Skip to main content

कोहम्

लेखक अबोलघेवडा यांनी सोमवार, 07/05/2018 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
मी व्यक्तीशः या पृथ्वीवर का आलो? येऊन नक्की काय करायचा प्रयत्न करतोय? मी नसतो आलो इथे तर या पृथ्वीमध्ये म्हणा किंवा कोणाच्याही आयुष्यात म्हणा काय फरक पडला असता? जर आपण निमित्तमात्र आहोत आणि आपली दोरी त्या विधात्याच्या हातात आहे (आठवा तो आनंद सिनेमातला राजेश खन्ना चा प्रसिद्ध डायलॉग!) तर तुम नही तो कोई और सही असं म्हणून परमेश्वराने दुसऱ्या कोणाकडून तरी कामे करवून घेतली असती. म्हणजे थोडक्यात मदाय्राने दोरीने बांधलेल्या माकडासारखी माझी अवस्था आहे तर. असे काही बाही विचार हल्ली माझ्या डोक्यात येत असतात.

गर्दीमधले एकटेपण

लेखक अबोलघेवडा यांनी सोमवार, 07/05/2018 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
माणसांचा घोळका आजूबाजूला असतो. आपली (म्हणजे केवळ नात्याने आपली. ती खरोखरंच आपली असतात का हे कोडंच!) म्हटलेली माणसं आपल्या जवळ असतात. सोशल मिडिया वर शे-दोनशे माणसं ‘कनेक्टेड’ असतात. आणि तरी देखील आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा या भाऊगर्दीत मी एकटा आहे असं वाटायला लागतं. कशामुळे होत असावं हे असं? जरी आपण या जगात कोणीच नाही हे जरी मनाला पटविण्याचा प्रयत्न केला तरी ते मनोमन स्वीकारणं कठीण असतं. आपल्या सुखदुःखांशी कोणालाच म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे आपल्या म्हटलेल्या माणसांना देखील काहीच देणंघेणं नाही हे वाटणं ही माणसाला मिळालेली सगळ्यात मोठी शिक्षा असते असं मला वाटतं.

कर्मण्येवाधिकारस्ते...

लेखक अबोलघेवडा यांनी रविवार, 06/05/2018 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्ष भगवंतांनी सांगितलेल्या या वाक्याचा अर्थ लावतोय... हो बरोबरच वाचलत. कित्येक वर्ष.... अहो, भगवद्गीता ही गोष्टच अशी आहे की जितके वेळा ती वाचू तितके वेळा वेगवेगळे अर्थ लक्षात यायला लागतात. जितक्या प्रमाणात कर्म करू तितक्या प्रमाणात फळ मिळालं पाहिजे ही अपेक्षा ठेवण्यात काय चुकलं माझं असं माझं मन मला सारखं विचारायचं. या श्लोकात ४ गोष्टी श्रीकृष्णांनी सांगितल्या आहेत. १) फक्त कर्म करण्याचा तुला अधिकार आहे २) कर्माच्या फळांवर तुझा अधिकार नाही. ३) मिळालेल्या फळाला तू कारणीभूत आहेस असे समजू नकोस.

रात्रीच्या अंधारात...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 06/05/2018 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या अंधारात... ... रात्रीचे सव्वाबारा वाजलेले. देवळातलं किर्तन संपलं आणि श्रोते पांगले. चारपाच उनाड पोरांनी बाजारपेठेतल्या एका दुकानाच्या कट्ट्यावर अड्डा ठोकला. गावातल्या लफड्यांपासून गरीबी हटावच्या राजकारणापर्यंतचे सगळे विषय चर्चेला येत गेले आणि गप्पांचा फड भलताच रंगला... अचानक चारपाच बायका घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत धावत येताना दिसल्या, आणि गप्पा थिजल्या. किर्तनानंतर घरी, वरच्या आळीत निघालेल्या त्या बायका माघारी फिरल्या म्हणजे वाटेत कायतरी गडबड होती हे टोळक्याने लगेच ताडले. तोवर त्या बायकाही समोर आल्या होत्या. घाबरलेल्या!! ‘माळावरच्या शाळेवर कुणीतरी आहे...

बातमी!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 06/05/2018 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एका साहित्यिक चळवळीतील सदगृहस्थांनी गप्पा कट्टा नावाचा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला त्याच्या सर्व बातम्या आम्ही सातत्याने देत होतो. एकदा मात्र, एक बातमी लागली नाही. तो अक्षरश: तणतणत आला, आणि भरपूर ज्ञान शिकवू लागला. तुम्ही फालतू बातम्यांना जागा देता, आणि साहित्यिक चळवळीतील या वेगळ्या उपक्रमासाठी तुमच्याकडे जागा नसते वगैरे बोलू लागला, म्हणून मी त्याला, एखादी फालतू बातमी दाखव असे म्हणाल्यावर त्याने पिशवीतून त्याच दिवशीचा अंक काढला व एका बातमीवर बोट आपटू लागला. मी बातमी पाहिली.

योग प्रसारासाठी सायकल यात्रा- परभणी- जालना- औरंगाबाद- बुलढाणा जिल्ह्यामध्ये ६०० किमी सायकलिंग

लेखक मार्गी यांनी रविवार, 06/05/2018 04:18 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! एक नवीन सोलो सायकल मोहीम करणार आहे. त्यासंदर्भात आपल्याशी बोलेन. गेल्या वर्षी सातारा परिसरात योग- ध्यान हा विषय घेऊन एक छोटी मोहीम केली होती. ह्यावेळी सुद्धा 'योग प्रसारासाठी सायकल यात्रा' अशी एक मोहीम करतो आहे. मध्य महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये कार्यरत 'निरामय योग प्रसार व संशोधन संस्था' व त्या संस्थेच्या विस्तारलेल्या कार्यासंदर्भात हा प्रवास असेल. परभणी, जालना, औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काम करणारे योग कार्यकर्ते व योग शिक्षक ह्यांना ह्या प्रवासात भेटेन. परभणीमध्ये गेल्या चार दशकांपासून निरामय संस्था काम करते आहे.

हवाईदलातील सेवेतील रंजक रेल्वे प्रवास! भाग ४

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 05/05/2018 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
सायरनचे भणभणणारे आवाज येताहेत, ‘जी’ सुट घालून हातात हेलमेट घेऊन वावरणारे पायलट एकदम लढाऊ विमानांच्या दिशेने धावताहेत, पुढच्या काही क्षणात विमाने अवकाशात झेपावतात, गोळ्यांचा वर्षाव, विमानांच्या जीवघेण्या डॉग फाईट्स, अचुक वेध. लाल बटणावर अंगठा, पुढल्या क्षणी विमानाचा पेट. कॉकपिटातून अंगठा वरकरून ‘थम्प्स अप’ खुणेने कामगिरी फत्ते, असे हवाईदलातील विजयी वीराचे चित्रीकरण आपणाला पाहून पाहून हवाईदलातील लोक नेहमी विमानातून संचार करत असावेत असे सामान्यांना वाटणे साहजिक आहे. पण एरव्ही हवाईदलातील कर्मचाऱ्यांच्या नशिबी बहुचक्रवाहनाचाच प्रवास असतो. त्यात अनेक मजा मजा होतात.

पुणे ते लेह (भाग १३ - हेमिस मोनेस्टरी आणि उपशी ते दारचा)

लेखक अभिजीत अवलिया यांनी शनिवार, 05/05/2018 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ४:३० लाच कारू मध्ये परत पोचलो. इथून हेमिस मोनेस्टरी आहे फक्त ७ किमीवर. ती आजच बघितली तर उद्या सकाळी लवकर निघता येईल असा विचार करून हेमिस कडे निघालो. वाटेत एका लामानी गाडीला लिफ्ट मागितली. लामा म्हणजे बौद्ध धर्मगुरू. एकेकाळी ते हेमिस मोनेस्टरी मध्ये धर्मगुरू होते. पूर्ण लडाख भागात फिरताना जागोजागी आढळणारी एक गोष्ट म्हणजे 'माने'. इथे इतके माने का असावेत ह्याबद्दल त्यांना विचारले. 'पुराने जमाने में लोग ये माने बनाते थे. किसीकी याद में ये बनाने का रिवाज था. ये घर में ख़ुशी, अच्छा भविष्य, सेहत, दौलत लाते है ऐसा माना जाता था. बहुत वक्त लगता था इनको बनाने में. अब समय के साथ सब बदल गया.

मुका मार अनवरत झेलुनी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 05/05/2018 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
काव्यतडागी जलपर्णीसम प्रतिभा पसरत असते पाहू न शकतो रवी, सकल ते कवीस दावुनी जाते कवी लेखणी सरसावून मग मांडी ठोकुनी बसतो इथे मोडुनी तिथे जोडुनी कविता पाडुनी जातो पामर रसिकांच्या तोंडावर कविता मग आदळते मुका मार अनवरत झेलुनी इथे तिथे हुळहुळते काव्यदेवते- एक विनंती ऐक जरा रसिकांचे काव्यप्रपाती बुडवू नको गे आवर कढ प्रतिभेचे
काव्यरस