Skip to main content

रफी ३१-३१

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 31/07/2011 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला गाण्यांतलं शास्त्र वगैरे काही कळत नाही. केवळ आवडतात म्हणून मी गाणी ऐकतो, वेळ मिळेल तेंव्हा, मिळेल त्या ठिकाणी. त्यामुळे प्रसिद्ध गायक-गायिकांची वा संगीतकारांची जन्मतिथी-पुण्यतिथी वगैरे मी शोधत बसत नाही. कधी कधी आंतर्जालावर बातम्या वाचतांना अचानक लक्षात असे दिवस येतात. आर डी च्या बद्दल लिहिलेल्या लेखाच्या बाबतीत असंच झालं होतं. आज ३१ जुलैला रफीच्या ३१व्या पुण्यतिथीची बातमी वाचली.

कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/07/2011 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली
अरे कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली निट जपून वाढ माझी फाटकी रे झोळी ||धृ|| सकाळीच उठले मी अजाणतेपणी काय घडेल दिसभर नव्हते ध्यानी पोट नाही भरले जरी न्याहरी केली कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||१|| पंचपक्वांन्न आहे सोबतीला शिरापुरी भरलेलं ताट आले समोर दुपारी किती खावे किती नको झाले त्यावेळी कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||२|| कधीतरी आराम मिळो ह्या पोटाला संध्यासमय जवळ हा आला पाषाणगवळण तुझ्या चरणी लीन झाली कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||३|| - पाषाणभेद (दगडफो
काव्यरस

लोकशाहि

लेखक अजातशत्रु यांनी शनिवार, 30/07/2011 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
!! लोकशाहित या सगळेच भाडखाऊ !! लोकशाहि मुळेच मिळते-लिहिणे,बोलणे,विरोध,मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य, त्याचा मनसोक्त उपभोग घेणारे भाडखाऊ लोकशाहि म्हणजे काय?
काव्यरस

एक चित्रपट आणि एक जाहिरात

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी शनिवार, 30/07/2011 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
गत सप्ताहात उपग्रह वाहिनीवर प्रसारित झालेला राजा आयेगी बारात हा चित्रपट पाहण्यात आला. चित्रपटासोबत अपरिहार्यपणे जाहिरातीही पाहणे क्रमप्राप्त ठरले. त्यातली एक जाहिरात पाहता जाहिरातीमागची कथा आणि चित्रपटाची कथा यात कमालीचे साधर्म्य आढळले. हे साधर्म्य काय आहे हे समजण्याकरिता प्रथम थोडक्यात चित्रपटाचे कथासूत्र इथे मांडतो. चित्रपटातील नायक (ननायक म्हणू शकता), नायिकेसोबत अतिप्रसंग करतो. त्यानंतर नायिका त्याच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागते. पुढे ह्या अन्यायाची भरपाई म्हणून नायक व नायिका यांचा विवाह संपन्न होतो.

अनिवासी भारतीय (एन. आर. आय.) विवाह : एक दृष्टिक्षेप

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 30/07/2011 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा.... आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते.

रेव्ह पार्टी तोडल्यावर...

लेखक ५० फक्त यांनी शनिवार, 30/07/2011 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री पुण्याजवळ्च एका विवक्षित ठिकाणी एका रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, काही विशिष्ट आधुनिक दळणवळणाच्या साधनांचा उपयोग करुन केलेल्या या आयोजनाची खबर काही धडाडीच्या कार्यकर्त्यांना लागल्यावर लगेच ती पार्टी तोडण्याचा निर्णय घेण्यात आला, यासाठी काही अतिविशिष्ट कायदा सुव्यवस्था अंमलबजावणी गटांची मदत घेण्यात आली त्याचा हा रिपोर्ट. पहिले काही फोटो, रेव्ह पार्टीच्या स्थळावर कॅमेरा बॅगेत लपवुन काढलेले आहेत.

ए दिल ए नादान..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 30/07/2011 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
केव्हातरी अचानक एखाद्या गाण्याची आठवण होते आणि मग ते गाणं इंटरनेटवर शोधून ऐकावंसं वाटतं. आताच्या हायटेक जमान्यात हे करणं सहज शक्यही आहे. त्या गाण्याला ऐकण्याच्या मोहात आपण यूट्यूब, धिंगाणा अशी एखादी साइट उघडतो आणि ते गाणं वाजू लागतं. आपल्याही नकळत आपण त्या गाण्याच्या आधीन होऊन जातो आणि ब्रम्हानंदी टाळी का काय म्हणतात ते होतं. ए-दिल-ए -नादान.. हे गाणं पहिल्यांदा केव्हा कानावर पडलं आत्ता आठवतही नाही मला. पण या गाण्याची गहराई जेव्हा पहिल्यांदा जाणवली तो प्रसंग मी विसरूच शकणार नाही. साधारण १०-१२ वर्षापूर्वी....तेव्हा मी कॉलेजला होते आणि मी आणि काही मैत्रीणी कुठूनतरी येत होतो. बहुतेक पुण्याहूनच.