Skip to main content

युगांतर - आरंभ अंताचा भाग २१

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 05/08/2019 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
पंडु वनवासाला कंटाळून परतेल अशी अपेक्षा करत भीष्म आणि विदुर त्याची वाट पाहत होते. पंडुची नाजूक तब्येत वैद्यांच्या देखरेखीशिवाय कशी नीट राहिल, हा प्रश्नही त्यांना सतावत होता. दासाने दिलेल्या वार्ता ऐकून पंडु परतण्याची शक्यता आता धुसर झाली होती. शेती करत पंडु वनातच रमल्याचे चित्र ही घोर निराशा होती. 'हा सोन्याने मढलेला राजमहाल, दास-दासी, सोयी-सुविधा, मान-सन्मान, अधिकार..... सगळं निर्जीव आहे! आधीही असतील... पण आता त्यांच निर्जीव असणं जाणवतयं! काय बदललं हस्तिनापुरात इतकं देवव्रता की तुझं मन लागत नाही इथे? एका क्षणात हे सुख सोडून गेलेला पंडुपरिवार! खरचं वाटलं तुला, की तुझा शिष्य पंडु परत येईल?

मर्लिन मन्रो....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 05/08/2019 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire ५ ऑगस्ट १९६२ या दिवशी मर्लिन मन्रोचा मृत्यू झाला की तिने आत्महत्या केली ते तिलाच माहीत किंवा परमेश्र्वराला माहीत. या कविची ओळख झाली आणि त्याच्या कविता वाचताना ही मर्लिनवर त्याने लिहिलेली कविता सापडली... कार्देनालच्या कवितेत काहितरी वेगळे आहे हे मला सतत जाणवत होतं.... अर्थात कविता हा आपला प्रांत नाही...
काव्यरस

श्रीकृष्ण

लेखक शरद यांनी सोमवार, 05/08/2019 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीकृष्ण (महाभारतातील व्यक्तिचित्रे ) काही वर्षांपूर्वी " महाभारतातील व्यक्तिचित्रे " या लेखमालिकेत भीष्म, द्रौपदी, पार्थ, इ. पांच पात्रांचा; महाभारतात म. व्यासांनी त्यांच्याबद्दल काय लिहले याचा परिचय करून दिला होता. एका विषयावर किती लेख लिहावयाचे व असे लेख किती लांबवावयाचे याबद्दल मीच साशंक असतो त्यामुळे वाचकांचा आग्रह होता तरी थांबलो. पण हेही खरे की श्रीकृष्णाबद्दल लिहले नाही तर "महाभारताबद्दलच " लिहावयाचे राहिले असे म्हणावे लागेल ! कृष्ण व कर्ण समोर ठेवून तर महाभारत लिहले. श्रीकृष्णाविषयी म.

हे असे का असावं?

लेखक तमराज किल्विष यांनी सोमवार, 05/08/2019 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असल्यापासून मी जरा एकलकोंडा मनुष्य आहे. फक्त नातेवाईक, शेजारपाजारच्या लोकांशी मनमोकळेपणाने मिसळू शकतो पण नवीन लोकांशी बोलायला, कुणाच्या घरी जायला मन तयार होत नाही. शाळेत, कॉलेजमध्ये एवढी अडचण आली नाही. ठराविक मित्रांबरोबर सुट झालो. नोकरी मध्ये सुद्धा आपण भलं आणि आपलं काम भलं. जास्त संबंध कुठे वाढविले नाही, सासरच्या लोकांशी संबंध आलेल्यांचे स्वागत, चाललेल्यांचे आभार असे ठेवले. बालपणापासून वाचनाची खूप आवड लागली, मिळेल ते वाचून काढले. बऱ्याचदा पुस्तकांमध्ये इतका गढून जायचो की आजूबाजूला कोण काय करतं, बोलतंय हे कळायचं नाही. कुणी किती हाका मारल्या तरी ऐकू यायच्या नाही.

श्रावण आला गं सखे

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 04/08/2019 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण आला गं सखे ---------------------------- श्रावण आला गं सखे माहेराची सय आली हाती जरी किती कामं त्या साऱ्याला लय आली परसात एक आड अंगणात किती झाडं त्या झोक्यांची याद आली प्रेमळ गं भाऊराया वहिनी करिते माया भेटायची इच्छा झाली देवासमान गं पिता देवासमान गं माता पानं गळायला आली आताच जायला हवं त्यांना पहायला हवं चिंता इथे भय घाली ------------------------ बिपीन

मितान्नीच्या राजवाड्याचा शोध ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 04/08/2019 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
मितान्नी साम्राज्य! कपोलकल्पित नव्हे तर पुरातत्वीय आधार असलेला इतिहास. काही वैदीक देवतांची नावे आणि काही संस्कृतशब्द थेट मध्यपुर्वेत आणि तेही ईस्वीपुर्व १५०० ते ईस्वीपुर्व १४०० च्या काळात, आजपासून सुमारे साडेतीन हजार वर्षांपुर्वी. मितान्नीच्या सम्राटांनी तो फारसा जतन नाही केला पण त्यांचा पत्रव्यवहार इजिप्त सहीत आजूबाजूच्या प्रतिस्पर्धी राजवटीतून सापडलेला. क्ले टेब्लेट म्हणजे मातीच्या पाटीवरील तेथील तत्कालीन भाषेतील क्युनीफोर्म लिपी स्वरुपात. हे राजे दुचाकी रथ म्हणजे आपण टांगा म्हणतो त्या प्रकाराचा युद्धोपयोगात प्रवीण असावेत.

स्ट्रेंजर थिंग्ज

लेखक nishapari यांनी रविवार, 04/08/2019 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
स्ट्रेंजर थिंग्ज - लेखक आशुतोष जरंडीकर स्ट्रेंजर थिंग्ज या मालिकेबद्दल लिहावं असं खूप दिवस वाटत होतं पण त्याला न्याय देणं आपल्या लेखणीला झेपेल असं वाटत नव्हतं . आशुतोष जरंडीकर हे या प्रकारचं उत्तम समीक्षण लिहिणारे समीक्षक आहेत .. त्यांचा स्ट्रेंजर थिंग्जचं रसग्रहण करणारा हा सुरेख लेख महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झाला आहे ... त्यांची परवानगी घेऊन इथे शेअर करत आहे . विज्ञान-फॅन्टसी यांचा सुरेख मिलाफ... लेखक - आशुतोष निरंजन जरंडीकर ... मैत्री आणि प्रेम हा समान गाभा असलेल्या हॅरी पॉटरने एक दशक गाजवलं होतं. पॉटर सोबत एक पिढी मोठी झाली होती.

मी अजिबात घाबरत नाही.....!

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 04/08/2019 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
अमावस्येची रात्र! ऑफिस मधून सगळे लवकर घरी गेले होते. माझे काम मात्र अजून पूर्ण व्हायचे होते. मी एकटाच फाईलवर रिमार्क लिहित बसलो होतो. घड्याळाच्या मोठा काट्याने १२ वर येत ९ वर असलेल्या छोट्या काट्याशी काटकोन केला. उशीर झाला होता. पण मला चिंता नव्हती. तसाही मी अंधश्रध्दाळू नाही. त्यामुळे, अमावास्येला घरी लवकर जाऊन झोपायचे असते, असे कोणी कितीही सांगितले तरी ते मी ऐकत नाही. शेवटी काम महत्त्वाचे! आणि त्यात मी खवीस, चेटकीण, हडळ, भूत, मुंजा वगैरेला तर अजिबातच घाबरत नाही. त्यामुळे हातात मंतरलेला गंडा बांधणे वगैरे असले काही नखरे नसतात माझे. या उलट माझे घाबरट कलिग्ज्!

युगांतर - आरंभ अंताचा भाग 20

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 04/08/2019 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
गर्द झाडी आणि हवेतला पहाटेचा आल्हाददायक गारवा मनाला सुखावत होता. पंडू, कुंती आणि पंडूची द्वितीय पत्नी मद्रनरेशकन्या माद्री वनविहाराला आले होते. फुलपाखरे या फुलावरून त्या फुलावर उडत होती. भुंगे गुंजारव करत होते. तितक्यात एक सुंदर हरिण उंच वाढलेल्या गवतातून पळताना पंडूला दिसले. आहाहा! काय ते रुप! सुवर्ण कांती! पंडूने धनुष्य हातात घेतले आणि हरिणामागे धावत गेला. कुंती आणि माद्री वनातल्या फुलांना बघत पक्षांची किलबिल ऐकत कितीतरी वेळ पंडूची वाट पाहत होत्या. सुर्यदेवांचे दर्शन घेत सुर्यफुले पिवळ्या धमक रंगात शोभून दिसत होती. वाऱ्यावर झुलत होती. दुपार होत आली आणि पंडू परत आला.