Skip to main content

Making of photo and status : ७. गोलुमोलु

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 19/11/2017 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 काय ? कसं काय ? ठिक आहे ना ? येता का सोबतीला ? जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत, दुध आणायला.

चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 19/11/2017 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध चारठाणा हे माझ्या सासुबाईचे माहेरगाव. म्हणजे त्या तिथे अगदी जन्मल्या किंवा लहानाच्या मोठ्या झाल्या नाहीत पण वडीलांचे मूळ गाव म्हणून जाणे येणे कायम होते, आजही आहे.काकांची शेतीभाती आहे, जुने घर आहे अगदी माळदाचे. माळद हा छप्पराचा एक प्रकार असतो मराठवाड्याच्या तुफान गरमीत माळदाचे घर म्हणजे एअर कंडीशंड... एवढेच नाहीतर ह्या माळदाच्या छतात दागिने, पैसे ते अगदी वेळ पडली तर हैद्राबाद मुक्ती संग्रामातले क्रांतिकारकही लपत. असे ते जाड भक्कम छत. पण ह्या माळदाच्या छतात सापही वस्तीला असतात त्यामुळे जेवताना झोपताना वरून साप अंगावर पडणे अगदी नित्याचे नसले तरी सवयीचे.

राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ.

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 18/11/2017 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ. [ही एक रूपककथा. लावू तितके अर्थ. करू तसा विचार.] एक होती राणी एलिझाबेथ. दुसरी होती साधी एलिझाबेथ. दोघींचाही आपापल्या मामांवर भारी जीव होता. मामांचाही त्यांच्यावर. एके दिवशी घरात अचानक गर्दी दिसू लागली. गर्दीतच मामा झोपलेला दिसला. शेलाट्या अंग काठीचा मामा एकदम जाडसर दिसू लागला. त्याच्या अंगा खांद्यावर कसली कसली हारफुलं घातली जाऊ लागली. साधी एलिझाबेथ मामाजवळ जायचा हट्ट धरते. राणी एलिझाबेथ सगळे प्रोटोकॉल्स सांभाळत, मूक अश्रू गाळीत उभी राहते. जराशाने आपले कोणच ऐकत नाही म्हटल्यावर, साधी एलिझाबेथ रडून रडून हलकल्लोळ माजवते.

पसायदानातील समतोलाचे एक आगळेपण

लेखक माहितगार यांनी शनिवार, 18/11/2017 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
नियमीतपणे छानशा बोलीभाषेतून बाल कविता करणार्‍या एका (#) कवि महोदयांच्या सहज म्हणून लिहिलेल्या एका कवितेकडे माझ्या छिद्रन्वेषी स्वभावाने लक्ष वेधले. कवितेतील वेगवेगळ्या पशुपक्षांना आपल्या स्वभाव वैशिष्ट्याचाच कंटाळा आलेला असतो. जसे की मांजर म्हणते की मी म्याऊ म्याऊच कधी पर्यंत म्हणू? कोंबडी म्हणते कुकूचकू करून कंटाळ्चा आलाय, तर कावळा म्हणतो मी काळाच रहाणार का ? मी कविंना विचारले की न्यूनगंड असू नये असा काही बोध अभिप्रेत आहे का ? संवादातून लक्षात आले की कविच्या बाल कवितेचा उद्देश बोध नव्हे केवळ रंजन होता.

रुद्रम

लेखक तिमा यांनी शनिवार, 18/11/2017 03:13 या दिवशी प्रकाशित केले.
श्वेतांबरा ही मराठीतली पहिली सिरियल आठवते. ती बघताना त्यांत अनेक त्रुटी असूनही ती उत्सुकतेने शेवटपर्यंत बघितली. फक्त, त्याचा शेवट झाल्यावर, शेवटच्या भागात जो,'अहो रुपम अहो ध्वनिम' चा कार्यक्रम झाला तो हास्यास्पद होता. पुढे फक्त दूरदर्शनची सद्दी होती तोपर्यंत अनेक चांगल्या-बर्‍या मालिका बघितल्या. नंतर प्रायव्हेट चॅनेल आले आणि काही बर्‍यापैकी सिरियल बघायला मिळाल्या. शेवटची सिरियल बघितल्याची आठवते ती 'या गोजिरवाण्या घरांत'! पण ती फारच पाणी घालून वाढवायला लागल्यावर बघणे बंद केले. त्यानंतर कुठलीही मराठी किंवा हिंदी सिरियल बघायची नाही हे ठरवून टाकले. तो नियम अगदी यावर्षीपर्यंत कटाक्षाने पाळला.

जपमाळ

लेखक शैलेन्द्र यांनी शुक्रवार, 17/11/2017 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
हेही बरेच आहे, तेही बरेच होते, आपापल्या परीने, सारे खरेच होते मोजून पाप माझे जपमाळ ओवलेली, मोक्षास गाठण्याला, तितके पुरेचं होते, आयुष्य तारकांचे मोजीत रात्र होती मोहक असे मनाला भूलवीत बरेच होते खाणीत नांदण्याचा कोळश्यास शाप आहे नसते ठिसूळ तुकडे तर तेही हिरेच होते सरणास भेटताना गेली नजर मागे चेहरे ओळखीचे हसरे सारेच होते -शैलेंद्र
काव्यरस

दवणीय अंडी - अंडे ४थे - सुविचारी सकाळ

लेखक आदिजोशी यांनी शुक्रवार, 17/11/2017 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा सुविचारः न पिणार्‍याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते. अंडी घालण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळ. सूर्य काही तासांपूर्वीच उगवलेला असतो, मेंदू मस्त रिकामा असतो, मन मात्र भावनांनी ओथंबलेले हवे. रात्री नंतर रोज येणारी सकाळ हँगओवर सोबत इतरही अनेक गोष्टी घेऊन येते. प्रत्येक सकाळ ही एका नव्या आयुष्याची सुरुवात होऊ शकते. रोज नवं आयुष्य. नवी बायको/नवरा, नवी नोकरी, नवे आई-बाप, नवे शेजारी, नवे मित्र, नवे कपडे... साबण मात्र जुनाच असावा. शरीरावर चढलेली पुटं घालवण्याचं पुण्यकर्म साबणच करतो.

वैज्ञानिक घडामोडी - भाग १

लेखक arunjoshi123 यांनी शुक्रवार, 17/11/2017 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्रहो, आपण विज्ञानशासित जगात राहतो. खालच्या पानावर scientific revolution शास्त्रीय समजुती कशा बदलतात हे कुन या लेखकाने मांडले आहे. वैज्ञानिक ज्ञानाच्या स्वरुपाबद्दल त्यांचं वरच्या लिंकमधे दिलेलं पुस्तक महत्त्वाचं मानलं जातं. त्यात खालचा उतारा महत्त्वाचा वाटला -
Normal scientific progress was viewed as "development-by-accumulation" of accepted facts and theories.

अनवट किल्ले २२: सांगली, मिरज, दंडोबा, जुना पन्हाळा, रामगड, बागणी, बत्तीस शिराळा ( Sangli, Miraj, Dandoba, Juna Panhala, Ramgad, Battis Shirala, Bagani )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 17/11/2017 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
अनवट किल्ल्यांच्या या मालिकेतील सांगली जिल्ह्यातील उर्वरीत किल्ल्यांचा घेतलेला हा एकत्रित आढावा. अपवादात्मक प्रसंग सोडले तर फार मोठ्या एतिहासिक घटना या परिसरात झालेल्या नाहीत. तसे हे छोटे भुईकोट आहेत. यांचा आढावा आपण या एकाच भागात घेउ आणि दक्षिण महाराष्ट्राची दुर्गयात्रा संपवू. मिरजः- मिरजेचे उल्लेख ई.स. दहाव्या शतकापासून येतात. कोल्हापूरच्या शिलाहार घराण्याचा चौथा शासक जट्टिगा दुसरा (१०००-१०२०) याला घोषित केले. त्याचा मुलगा मारसिंह (१०५०-१०७५) याच्या ताब्यात करहाटक (कऱ्हाड), मिरींजा (मिरज) आणि कोकण हा परिसर होता.

पुणे ते लेह (भाग 2 - पुणे ते शामलजी)

लेखक अभिजीत अवलिया यांनी शुक्रवार, 17/11/2017 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ते लेह (भाग १ - पूर्वतयारी) २४ ऑगस्ट तर रात्री ९ ला पुण्याहून (कोथरूड मधून) निघालो आणि लगेच चांदणी चौकातून बायपासवर गेलो. आजचे लक्ष होते फक्त १३५ किमीवर असलेले नवी मुंबईतील कोपरखैरणे. रस्त्याची मुंबईहून पुण्याकडे येणारी बाजू वाहनांनी खचाखच भरलेली होती. दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी अपेक्षितच होती. साडेनऊच्या सुमारास एक्सप्रेस वे वर पोचलो. माझा सर्वात आवडता रस्ता. पाऊस देखील नव्हता त्यामुळे ११ ते ११:१५ पर्यंत कोपरखैरणेला पोचू असा अंदाज होता.