच्या सीमा अडवू शकत नाहीत हे पुन्हा सिद्ध होत असते. १ मे या एकाच दिवशी निर्मान झालेल्या गुजरात आणि महाराष्ट्र या शेजार्‍यांमध्ये केवल भौगोलीक नाही तर बर्‍याच गोष्टी समान आहेत. संस्कृती,खाद्यपदर्थ लोकांचे स्वभाव , श्रिखंड , पुरणपोळी पोहे( गुजरातीत पौवा) सुरळीच्या वड्या( खाम्डवी) असे अनेक समान धागे आहेत. पण या सगळ्याव्यतीरिक्त एक समान धागा गुजराती आण इमराठी भाषीकांच्यात समान आहे तो म्हणजे नाटक आणि रंगभूमीचे प्रेम. मराठी रंगभूमीला १५० वर्षांची परंपरा आहे.

आले आले आमचे स्वामी बाबा आले

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 01/05/2011 02:59 या दिवशी प्रकाशित केले.
आले आले आमचे स्वामी बाबा आले
जय महाराष्ट्र! कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या हार्दीक शुभेच्छा! llपुण्याचे पेशवेll यांनी या प्रतिसादात (http://www.misalpav.com/node/17833#comment-310480) बाबा-महाराज लोकांच्या प्रवृत्तीवर काहीतरी जागृती होण्यासाठी काहीतरी लिहीण्याचे सांगितले होते. त्यांची आज्ञा आम्हास मान्य असल्याने खालील काव्य लिहीण्यात आले.

पालकाची पातळ भाजी

लेखक शुचि यांनी रविवार, 01/05/2011 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पालक - मध्यम गड्डी लसूण पाकळ्या - ४/५ चण्याच्या डाळीचे पीठ - २ मध्यम वाट्या हळद - चवीनुसार मोहरी - चवीनुसार जीरे - चवीनुसार हिंग - चवीनुसार गूळ - चवीनुसार चिंच - चवीनुसार तिखट - प्रकृतीनुसार मीठ - चवीनुसार कृती: १. पालक धुऊन बारीक चिरून घ्यावा. २. लसणाचे बारीक काप करावे. ३. डाळीच्या पीठात पाणी घालून हाताने एकजीव करून घ्यावे किंवा सरळ मिक्सरमधून डाळीचे पीठ-पाणी हे मिश्रण काढावे. ४. चिरलेला पालक कुकरमध्ये घालून, वर हळद घालून एक शिट्टी करावी. हळदीने हिरवा रंग कायम रहातो. ५.

सुखाचा शोध

लेखक ajay wankhede यांनी शनिवार, 30/04/2011 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी हि जन्मा पासून फिरतो आहे सुखाच्या शोधात दरया,खोरयात, झाडांच्या सळसळणारया पानात, नदीच्या संथ वाहणारया पाण्यात पण दुक्खः जणू पाठच सोडत नाही, दरया,खोरयात, झाडांच्या सळसळणारया पानात, नदीच्या संथ वाहणारया पाण्यात. दररोज कित्येक मरण यातना भोगतो स्वप्नांचे जड ओझे घेऊन जगण्याची उभारी देणारे कुणी तरी भेटेल काय ? दरया,खोरयात, झाडांच्या सळसळणारया पानात, नदीच्या संथ वाहणारया पाण्यात.

फलाफल सँडविच

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 30/04/2011 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य फलाफल: १ वाटी काबुली चणे १/४ वाटी मैदा मुठभर कोथिंबीर मुठभर पारस्ली २-३ हिरव्या मिरच्या चिरून १ टेस्पून जिरे आल्याचा छोटा तुकडा बारीक चिरून मीठ चवीनुसार . पाकृ: काबुली चणे रात्रभर भिजवुन सकाळी कुकरमध्ये शिजवुन घेणे. नतंर त्यातील पाणी निथळून चणे किचन टीश्युवर पसरवुन कोरडे करावेत.