Skip to main content

अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारत-अमेरीका संबंध

लेखक विकास यांनी गुरुवार, 28/07/2016 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरीकतल्या निवडणुकांच्या दरम्यान भारतीयांमधे भारत-अमेरीका संबंध चर्चा होणे अपरीहार्य होत असते. त्यात डेमोक्रॅट्स आवडणारे, न आवडणारे, रिपब्लिकन्स कसे बरोबर आहेत वगैरे सांगणारे सर्वच येतात. मी देखील त्यातला एक आहेच! ह्या लेखाचा विषय प्रामुख्याने केवळ अमेरीका-भारत संबंध या संदर्भातच असल्याने या लेखादरम्यान इतर अमेरीकन राजकीय घडामोडींचा कमीत कमी अथवा शून्य संदर्भ देण्याचा प्रयत्न/हेतू आहे. ओबामाच्या विशेष करून पहील्या निवडणुकीच्या वेळेस, त्याच्यावर संशय घेत मॅकेनला पाठींबा देणारे होते आणि आत्ता देखील हिलरी ऐवजी ट्रंप (भारत-अमेरीका संदर्भात) अधिक योग्य असेल असे देखील म्हणणारे आहेत.

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.६) सुनता है गुरु ग्यानी - चौथा आणि पाचवा चरण

लेखक Anand More यांनी गुरुवार, 28/07/2016 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
सुनता है गुरु ग्यानी या भजनाचा कुंडलिनीच्या प्रवासाशी मी लावलेला संबंध काही वाचकांना, "मारून मुटकून गणपती" बनवण्याचा माझा प्रयत्न वाटला. आणि काहींनी सौम्य शब्दात तशी प्रतिक्रिया देखील दिली. अर्थ लावण्याचा माझा हा प्रयत्न म्हणजे ढगांच्या आकारातून प्राणी शोधण्याचा एक प्रकार वाटू शकतो हे मला मान्य आहे, पण माझ्या मनात कुंडलिनी आणि या भजनाचा संबंध लागण्याचे सगळ्यात मोठे कारण असलेल्या चरणापर्यंत आपण आता पोहोचलो आहोत. त्यामुळे या दोन चरणांचा अर्थ वाचताना कदाचित माझा सगळा प्रयत्न वायफळाचे मळे फुलवण्याचा नव्हता हे वाचकांना पटेल असे मला वाटते.

सोबतीण (भाग ३)(शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 28/07/2016 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
"पृथा तुला तर पार त्यातीथे कोकणात अनुभव आला. तोसुद्धा रात्रीच्या अंधारात काहीसा आवाज आणि एक धुसर आकृती... ज्याची तुला आत्ता विचारले तर खात्री देता येणार नाही. पण माझा अनुभव या इथे गजबजलेल्या मुंबईमधला आहे. तो अनुभवच इतका जिवंत आहे की त्यापुढे मरण सोपं  वाटेल," अपर्णा म्हणाली. "ए अपर्णा उगाच नमनाला घडाभर तेल अस करू नकोस हा. काय घडल नक्की सांग बघू मला." पृथा हसत अपर्णाला म्हणाली. "तेच सांगते आहे. पण मला मध्ये  मध्ये बोलून माझी लिंक नको ह तोडुस  पृथा." अपर्णाने तिला दम दिला. त्यावर हसत पृथा म्हणाली, "बर बाई. माझी हाताची घडी आणि तोंडावर बोट. एकदम गप्प बसते आता. तूच बोल... हम्.

विस्फोट

लेखक योगेश कोकरे यांनी गुरुवार, 28/07/2016 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
खुप भांडावस वाटत , ओरडावसं वाटत, जेव्हा गरिबांवर होतो अन्याय, सत्य बोलणाऱ्याची जीभ कापली जाते, जिथे कष्टाचे पैसे उन्माद झालेली गिधाडं पळवतात, अशी एकेक ठिणगी पडत राहते, ठिणग्यांचा बनतो अग्नीगोल, अग्नी गोलाचा बनतो ज्वालामुखी, हाच ज्वालामुखी घेऊन जाऊ इच्छितो, अन्याय करणारे,भ्रष्टाचारी,गुंड,माफिया,बलात्कारी, आतंकवादी यांच्या समुहामध्ये आणि ब्रम्हाडाची निर्मिती ज्या शक्तिशाली स्फोटाने झाली तितक्याच ताकतीने तो ज्वालामुखी फोडू इच्छितो, भस्म होउदेंत सगळे भाडखाऊ यांच्याबरोबर मी देखील भस्म होउदे कारण त्या स्फोटानंतर होणाऱ्या नवनिर्मितीचे सुख असेल मला, माहितीय मला एकटा नाही लढू शकणार इतक्या हरामी
काव्यरस

देवदासच्या निमित्ताने....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी गुरुवार, 28/07/2016 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
आजच आंतरजालावर नेहमीप्रमाणे काहीबाही शोधत असताना समोर बातमी दिसली.... मराठीतल्या देवदासचा पहिला टिझर लाँच.. नेहमीप्रमाणे उत्सुकता चाळवली गेली अन मी त्या लिंकवर क्लिक केलं... 'तुझं लग्न हे माझं स्वप्न होतं आणि ते मी पाहिलंही पण तुझ्या रुपाच्या आणि मनाच्या सौंदर्यात इतका वाहुन गेलो कि नवर्‍याच्या रुपात मलाच पाहायला विसरुन गेलो. आता तर साठलेल्या अश्रुंना पाउलवाटही सापडत नाही ग.त्या अश्रुंची विहीर कधी तुला पाहायला मिळाली असती तर माझ्या दु:खांचा अंदाज तुला लावता आला असता.....मी काय करेन माहिती आहे, मी नक्कि न रडताच श्वास सोडेन.

'माज' आणि 'मान'!

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 28/07/2016 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
'माज' आणि 'मान'! गाडी सुटतासुटता धावत येऊन त्याने डबा पकडला आणि धापा टाकत एका रिकाम्या सीटवर बसून त्याने आसपास नजर फिरवली. बहुधा फर्स्टक्लासचा प्रवासी असावा. हातात आयफोन, मनगटावर चकचकीत ब्रेसलेट, गळ्यात जाडजूड 'चैन', बोटात अंगठ्या आणि चेहऱ्यावर चोपडलेला चकचकीतपणा! नजरेत तुच्छ तुटकपणा ओघानेच आला... गाडीनं वेग घेतला आणि त्यानं हातातली 'मिन्ट'ची घडी उलगडली. बॆग उघडून लहानसा टप्परवेअर बाहेर काढला, आणि मिन्ट वाचत डब्यातला एकएक तुकडा चघळू लागल्या. जगाला फाट्यावर मारतो, असे इतरांना वाटण्यासाठी जे जे करायचे असते, तसंच करू लागला.

मी आर्ची बोलत्येय.

लेखक आंबट चिंच यांनी गुरुवार, 28/07/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
काय मस्त सकाळ उजाडलीये अजुनही झोपुन राहावसे वाटतंय , पण आईने तरीही उठवलेच. नाही तर शाळेला उशीर झाला असता. सगळं लवकर आटोपले तेवढ्यात शैला, शारदा आल्याच. मग डबा दफ्तरात टाकुन तशीच पळाले शाळेला. शाळेत जाता जाता वाटेत त्यांना काल आईकडे नागराजदादा आलेला सांगितले आणि कायतरी पिक्चर काढाणारे म्हणे तर मला काम करायला पाठवशील का हे विचारत होता. तशा "अय्या खरंच" दोघी एकदमच किंचाळल्या. "ए मग तु हिरोईन झलीस की आम्हाला नाही ना विसरणार? " आणि "हिरो कोण आहे ?" "काय नाव पिक्चरचं?" प्रश्नाचं मोहोळ माझ्या मागे लावले. अगं अजुन कशात काय नाही मलाच माहित नाही तर तुम्हाला काय सांगु.

बापाचा गुण

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 28/07/2016 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली आम्हा बापलेकीचं बरंच गुळपीठ जमलयं, एक तर, आम्ही तिघेही आपापल्या दिनक्रमात अडकल्यामुळे, पुरवठा कमी झाला की मागणी वाढते, या नियमाने असेल कदाचित. मग काल एक नविन फर्मान निघालं, इथुनपुढे घरातील सगळे निर्णय मतदानाने घ्यायचे. विषय होता, पुढच्या दाराला अजुन एक लोखंडी दरवाजा बसवण्याचा. पहिले प्रदीर्घ चर्चा, दरवाजा बसवण्याची आवश्यकता, उपलब्ध पर्याय आणी उपयुक्तता यावर. आम्ही राहतो तिसर्या मजल्यावर, इमारत जुनी असल्यानं लिफ्ट नाहीय.

मला आवडलेला शायर- राहत इंदोरी

लेखक सुंड्या यांनी गुरुवार, 28/07/2016 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचा एक वाजला होता दिल्लीच्या जीयासराय मधील अष्टशीला निवासाच्या २ऱ्या तळावरील चवथ्या रूममध्ये मी, माझा रूम पार्टनर संतोष, आणि दोन ‘शेजारी’- बाजूचे ‘प्रधानजी’ आणि वरच्या रूममधला संदीप असे तिघे चकाट्या पिटत होतो (संतोष फक्त ऐकायचा).प्रधानजींनी संदीपची काहीतरी चिमटी काढली आणि संदीपने सहज उत्स्फूर्त आवाजात हे म्हणन सुरु केलं- उसकी कत्थई आंखो मे है जंतर-मंतर सब, चाकू-वाकू छुरीया-वूरीया खंजर-वंजर सब जबसे तुम रुठी हो मुझसे रुठे रुठे से राहते है, तकिया-वकीया चादर-वादर बिस्तर-विस्तर सब मै कब डूबुंगा फिक्र किया करते है, कश्ती-वश्ती, दर्या-वर्या लंगर-वंगर सब... “वा वाह!!.....गजब” -मी “जियो क्या ब

आरोळ्या फेरीवाल्यांच्या

लेखक जागु यांनी बुधवार, 27/07/2016 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी मुंबई सोडली तर इतर शहर, गावांत आतासारखी बाजारपेठ खूप कमी होती. मॉल तर अस्तित्वातच नव्हते. मग काही नित्य गरजा भागवणार्‍या वस्तूंसाठी दारावर येणार्‍या फेरीवाल्यांची आतुरतेने वाट पाहिली जायची. बहुतेक फेरीवाले तेच ठरलेले असल्याने ह्या लोकांबरोबर चांगला परिचय होऊन एक आपलेपणाही तयार होत असे. त्यांच्या रस्त्यावरून दारापर्यंत येणार्या आरोळीवरून कोण व्यक्ती आली असेल हे कळायची. कुठल्या कुठल्या दूरवरच्या गावातून ही लोक व्यवसायासाठी पायी भटकत यायची.