Skip to main content

युगांतर- आरंभ अंताचा भाग २४

लेखक मृणालिनी यांनी गुरुवार, 08/08/2019 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
"महाराज, दास वार्ता घेऊन आला आहे." "अनुमती आहे." "महाराजांचा विजय असो. महाराज, तुमच्या अनुज पंडुंना द्वितीय पुत्र प्राप्त झाल्याची आनंदवार्ता आहे. ऐकण्यात आले आहे की वायुदेवांचा वरदहस्त आहे युवराजांच्या माथी." 'युवराज? आत्तापासून पंडुपुत्राने राजगादीवर अधिकार जमवायला सुरवात केली?' धृतराष्ट्राच्या मनात तिडिक गेली. भीष्माचार्य आनंदाने उठून दासाजवळ आले. एक दागिना त्याच्या हातात ठेवत त्यांनी पंडुकडे काही राजभेट वस्तू पाठवून दिल्या. धृतराष्ट्र आता आतून जळू लागला. 'आपल्या अनुजाला दोन पुत्र प्राप्त झाले आणि आपण अजूनही नि:संतान? आता नाही!

श्रीगणेश लेखमाला २०१९ - झलक दुसरी!

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 08/08/2019 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी खेळताना नाही का, आधी सुरू असलेल्या खेळात कोण्या नवीन भिडूची येंट्री होणार असली की अगोदर राज्य असणारा भिडू लगेचच 'नवा गडी, नवं राज्य' ही घोषणा करून मोकळा व्हायचा! नवीन आलेल्या भिडूने राज्य घ्यायचं आणि खेळ पुढे सुरू व्हायचा. अगदी तस्संच, आम्हीसुद्धा म्हणतोय - "नवा आठवडा, नवी झलक!" ह्या वेळच्या श्रीगणेश लेखमालेसाठी आपण कोणत्या विषयाचं बंधन ठेवलं नव्हतं. एकाच विषयाशी बांधून न घातल्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे लेख आलेत. श्रावणात एखादं इंद्रधनू फुलल्यागत जणू. त्याचीच ही आणखी एक किंचितशी झलक. बघा बरं, ह्या वेळेस जमतंय का ओळखायला कोणाच्या लेखणीमधून उतरलंय हे लिखाण.. जमलं का, जमलं?

वाळूचे विरहगीत

लेखक मायमराठी यांनी बुधवार, 07/08/2019 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
।। वाळूचे विरहगीत ।। उन्हात चमके साज रुपेरी, खेचत नेई ओढ ना टळे। पसरुनी चमचम धरतीवरती, पाहुनी रात्री चांदही चळे। उधाण घेऊनी नायक येई, भिजवुनी जाई अंगही बळे। राग न यावा यात तिलाही, सरसर लाटेमागुनी पळे । अर्ध्यामुर्ध्या खुणांत रुतवी, निरोपांचे शंखशिंपले । जीव मोहरे येता भरती, युगायुगांचा नवस फळे। सुना किनारा होता ओहोटी, मुकी वेदना गात्रं छळे । सोडुनी जाई घाव जिव्हारी, त्या लाटांना हे न कळे । वाहत येई गाळ सुगंधी, ज्या वासाचे तिस लळे । खेळ मांडला पृथ्वीवरती, खेळणी वाळू सागर सगळे । रित्या नद्या होत तरीही, गोड होई खारे सगळे । अजाण सागर याच रहस्यी, वाळूमधुनी विरह ओघळे । पाय आपले जात रु

युगांतर - आरंभ अंताचा भाग 23

लेखक मृणालिनी यांनी बुधवार, 07/08/2019 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
युगांतर-आरंभ अंताचा भाग २३ हस्तिनापुरात आनंदाचे ढोल, नगारे वाजत होते. आपल्या अनूजाला पुत्र होणार ही वार्ता कळल्यावर धृतराष्ट्राने मिष्टान्न वाटले. सर्व नगरीत अन्न-वस्त्र वाटून भीष्मांनी पंडुकडेही मिष्टान्न पाठवले. "प्रणाम महाराज !" "शकुनी.... बोल." "महाराज, तुम्ही काय करताय हे?" "काय करताय म्हणजे? स्वागत करतोय! राजपरिवाराच्या नव्या सदस्याचे! आनंद साजरा करतोय मी शकुनी!" "पण कसला आनंद महाराज?" "अरे तू ऐकलं नाहीस? पंडुला पुत्रप्राप्ती....." "ते ऐकलं महाराज. म्हणूनच आश्चर्य वाटते आहे तुमच्या वागण्याचे!" "पण का? त्यात आश्चर्य वाटण्यासारखे आहे तरी काय?" "महाराज तुम्ही विसरता आहात.

सुंदरसा तो पाऊस यावा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 07/08/2019 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
सुंदरसा तो पाऊस यावा -------------------------- सुंदरसा तो पाऊस यावा भिजून जावी सारी धरती या मातीचा दरवळ व्हावा इंद्रधनु उमटावे वरती अशा धुंद त्या वातावरणी तुझी नि माझी भेट व्हावी त्या समयाची होऊन करणी नजर हृद्गते थेट व्हावी गुपित काही नच उरावे पण ते दोघांनाच कळावे मिटवून मग सारे पुरावे जगापासून दूर पळावे ----------------------- बिपीन

सुषमा स्वराजांना श्रद्धांजली

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 06/08/2019 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजांच्या दुख्खद निधनाची बातमी येते आहे. सुषमा स्वराजांना श्रद्धांजली __/\-__

डोक्याला शॉट [द्वितीया]

लेखक गड्डा झब्बू यांनी मंगळवार, 06/08/2019 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: निवेदन आणि उपास (बटाट्याची चाळ) रताळ्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही! अण्णा पावशांच्या मुलींच्या कुंडल्या त्यांनी खणातून केव्हा काढल्या, गुपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमण बिल्डिंगमधल्या उकिडव्यांच्या घरी केव्हा नेल्या, ही गोष्ट पावशीण- काकूंना कळायच्या आत आमच्या कुंटुबाला कळली! एच्च.