Skip to main content

उरल्या त्या फक्त आठवणी

लेखक RDK यांनी शनिवार, 23/09/2017 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
सुखरूप आणि सुरक्षित अशा गावातून बाहेर पडलो निघून आपल्या परिवारातून जगामध्ये आलो नशीब आजमावण्या कठीण परिश्रमही केले जगणे ना मजला कधीही कळाले हसण्याचा आवाज माझाच माझ्या पडतोय कानी जणू काही मलाच चिडवू पाहतोय गाणी गायलेली शाळेतील माझ्या माझ्या जखमांवर फुंकर घालताहेत एकेक मित्र उडत येवून  हातांनी मोठा घेर बनवताहेत बनून डोक्यातले विचारचक्र गरगर फिरताहेत थंडीच्या दिवसातील थंडी उन्हाळ्यातही वाजतेय "आजारी पडलो का ?" म्हणून  हात कपाळावर जातोय उडता आले असते तर गावी उडून गेलो असतो परतता आले असते  तर भूतकाळाला घट्ट बांधून ठेवले असते भिंतीच्या कोपऱ्यात लपून बसावेसे वाटतेय बाहेर

Night Out...!

लेखक प. शी. यांनी शनिवार, 23/09/2017 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रमच्या पापण्यांची हालचाल झाली. पुसटशी चमक त्याला दिसत होती. रस्त्यावर काचेचा चुरा पडला होता. त्याची bike रस्त्याच्या कडेला तशीच पडून होती. तो भानावर आला. डोक्याला हात लावत रस्त्यावरच बसुन होता. त्याच्या कपाळावर जखम झाली होती. त्याच कपाळ, भुवया, कान सर्व काही रक्ताने माखल होत. हाता-पायालाही बरचस खरचटल होत. गुढग्या जवळ खरचटल्यामुळे jeans फाटली होती. शर्ट रक्त आणि मातीन माखला होता. तो हळुहळु ऊभा राहीला. त्याची नजर सुमनवर पडली. सुमन रक्ता-मातीच्या चिखलात तशीच निपचीत पडून होती. तिचा एक पाय Activa च्या खाली अडकला होता. तिचे रक्ताने भरलेले केस तिच्या चेहर्यावर चिटकून होते.

बदलाच्या गतिचे नवे नियम मांडणारा: 'न्युटन'

लेखक पुंबा यांनी शनिवार, 23/09/2017 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
भारत बदलतो आहे, सत्तर वर्षांच्या प्रवासात असंख्य खाचखळग्यांतून, काट्याकुट्यातून वाट काढताना, जुन्या समस्यांवर विजय मिळवत नव्या समस्यांना तोंड देताना सतत कात टाकून नविन रुपडे घेतोय. काही बदल इतके क्रांतीकारी की त्यांच्याशी जुळवून घ्यायलाच शक्तिचा अफाट व्यय होतो अन काही इतके धीमे की 'काही होतंच नाही' अशी निराशा व्हावी. कित्येक प्रामाणिक लोक व्यवस्थेला आव्हान देता देता थकून जाऊन परत व्यवस्थेचाच भाग होऊन राहतात अश्या वेळेला धीमी पण आश्वासक पावले टाकत काही शिलेदार मात्र आपल्या परीने लढत राहतात. न्युटन ही अश्याच एका शिलेदाराची कथा आहे.

सनी देओल, तू पुन्हा वापस ये!

लेखक पिंपातला उंदीर यांनी शनिवार, 23/09/2017 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
मी पत्रकारितेचं शिक्षण घेत होतो तो काळ. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही आमच्या गावातच कुठल्याही वर्तमानपत्रात उमेदवारी करणं अपेक्षित होतं. तशी मी करत होतो. मी ज्या वर्तमानपत्रात काम करत होतो, त्यात एकदा बॉलिवुडमधल्या घराणेशाहीवर लेख आला होता. त्या लेखात धर्मेंद्रच्या दोन्ही मुलांनी म्हणजे सनी देओल आणि बॉबी देओल यांनी धर्मेंद्रच्या परंपरेचा सत्यानाश केला या अर्थाची काही वाक्यं होती. तो लेख प्रकाशित झाल्यावर पत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे यवतमाळ, बीड, चंद्रपूर, उस्मानाबाद आणि तत्सम जिल्ह्यांमधून वर्तमानपत्राच्या मुख्य कचेरीत आले.

खूप दूध शिल्लक आहे

लेखक गम्मत-जम्मत यांनी शनिवार, 23/09/2017 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
घरी २ लिटर दूध शिल्लक आहे. खाणारी तोंडे २ च आहेत. कृपया आरोग्य दायक पाकृ/ पर्याय सुचवा. १. पिउन टाकणे हा पर्याय करून झाला आहे. जास्त प्यायला जमत नाही. २. नवरोबा जास्त गोड खात नाही. हे मला प्रश्नोत्तरे मध्ये लिहायचे होते. पण access denied. धन्यवाद.

स्पर्शाला पारखा... पुरुष

लेखक मराठी कथालेखक यांनी शनिवार, 23/09/2017 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्श ही सुद्धा एक संवादाची भाषा आहे असं म्हंटलं जातं. चित्रपट, मालिका यांतली पात्र अनेकदा एकमेकांना स्पर्श करताना दाखवतात, अनेकविध नात्यातले (मैत्री) स्त्रीपुरुष हातात हात घेतात , कधी आलिंगन देतात , कधी स्नेहाने, प्रेमाने, कधी सांत्वन करण्यासाठी , तर कधी धीर देण्यासाठी..काही वेळा तर रोज 'गुड मॉर्निंग/नाईट' म्हणत 'हग करणे' ही दाखवतात. आणि यात पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी हे तर आलेच पण त्याशिवाय आई-वडील आणि मुलगा/गी, मैत्रमैत्रिणी, आजी आजोबा आणि नातवंड इतकेच काय तर कधी दीर-वहिनी वगैरे वगैरे असे अनेक नात्यात होणारा स्पर्श अगदी सहज दाखवतात. मला त्यावर अजिबात टीका करायची नाही.

संघर्ष : भाग ०४

लेखक दिपक लोखंडे यांनी शनिवार, 23/09/2017 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ०३ पासून पुढे.. १०:४० ला अनिकेतची गाडी सेंट्रल कॅफे समोर येऊन थांबली राधा कॅफेच्या दाराशीच उभी कोणाचीतरी वाट बघत असताना दिसली. अनिकेतने गडबडीने त्याची गाडी पार्क केली आणि तो राधा जवळ येऊन थांबला. त्याला समोर बघून राधा म्हणाली ‘अनिकेत तू लेट आहेस..’ ‘आज अनुला कॉलेज पर्यंत सोडावं लागलं म्हणून थोडा वेळ झाला’ अनिकेत राधाला समजावण्याचा सुरत म्हणाला.. राधा त्याच्याकडे बघत हसली आणि म्हणाली ‘अरे इट्स ओके..

ग्राम"पंचायत" लागली..!! -2

लेखक विशुमित यांनी शनिवार, 23/09/2017 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
ग्राम"पंचायत" लागली..!! -1 यंदा बिनविरोध होणार नाही, हे माझ्या अगोदर नानांनी त्या होलपाटण्या मन्याला का सांगितले असावे? घरातल्या माणसांना किंमतच नाही दिली कधी नानांनी. कधी कोणासमोर चांगल्या कामाचे कवतुक नाही केले. स्वतःला सांगलीच्या आबांचे पाईक समजत राहिले आयुष्यभर. वडाच्या झाडाखाली रोपटे येत नाही हे मान्य पण कोणालाच वर येऊन नाही द्याचे, असे एकंदरीत वडाचे लॉन्ग टर्म धोरण असावे बहुतेक. कधीच कुठल्या मिटिंग मध्ये सहभागी होऊ नाही दिले.

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग १ )

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 23/09/2017 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
तिला न पाहता होणारी तगमग न समजणारी होती , काय होतंय आपल्याला ? नक्की काय होतंय ? आपण तिच्या प्रेमात , ... छे उगाच काहीतरीच काय ,.... पण मग असं का होतंय .. समोर असतो तेव्हा तिच्याशी पटत नाही आणि भांडण होतात आपली , असं वाटत कि ती नसलेली बरी, पण ती नसली कि असं का वाटतय ? कि काहीतरी चुकतंय .. नाही माहित पण असं वाटतय हे नक्की आहे ..... " ए हाय , कसा आहेस ? " " कुठं होतीस ? " " का आता काय आहे ? काय झालाय का ? हे बघ असं प्रत्येक गोष्टीसाठी मलाच जबाबदार धरू नकोस . मला तर माहितही नाही काही ....." " तू नव्हतीस तर ठीक वाटत नव्हत .

चल, घरी चल .....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 22/09/2017 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
तू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात? म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो. पण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस. आधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास! माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.