Skip to main content

शुल्बसूत्रामधील भूमिति - भाग २.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी सोमवार, 18/12/2017 06:28 या दिवशी प्रकाशित केले.
’२’ चे वर्गमूळ.

प्रमाणं तृतीयेन वर्धयेत्तच्च चतुर्थेनात्मचतुस्त्रिंशोनेन। सविशेष:।बौधायन २.१२.

इतर शुल्बकारांनीहि जवळजवळ ह्याच शब्दांमध्ये ’२’च्या वर्गमूळाचे हे मूल्य दाखविले आहे.

सरळ अर्थ - प्रमाण बाजूमध्ये तिचा तिसरा भाग वाढवावा, त्या तिसर्‍या भागाचा चौथा भाग वाढवावा, त्याचा चौतिसावा भाग कमी करावा. त्यात अजून काही थोडे मिळविले (की इष्ट उत्तर मिळते.)

गूढ अंधारातील जग -४

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 16/12/2017 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -४ पाणबुडीची संरचना -- . तिचे मूळ हेतू हे शत्रूच्या जहाजाच्या नजरेस न पडता त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन त्याच्या वर हल्ला करायचा. त्यामुळे सुरुवातीला पाणबुडी तयार केली ती जहाजासारखी निमुळती होती आणि वरचा भाग पाण्याच्या जरासा खाली गेला तरी चालत होता. जशी जशी विमानांची प्रगती होत गेली तशी पाणबुडीला पाण्याच्या जास्तीत जास्त खाली आणि जास्तीत जास्त वेगाने जाण्याची आवश्यकता निर्माण झाली. यामुळे पाणबुडीचा निमुळता आकार सोडून अश्रूबिंदू (teardrop) सारखा आकार म्हणजे देवमासा किंवा डॉल्फिन सारखा मोठे डोके आणि मागे निमुळता होत गेलेला आकार घेतला गेला.

विडंबन : निरीश्वरवाद, निधर्मी संकल्पना - 'फुल्टू' एंटरटेनमेंट विथ 'टील डेथ' व्हॅलिडिटी.

लेखक रंगीला रतन यांनी शुक्रवार, 15/12/2017 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
निरीश्वरवाद आणि निधर्मी नावाच्या संकल्पना कशा अस्तित्वात आल्या आणि का याच्यावर बरेच मंथन झाले आहे. यावर बऱ्याच थेअरीज आहेत. पैकी उत्क्रांतीवादानुसार निरीश्वरवाद आणि निधर्मी यावर बऱ्याच लोकांचा विश्वास असतो याचं कारण माणुस उत्क्रांत झाल्यावर त्याला या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला असणार. अतिमानवाच्या (मंद)बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने त्याने सतत असणाऱ्या अनिश्चिततेवर, त्यातून येणाऱ्या भीतीवर मात करण्यासाठी काही मानसिक, बौद्धिक दरिद्री(दळभद्री) कल्पना विकसित केल्या त्यात निरीश्वरवाद आणि निधर्मी यांचा क्रमांक सर्वात वरचा लागतो.

'संस्कृती आणि समाज’

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/12/2017 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आज संस्कृती हा शब्द कोणी नुसता उच्चारला तरी आपण त्या व्यक्‍‍तीकडे चमकून पहावे अशी या शब्दाची जादू वा दहशत निर्माण झाल्याचे लक्षात येते. देशात किमान ज्या बाबींचे राजकारण होऊ नये असे वाटते त्या गोष्टींचेही राजकारण होऊ लागल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक व्यक्‍तिगत बाबींचे राजकीयकरण होऊन त्यावर राजकारण करणे सोपे झाले आहे. आज संस्कृती या संज्ञेचेही राजकीयकरण अगदी ठरवून होत असल्याचे लक्षात येते, नव्हे संस्कृती हा राजकारणाचा प्रमुख मुद्दा होऊ पहातोय की काय अशी शंका येऊ लागते.

अनवट किल्ले २४: महाराष्ट्राच्या उत्तरटोकाचा, सोनगीर ( Songir )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 15/12/2017 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारा आग्रा-नाशिक मार्ग मध्ययुगात महत्वाचा होता कारण उत्तरेकडील शासक दख्खनेवर आक्रमण करण्यासाठी या मार्गाचा वापर करीत. तर मागच्या बाजुने जाणारा रस्ता नंदुरबार-सुरत या मध्ययुगीन महत्वाच्या शहरांना जोडतो. त्यामुळे या आक्रमकांना प्रतिबंध करण्या साठी मध्ययुगात उत्तर महाराष्ट्रातील या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी किल्ले बांधण्यात आले. सुर्वणगिरी किल्ला नेमका कोणी बांधला याची इतिहासात नोंद नाही. सम्राट अशोकाच्या अधिपत्याखालील हा प्रदेश कालांतराने सातवाहनांकडे गेला व इ.स. २५० मध्ये अहिर राजांनी तो जिंकला.

अरि

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 15/12/2017 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
अरि ....... त्यावर्षी पहिल्यांदाच एका भारतीय मुलाने शाळेत admission घेतली. अरिंधम त्याचे नाव. पण इतके अवघड नाव काय या अरबी मुलामुलींना घेता येईना. साहजिकच त्याचा अरि झाला. अकरावीत शिकत होता. तो म्हणजे आम्हा सर्व भारतीय शिक्षकांच्या जिव्हाळयाचा विषय! माझ्या जास्त जवळचा. कारण त्याने अकरावीला इंग्लिश साहित्य ठेवले होते, आणि पंजाबी असून महाराष्ट्रात बरीच वर्षे काढल्याने चांगले मराठी यायचे. म्हणजे, आमचे किती गूळपीठ असेल पहा!! तर वार्षिक क्रिडा महोत्सव सुरु झाला. हा जोश, हा उत्साह!!

हिरवे सोने

लेखक चांदणशेला यांनी गुरुवार, 14/12/2017 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
एकल्या माझ्या घरट्यात नांदते लाखमोलाचे ऐश्वर्य माणिक मोत्यांची ना रास तरीही बहरते सुखाचे माधुर्य दारिद्र्याच्या चिंध्यात लपेटून जाते जीणे कुजलेल्या छपरातून पाझरते वैभवाचे चांदणे पोट जाळून घामाच्या धारांनी भिजती राने फाटक्या स्वप्नांच्या भूमीवर अंकुरते हिरवे सोने आयुष्याच्या उतरंडीत रीती रीती जिंदगी जगाच्या भाकरीसाठी लढाया देते बळ अंगी
काव्यरस

शुल्बसूत्रामधील भूमिति - भाग १

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 14/12/2017 04:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्राचीन भारताच्या काळात जे यज्ञ केले जात त्या यज्ञाचे इच्छित फल प्राप्त होण्यासाठी यज्ञ तंतोतंत मुळाबरहुकूम केला जाणे अपेक्षित होते आणि त्यामुळे यज्ञविधीमधील मन्त्रोच्चारण, त्यांचे व्याकरण, शब्दांचे अर्थ कळण्यासाठी व्युत्पत्ति, ऋक्-छन्दांचे ज्ञान, यज्ञास योग्य काळ आणि यज्ञांमधील कृति अशा सहा गोष्टी शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छन्दस्, ज्योतिष आणि कल्प ह्या सहा निरनिराळ्या वेदांगांनी नियमित केल्या गेल्या आहेत. ह्या सहा वेदांगांपैकी कल्प हे वेदांग नाना यज्ञांचे विधि कसे करावेत हे सांगण्यासाठी निर्माण झाले आहे. कल्पसूत्रांचे मुख्यत: दोन विभाग आहेत.