Skip to main content

"मी, शिल्पकार माझ्या जीवनाचा !!"

लेखक भम्पक
शुक्रवार, 23/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
न करीशी व्यर्थ चिंता तू ठाऊक मज सामर्थ्य माझे ! कुणाशी कसे वदावे कसे वागावे काय केल्याने काय होईल.... हि चिंता तयास ज्याने क्रमिला पथ दुहेरी माझा पथ सुर्यप्रकाशाहूनही स्वच्च्छ कण भारही किंतु तयात नाही ! नकोत सला-मशवरा मजला ठाऊक मज मार्गक्रमण माझे ! मान्यता जगात उदंड जाहल्या त्या प्रती जगणारे अमाप ... मी तर अव्यक्ताचा चाहता जी माझी कृती तीच परिणती ! का कशाचीही बाळगावी मी भीती ठाऊक मज अंतिम ध्येय माझे !!
काव्यरस

अवघड काळात निर्णय कसा घ्यावा?

गुरुवार, 22/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
कोरोना काळात एका इंग्रजी लेखाचे हे मी केलेले स्वैर भाषांतर आहे. ते मी मायबोलीवर टाकले होते. पण मिसळपाववर टाकले नव्हते. ते आज लक्षात आल्याने इथे चिकटवत आहे. महाभारतात कर्णाने भगवान श्रीकृष्णांना विचारले - "माझा जन्म होता क्षणी माझ्या आईने मला सोडले. मी अनौरस मूल म्हणून जन्माला आलो. हा काय माझा दोष आहे?" "मी क्षत्रिय नसल्यामुळे मला द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेता आले नाही. याच्या उलट, मी कुंतीपुत्र म्हणजे क्षत्रिय असल्याचे कळल्यावर, परशुरामांनी मला शाप दिला. म्हणे "त्यांनी मला जे काही शिकवलं, ते मला आयत्या वेळेला आठवणार नाही." "एकदा एका गायीला चुकून माझा बाण लागला.

फलाफल

लेखक Bhakti
बुधवार, 21/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
अ काहीतरी चुरचुरीत खायची इच्छा होती.खुप दिवस अख्खे हिरवे मूग वापरून रेसिपी झाली नव्हती. रात्री दीड वाटी हिरवे मूग ,एक वाटी हरभरा डाळ,अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धा चमचा मेथ्या एकत्र भिजवलेल्या.सकाळी जिरे, आलं तुकडा,दोन मिरच्या टाकून मिक्सरमधून भिजलेल्या डाळी जाडसर वाटून घेतल्या. आता कांदा आणि कोथिंबीर

पावसातील उद्योग

मंगळवार, 20/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
...परवा बाहेर धोधो पाऊस कोसळत होता.. पुण्यातील तुंबलेल्या रस्त्यांमुळे बाहेर जाण्याचा प्रश्र्नच नव्हता. काही दिवसांपूर्वी मॅक्रोसाठी उभा केलेला सेट-अप तसाच ठेवला होता. फुलांचे फोटो काढून कंटाळा आला होता. तेवढ्यात नातवाच्या खेळण्यातील काही गाड्या हाती लागल्या. त्याचे फोटो काढायचे ठरवले, पण नुसते फोटो काढायचे नव्हते तर काहीतरी वेगळे... म्हणजे गाड्या खऱ्यातर वाटल्या पाहिजेत पण लोकेशनवर उभ्या आहेत असेही वाटले पाहिजे. माझ्याकडे असलेली मासिके चाळली पण योग्य अशी बॅकग्राऊंड काही सापडली नाही. तेवढ्यात मला मी काढलेले फोटो आथवले. एक होता गोकाकला काढलेला आणि दुसरा होता गुजरातमध्ये काढलेला.

पावसाळी भटकंती २०२४

लेखक कंजूस
सोमवार, 19/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळी भटकंती २०२४ ऑगस्टच्या दोन आठवड्यात भिवपुरी आणि नेरळ माथेरान भटकलो. त्याची क्षणचित्रे आणि चित्रपट. फोटो १.
.माथेरानमध्ये कुठेही भटकायचं .


फोटो २.
.. पावसाळ्यात सर्व गर्दी शार्लोट लेक कडेच जाते. दस्तुरीपासून पाच किमी.

माईलस्टोन....

लेखक भम्पक
सोमवार, 19/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर दहावीलाच लक्षात आलेलं त्याच्या.परंतु कोणावरही उगीच दडपण आणून काही करायला लावणे हे त्याला पटण्यासारखे नव्हते.म्हणजे स्वतःच्या मुलाबाबत सुद्धा.तरी त्याचे जवळचे मित्र सांगायचे बरका त्याला की पोरांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन नाही चालत.अधून मधून टोकलं पाहिजे,रिव्ह्यू घेतला पाहिजे.तोही ठरवायचा पण पुन्हा तेच.होतंच नसे त्याच्याकडून.त्याला त्यावेळी त्याचा काळ आठवायचा की दादांनी कधीही त्याला टोकलं नाही की विचारले नाही.उलट त्याच्या कोणत्याही निर्णयांचे त्यांनी स्वागतच केले असायचे.अन त्यांचा विश्वास ही होता त्याच्यावर.तो सेम थिअरी लावीत होता स्वतःच्या पोराला.खरं तर त्याचं पोरगही खूप सिंसिअर.

मदत हवी आहे,,,

लेखक भम्पक
सोमवार, 19/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण १९८८-१९९० दरम्यान मी शाळेत ८ वि ते १० वि त असेल.त्या वेळी मराठीच्या पाठयपुस्तकात आम्हाला "अशी वाढते भाषा " नावाचा धडा होता. अतिशय समर्पक आणि परिणामकारक . लेखकाने इतक्या रसाळ पद्धतीने अन एकदम चुरचुरीत पद्धतीने मराठी भाषा कशी वाढते याबद्दल सांगितले होते. मला त्या धंद्यातील सर्व उदाहरणे लक्षात आहे .जसे हरताळ फासणे , संबंध ताणणे , ठिय्या देणे इ . परंतु लेखकाचे नाव नेमके आठवेना झालेय. तसे मी बालभारतीच्या अधिकाऱ्यांना मेल केलाय पण त्यांचे उत्तर काही येईना. आता मिपाकरांनाच विचारतो कि आपल्या वाचनात हा लेख आला असेल तर कृपया त्याच्या लेखकाचे नाव कळवावे. माझ्या मते श्री . म.

कृष्णाच्या गोष्टी-९

लेखक Bhakti
रविवार, 18/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
***धर्मराज्य हरपले युधिष्ठिराच्या हातून कृष्णाने धर्मसत्ता प्रस्थापित केली असली तरी, अभिषिक्त सम्राट युधिष्ठिर होता. त्या सत्तेचे तो केंद्र होता. त्यामुळे युधिष्ठिरालाच दक्षपणे नव्याने स्थापन केलेल्या धर्मराज्याचे संरक्षण करणे आवश्यक होते. ही गोष्ट युधिष्ठिराने ध्यानी घ्यावी आगि निश्चिततेची भावना मनात मुळीच बाळगू नये म्हणून महर्षी व्यासांनी युधिष्ठिराचा निरोप घेताना सम्राटाच्या या जबाबदारीची त्याला स्पष्ट जाणीव दिली.