Skip to main content

"जीवन पूर्णतः जगा" म्हणजे काय रे भाऊ?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
मला वाटतं की बीचवर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ रात्रीची आहे. मला माझे पाय उबदार वाळूमध्ये रुतून ठेवण्यात मजा येते.भरतीच्या लाटेचं किनाऱ्यावर वेगाने येणारं पाणी पायावर घ्यायला मला मजा येते. माझ्या सर्व समुद्रकिनाऱ्यावरील अनुभवांपैकी, सर्वात सुंदर आठवणी, तारांकित आकाशाखाली सूर्य मावळल्यानंतरच्या आहेत.

त्याच्या सारखा नशिबवान तोच.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
लोकांनी अनेक शतके ह्या पृथ्वीवर पार केली आहेत आणि लोक बदलत आले आहेत. असं करत असताना त्यांच्यामध्ये नवीन विश्वास जागृत होत गेला असावा.ते गरजेप्रमाणे नवीन तंत्रज्ञान निर्माण करीत गेले असावेत. तेव्हा ते काय असावेत आणि आता काय आहेत याचा विचार केल्यावर जाणवतं की,बदल चांगला ही वाटतो आणि वाटत ही नाही. जेव्हा माणूस पहिल्यांदा बोलू शकला आणि चालू शकला तेव्हा तो दिवसभर घरांमध्ये राहिला नसावा. आपले काही दिवस बाहेर ही घालवत असणार. निसर्गाशी एकरूप होत असताना तो त्यातून आनंद ही घेत असावा. त्याच्या श्रद्धेचा देव ही त्याला निसर्गात सापडत असावा.

अत्तर

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 12/05/2024 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
अत्तर ------------------------------------------------ संध्याकाळची वेळ होती . राजू घराबाहेर होता. पोरांशी खेळत .मुलांचा आरडाओरडा चालू होता. खेळ रंगात आला होता. त्याचे वडील तालुक्याच्या गावाला गेले होते. ते आले. येताना त्यांनी बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. त्यांच्या हातातली बंदाची पिशवी चांगलीच फुगलेली दिसत होती. राजू तेरा- चौदा वर्षांचा होता . तो स्वतःला मोठा समजू लागला असला , तरी त्याचं पोरपण मध्येच उठून दिसायचं.वडिलांना येताना पाहून त्याने खेळणं सोडलं. तो पळत पळत त्यांच्या मागे आला. ‘अप्पा काय आणलं ?’ असं कुतूहलाने विचारत त्याने अप्पांच्या हातातली पिशवी घेतली. तो घरात शिरला .

सुंदर गीते ही स्मरणात येती

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/05/2024 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
अवकाश आहे म्हणून बसता जुन्या गोष्टी स्मरणात येती कधी सत्याची,कधी असत्याची सुंदर गीते ही स्मरणात येती शताब्दी एकवीसावी अन् समय नवे प्रकृतीने दान केलेली धनराशी स्मरते कमजोर वासे घेऊन जूने घर वसवले मनाशी जुळले ते सुंदर घर स्मरले नदी नाल्यामधे होतो तरत दिनरात्र सारे भोळे येती स्मरणी कागदी नाव चालविणारे सणासुदीची मस्ती आता अंमळ जास्त होई किंतू ईश्वराचे छप्पन छंद स्मरणात येई आता लाखोंची घरे वीजदिपानी सजविती रातकिड्यांच्या लुकलुकणी स्मरणात येती आता लाख रुपयांना किंमत विशेष नाही चवली अन् अठ्ठणीची किंमत स्मरणात येई

ढग हे माझे अनोळखे खरे मित्र.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/05/2024 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी अनेकदा पावसावर,वादळांवर लिहिलं आहे. पण ह्या गोष्टींचा उगम करणाऱ्या ढगांवर लिहिलं नाही.आज मला माझ्या लहानपणी शेतात काम करतानाच्या आठवणी येऊन,भर पावसाळ्यात शेतात काम करत असताना पावसाची सर आल्यावर धावत घरात जाण्या अगोदर, आकाश कसं ढगाळायचं याची आठवण आली आणि ढग आठवले. मी ढगांकडे माझे अनोळखी मित्र समजून पहायचो आणि पहातो. आभाळात विहरणाऱ्या ढगांकडे विशिष्ट नजरेने त्यांच्याकडे टक लावून मला पाहावसं का वाटायचं, हेच कळत नाही. मला एक गोष्ट माहीत होती: मला माहीत होतं की हवेवर मुक्तपणे राज्य करणारे ढग सुंदर होते. ढगांचा साधेपणा आणि सौंदर्य निर्विवाद होतं.

मौन!

लेखक Bhakti यांनी रविवार, 12/05/2024 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
मन हल्ली अळूमळू झालंय असं उगाच भासतयं .समजतच नाही अस का काटे कोरांटीच्या फुलांशी खेळायला त्याला जमत नाही .एक ओरखडा जरी त्याच्यावर पडला तरी चर्र् आवाज येतो तो देखील सहन होत नाही. भाषेतल्या अक्षर भवर्यात जीव देण्याऐवजी ते अंतरच वाढवत धावतं. संभाषणातला अंतरच मनाचे तीव्र मौन धारण करतात.अंतर्मुखाच्या तळाशी विहारतांना चमचमता ह्या मौनाचा मोती शिंपल्यातून मिळवला जातो. मिटलेल्या गुलाबी ओठांआड,घशात अडकलेल्या शब्दांना कोरड पडते ते मौनाच्या मधात विरघळून जातात. सकाळ- संध्याकाळ मंदिरात होणाऱ्या घंटांचे गुंजराव प्रत्येक नादाला मनाला स्थिर करतात.

लेखक

लेखक भागो यांनी रविवार, 12/05/2024 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
तो लेखक होता. तो कथा लिहित असे. मधून मधून एखादी कविताही लिहित असे. “चुकलेल्या वाटा.” हा त्याचा एकमेव कथासंग्रह होता. त्याच्या घरात त्याच्या शिवाय अजून दोन मेंबर होते. एक स्त्री आणि एक मुलगा. दुपारी चार वाजता तो तयार झाला. कुठेतरी जायचे होते. कुठे? जिकडे वाट फुटेल तिकडे, जिकडे पाय नेतील तिकडे. तो जायला निघाला तेव्हा ती स्त्री आणि तो मुलगा टीवी बघत होते. “मी जातोय.” Nobody said anything. जा, नका जाऊ, लौकर ये. टेक केअर. काही नाही. कदाचित त्यांना ऐकू गेले नसावे. कोणीतरी बोललेही असेल पण मग ह्याला ऐकू गेले नसणार. टीवी फुल ब्लास्ट.

चार दिवस मिळाले असतां हसू खेळून निभवावे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/05/2024 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
जगावे फक्त मित्रांनो,बस अशी कल्पना आहे दोन वेळेच्या भाकरीतून जिणे आहे मेहनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने हर स्वास्थ्यात मला आपातातून आहे वाचववणे हे माझे भाग्य आहे,जे आज मला मिळावे वेदना आज करून,का कुणाला दर्शवावे चार दिवस मिळाले असतां, हसू खेळून निभवावे स्विकारता आहे माझी,कसे ते मी व्यतीत करावे दुःख ना कुणी ऐके,असो माझे वा परक्याचे अवधि हाच आहे,हसणे अथवा हसवण्याचे

अर्धा कप दुध...

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 12/05/2024 08:17 या दिवशी प्रकाशित केले.

ऑफिसला जायच्या घाई गडबडीत होता. घरात शांतता होती. त्याला एक हलकासा आवाज आला, 

"अरे,किती दिवस नोकरी करणार,पासष्ट झाले की. 

आई,लवकर उठलीस, चहा घेणार? 

नको ,तुला उशीर होतोय. 

बरं निघतो मी". क्लिनीक मधे खुप गर्दी होती. 

पटापटा काम उरकत असतानाच मोबाईलची घंटी वाजली. 

" आहो,सासूबाई बघा ना उठत नाहीत. बराच वेळ झाला मी प्रयत्न करतेय.

 काय झालं.?

काही नाही,आज तू आंघोळ घाल म्हणाल्या.

गाढ झोपेतलं माझं स्वप्नं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/05/2024 03:42 या दिवशी प्रकाशित केले.
मला आठवतं,शेतात काम करताना सर्वात जास्त मेहनत घेतली जाते ती म्हणजे शेत नांगरणं. माझ्या आजोबांच्या शेतात अनेक कामगार कामं करत असायचे.शेत नांगरण्या सारखी कामं अर्थातच कामगारांना दिली जायची. पण त्या दिवशी मी स्वतः एक कुणगा अट्टाहासाने नांगरायचं असं ठरवलं. आणि व्हायचं तेच झालं. सूर्यास्त होई पर्यंत माझं अंग चोळामोळा झालं. रात्री घरी येऊन कसाबसा दोन घांस गिळून अंथरूणावर पडलो. आणि सूर्योदय केव्हा झाला हे कळलंच नाही. असं म्हणतात जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा मेंदूत येणारे विचार स्वपनाद्वारे हयदोस घालतात. त्या दिवशी माझं अगदी तसंच झालं.