युगांतर - आरंभ अंताचा भाग १३
"भीष्म, सर्व कुशल आहे ना?"
"होय राजमाता. काहीवेळा पूर्वीच नगरीत जाऊन येणे झाले. हस्तिनापुरी सर्व स्वस्थ आहे."
"नाही भीष्म, मी नगरीबद्दल बोलत नाही."
"मग राजमाता?"
"विचित्रवीर्य च्या विवाहानंतर मी पाहातेय... तू अस्वस्थ दिसतो आहेस. सर्व ठिक आहे ना?"
भीष्म काहीच बोलले नाहीत. सत्यवतीने तलम गुंडाळलेले संदेशवस्त्र त्यांच्या हाती दिले.
भीष्मांनी उलगडून ते वाचले. 'अद्य शीघ्रंम् आगच्छतू!'
"परशुरामांनी पाठवलेला संदेश दास घेऊन आला होता तू महालात नव्हतास तेव्हा."
"आज्ञा असावी राजमाता. माझ्या गुरूंनी मला बोलावलेले आहे."
सत्यवतीने मान होकारार्थी हलवली.
भीष्माचार्यांचा रथ गुरुनिवासाजवळ थांबला.
मिसळपाव