Skip to main content

एका किमयागाराचा थक्क करणारा प्रवास

लेखक दुसरा चान्दोबा यांनी शुक्रवार, 02/01/2026 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
१९४५ मध्ये लाहोरच्या एका सुसंस्कृत कुटुंबात एका मुलाचा जन्म होतो . वडील डॉक्टर, प्रेमळ आई ,—घरात एक आनंदी वातावरण होतं. पण १९४७ च्या फाळणीनंतर सगळंच बदललं. चहुकडे रक्ताची होळी खेळली जात होती. अशाच एका रात्री, आपल्या वडिलांची भरभराटीची प्रॅक्टिस, ते वैभव आणि लाहोरची ती माया सोडून ते कुटुंब रक्ताळलेल्या वाटेवरून भारताकडे निघालं, खरं तर निघालं नव्हतं तर निघावं लागल होत. फाळणीच्या काळात एका 'निर्वासितांच्या' ट्रेनमध्ये तो मुलगा , त्यांची बहीण आणि आई प्रवास करत होते. ती ट्रेन म्हणजे केवळ लोखंडाचा डबा नव्हती, तर ते मृत्यूचं साक्षात रूप होतं. वाटेत दंगलखोरांनी ट्रेन रोखली.

कृत्रिम बुद्धिमत्ता (ए०आय०) : डॉट-कॉम बबलसारखी अवस्था आहे का?

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 02/01/2026 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (ए०आय०) : डॉट-कॉम बबलसारखी अवस्था आहे का? -राजीव उपाध्ये ए०आय०चा बुडबुडा फुटणार अशा आरोळ्या ऐकायला मिळाल्या की मला पञ्चतंत्रातील बैलाचे वृषण आज ना उद्या गळून पडतील आणि आपल्याला मस्त मेजवानी मिळेल या आशेने मागेमागे जाणार्‍या दोन कोल्ह्यांची आठवण होते. अलीकडच्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – ए०आय०) या तंत्रज्ञानाने जगभरात अभूतपूर्व वेगाने प्रसार केला आहे. उद्योग, वित्त, आरोग्यसेवा, शिक्षण, संरक्षण आणि दैनंदिन जीवन—असे जवळजवळ सर्व क्षेत्र ए०आय० च्या प्रभावाखाली आले आहेत.

तुरीची आमटी

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 01/01/2026 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
घरासमोर अनाहुतपणे वाढलेल्या तुरीच्या शेंगांची कचोरी केली.आमटी करेन करेन म्हटलं तर राहिलेच.आमच्याकडे बाजारात तुरीच्या शेंगा विकत मिळत नाही.मागच्या महिन्यांपासून सकाळी फिरायला पुन्हा सुरूवात केली तेव्हा हळूहळू इमारतींनी भरून जाणाऱ्या रस्त्यालगत काही शेतं शिल्लक आहेत तिथे तुरीचे खुप मोठं शेत होत.आज तोडेन उद्या तोडेन ठरवत होतं तर तुरीची काढणी पण झाली.झाली का पंचाईत,आता पुढच्या वर्षीच तुरीची आमटी खाऊया म्हटलं.खरोखरीच मागच्या वर्षीची इच्छा आज नवीन वर्षी पूर्ण झाली.आई खानदेशात फिरायला गेली होती तिकडून तिने तुरीच्या शेंगा आणल्या होत्या.

दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 01/01/2026 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे ||१|| किती घ्यावे पुण्य जळूनी पाप जाय ||२|| कृपानिधींचा आशीर्वाद सदा असे डोई ||३|| त्रैमूर्ती सदोदीत डोळ्यासमोरी राही ||४||

वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा?

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 01/01/2026 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा? ====================== - राजीव उपाध्ये मानवी संततीला (इतर प्राण्यांच्या तूलनेत) संगोपनाची दीर्घकाळ आवश्यकता असते. याशिवाय संपत्ती संक्रमण (कुणाची संपत्ती कुणाला मिळणार) सुलभ व्हावे यासाठी बाप कोण हे निश्चित करणे आवश्यक ठरते (आणि बापाचे नाव लावले जाते). अन्यथा जैविकदृष्ट्या वंश म्हणजे निसर्गात वंश हा स्त्रिचाच असतो. पुरुषाचा वंश ही मानीव कल्पना समाजाने संपत्ती संक्रमणाच्या सोईसाठी निर्माण केली आहे.

ठोंब्यासन - Niksen : Art of doing Nothing !

लेखक चामुंडराय यांनी बुधवार, 31/12/2025 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
Niksen ठोंब्यासन - Niksen : Art of doing Nothing ! अरे, नुसता ठोंब्यासारखा काय बसला आहेस, उठ आणि अभ्यासाला लाग बघू किंवा एखादे सांगितलेले परंतु अजून बाकी असलेले काम केले नसेल ते करण्यासाठी लहानपणी नेहमी "ठोंब्या" असा उद्धार होत असे. त्यात अस्मादिक शेंडेफळ असल्याने "नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये" ह्या उक्तीनुसार घरातील सर्वांकडून अगदी हक्काने विविध कामे अंगावर पडत असत.

सैरभैर डायरी - १

लेखक कपिलमुनी यांनी बुधवार, 31/12/2025 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
बेदरकार बेफिकीर असे पुण्यातील त्या दिवसांचे वर्णन करावे लागेल. गावाकडून कोणी येत नव्हता,फोनबिन भानगड नसल्याने काही विचारत नव्हता,घरी सांगत नव्हता. माझ्यासारख्या वळूला एवढे पुरेसे होते.. पेठेत तलाठी परीक्षा द्यायला आलेल्या किश्याने कॉइनबॉक्स मधून रूमवर फोन केला.. "आक्का अप्पाबळवंतचौकात विजय नरसिंग होमला ऍडमिट आहे, संध्याकाळी ये" इमर्जन्सी असल्याशिवाय फोन करायचा नाही अशी घर मालकांची तंबी होती,त्यामुळे असे कोडवर्ड लागायचे..बहुतेक त्याची मनी ऑर्डर किंवा गावाकडून कोणीतरी पाकीट घेऊन आले असणार,त्याशिवाय हा भाड्या एवढा उदार व्हायचा नाही.

इतिहासाची दुरुस्ती

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 30/12/2025 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
 इतिहासाची दुरुस्ती ========== - राजीव उपाध्ये इतिहासाची दुरुस्ती करण्याचा सध्या एक मोठ्ठा खटाटोप चालला आहे. भारताचा सध्याचा आकार आणि भविष्यात निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेतले तर या उद्योगाने काय साधलं जाईल असा प्रश्न पडतो. एका मित्राने पंतप्रधानांचे सल्लागार संजीव सन्याल यांची एक मुलाखत पाठवली https://youtu.be/u0TV6h2v2qE?si=CRL_8aLnKo01b5Oi). संजीव संन्याल रेशीमबागेतील विद्वानांपेक्षा बरेच सुसह्य आहेत. मुलाखातीचा बहुतेक भाग भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाबद्दल आहे.

"चित्रगुप्ताचा न्याय: सेल्फी घेणारा माकड झाला"

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 30/12/2025 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा मृत्यू झाला. त्याचा आत्मा एका प्रकाशमार्गाने चित्रगुप्ताच्या दरबारात पोहोचला. त्याला समोर एक विशाल न्यायासन दिसले , त्यावर चित्रगुप्त विराजमान होते . ते धवल वस्त्रात, तेजस्वी आणि शांत दिसत होते. त्यांच्या पुढ्यात असंख्य ग्रंथ होते. त्यात पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने केलेल्या पाप आणि पुण्याचा हिशोब होता. चित्रगुप्ताने विचारले, “कुठे जाण्याची इच्छा आहे?” तो आत्मा म्हणाला, “माझ्या जीवनात अनेक चुका झाल्या, पण शेवटी मी भगवंताच्या दर्शनाला गेलो. त्यांच्या चरणी क्षमा मागितली. माझे पाप नष्ट झाले. मला स्वर्ग मिळाला पाहिजे.” चित्रगुप्ताने एक जड ग्रंथ उघडला.

पर्व -भैरप्पा लिखित महाकादंबरी (ऐसी अक्षरे -३७)

लेखक Bhakti यांनी सोमवार, 29/12/2025 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
पर्व 1 मूळ कन्नडमध्ये १९७९ साली प्रकाशित झालेली दिग्गज लेखक डॉ. एस. एल. #भैरप्पा यांची महाकादंबरी 'पर्व' साहित्यातील एक मैलाचा दगड आहे.उमा कुलकर्णी यांनी ती मराठीत भाषांतरीत केली आहे.