Skip to main content

तू मेरे रुबरु है

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 16/08/2019 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
आजही विदर्भ मराठवाड्यात बुंग फिरणारी कालिपिली जिप असो की फाट्यावरची पानटपरी तिथे मोठ्या आवजात धडकन मधलं 'दुल्हे का चेहरा सुहाना लागता है' वाजतंच वाजतं. नुसरत ची पहिली वहिली ओळख हिच. धडकन पाहताना पहिल्यांदा तार स्वरात वाटणारं हे गाणं नंतर खूप आवडायला लागलं सोबत नुसरत ही. मग तो थेट भेटला ते 2015-16 मध्ये, आतशः नेट ची स्पीड पण वाढली होती आणि गाणी शोधणं फार फार सोप्पं झालं होतं, तू नळी वर तो पुन्हा भेटला 'साँसों की माला सिमरू' च्या रूपाने. त्यानंतर आजतागायत त्याने साथ सोडली नाही.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३२

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 16/08/2019 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३२ "काय झाले गुरु द्रोण?" "कृपाचार्य, तुम्ही?" "इतक्या रात्री तुम्ही जागे का ?" काय उत्तर द्यावं हे न सुचल्याने द्रोणाचार्यांनीच प्रतिप्रश्न केला, "तुम्ही या प्रहराला इथे?" "एक निर्णय घेतला गेलाय आज राज्यसभेत.... त्यामुळे जरा अस्वस्थ आहे." "कसला निर्णय?" "होणारे महाराज ठरवणार आहेत येत्या सप्ताहामध्ये." "त्यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे, कृपाचार्य? ही तर आनंदाची बाब आहे." "ते सर्वांचे युद्धकौशल्यावर मापन करणार आहेत गुरुवर!" "ह्मम. मग कोण निवडला जाण्याची भिती वाटते आपणास?" "आपल्या पासून काहीच लपून नाही.

युगांतर- आरंभ अंताचा भाग ३१

लेखक मृणालिनी यांनी गुरुवार, 15/08/2019 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
आकाश महालात सुर्यमहाराजांचे गमन-आगमन होत राहिले. ना दुर्योधन बदलला, ना भीम आणि दुर्योधनाचे वैर. होणाऱ्या भांडणात मध्ये पडून न्यायाचे अमृत ओतत दोघांना शांत करण्याचे काम नित्यनियमाने करणारा युधिष्ठिरही बदलला नाही, आणि काहीही झालं की भीष्माचार्यांच्या कुशीत शिरणारा अर्जुनही नाही..... ते ना महालात बदलले ना गुरुकुलात! आचार्य द्रोणांचा अश्वत्थामाप्रती असलेला स्नेह पराकोटीचा होता. अश्वत्थामाच्या कपाळावरचा मधोमध असलेला पांढरा शुभ्र हिऱ्याचा खडा पाहून तो शिवशंकरांचा तिसरा नेत्र असल्याचा भास होत असे. सगळेच त्याचा आदर करायचे. शेवटी गुरुपुत्र होता तो.

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 15/08/2019 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना सर्वांना राम राम! नुकताच किन्नौर- स्पीति सायकल प्रवास केला. त्याविषयी आता सविस्तर लिहिण्यास सुरुवात करतो आहे. प्रत्येक सायकल प्रवास खूप काही शिकवून जातो, समृद्ध करून जातो. ह्या सायकल मोहीमेमध्येही खूप काही शिकायला मिळालं. एका प्रकारे स्पीतिमध्ये सायकल चालवण्याचं स्वप्नही पूर्ण झालं. हा सायकल प्रवास फक्त सायकलिंग नसून त्याला एक सामाजिक उद्दिष्ट होतं. आरोग्य, फिटनेस, पर्यावरण ह्याविषयी जागरूकतेसंदर्भात संदेश आणि वेगवेगळ्या लोकांसोबत व गटांसोबत बोलणं हासुद्धा त्याचा एक भाग होता.

तुम्ही बहुभाषिक आहात का?

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 15/08/2019 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज १५ अॉगस्ट! स्वातंत्र्यदिन. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! दरवर्षी प्रमाणे 'मिले सूर मेरा तुम्हारा' दाखवण्यात आले.भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सगळे भारतीय म्हणून एक आहोत असा संदेश देणारं हे गाणं. याचंच निमित्य म्हणून आपल्या मिपावर कुणाकुणाला कोणकोणत्या भाषा येतात त्याचीही माहिती शेअर व्हावी.म्हणजे मराठी,हिंदी,इंग्रजी या तीन भाषा सर्रास शिकवतातच शाळेत.त्यांचं काही विशेष नाही पण त्या सोडून अजून कोणत्या भाषा येतात का तुम्हाला? माणसांची भाषा बरं का? नाहीतर मशिन लँग्वेजेस समजाल चुकून! :) कितपत येते? वाचता येते की बोलता येते? कि फक्त समजते? कुठे शिकलात?

त्सो मोरिरी : एक समृद्ध अनुभव

लेखक हर्मायनी यांनी गुरुवार, 15/08/2019 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षी २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात लेह लडाखला जाण्याचा योग आला. या अविस्मरणीय ट्रिप बद्दल सविस्तर लिहिण्याचा विचार आहे पण तूर्तास एक अशी घटना जी मनात कायम कोरलेली राहील.. शीत वाळवंट असलेल्या लडाखचे निसर्ग सौन्दर्य एकदम वेगळेच.. आधी कधीच न पाहिलेले.. राखाडी आणि तपकिरी रंगाच्या छटा बघताना निसर्गाच्या पॅलेट मधला मधला हिरवा रंग हरवलेलासा वाटला. एक प्रकारची गूढ शांतता, ठिकठिकाणी रचलेले दगडांचे मनोरे आणि बौद्ध धर्माचे मंत्र वाऱ्याद्वारे आसमंतात पसरवणाऱ्या रंगीत पताका संपूर्ण प्रवासात साथ देत राहिल्या.

गावची हवा...

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/08/2019 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे अहिराणी पट्ट्यात (आणि इतरत्रही) पूर्वी खूप झाडं होती. जंगलं होती. नद्यांच्या थड्यांवर आमराया होत्या. भरपूर पाण्यामुळे शेती बागायती होत्या. म्हणून गावातल्या हवेत कायम थंडावा असायचा. हवा शुध्द असायची. वाहनांची आताच्या इतकी प्रचंड संख्या नव्हती. प्रदुषण नव्हतं. घरं सिंमेटची नव्हती. मातीची होती. गावातल्या गल्ल्या मातीच्या. गावाच्या आजूबाजूच्या पांद्या मातीच्या. घराघरात रेडीओ, टीव्ही, फॅन नव्हते. कुठं कुठं रेडिओ येऊ लागले होते. गावात खूप झाडं नसली तरी गावाच्या आजूबाजूला आमराया असत. इतर झाडी असत. गावाला लागून असलेल्या पाट थळाच्या पिकांना कायम पाणी सुरू असायचं.

राखी.

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 15/08/2019 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखीतल्या सगळ्या मुलांना राखी बांधणारी छोट्टीशी बाला, काॅलेजमध्ये ज्याला टाळायचं त्यांनाच राखी बांधणारी मुग्धा. रक्षाबंधनाचे मेसेज फक्त कझिन्स ग्रुपमध्ये टाकणारी प्रगल्भा.. आणि तो सरसकट सगळ्यांनाच फाॅरवर्ड करणारी प्रौढा.. "तिच्या" या चारही रुपांना एकत्र ओवणारी तरीही अलगद विलगणारी पण खुलवणारी, ती राखी!

श्रीगणेश लेखमाला २०१९ - झलक तिसरी!

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 15/08/2019 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम, सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अनेक शुभेच्छा! एखाद्या रिकाम्या चित्रफलकावर चित्रकर्त्याने हलके हलके रंग भरावेत आणि बघता बघता चित्रफलकाचा नूरच बदलून जावा! आपल्या श्रीगणेश लेखमालेचंसुद्धा काहीसं तसंच झालंय बरं का, मंडळी.

भाषा सरिता इव

लेखक मायमराठी यांनी बुधवार, 14/08/2019 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
।। भाषा सरिता इव ।। भाषा नद्यांसारख्या असतात.संस्कृतीच्या अत्त्युच्च शिखरांवरून उगम पावतात. पृथ्वीच्या अंतरंगातील ज्वालामुखीच्या कणांकणांतून शुद्ध केलेली बीजं, खनिजांचा कणखरपणा, मातीतील जीवनरसांचा ओलावा, या आभाळाशी नातं जोडणाऱ्या दुर्दम्य इच्छाशक्तीची इंद्रधनुष्य फुलवंत अथक वाहत असते. दोन्ही तीरांना समृद्ध करत, साहित्याची नवनवीन बेटं तयार करत त्यांभोवती वळणं घेत घेत नवनवीन अर्थांना जन्म देत राहते. वाऱ्यावर हिंदकळणाऱ्या ऊर्मितरंगांना मनांमनांत उमटवंत आयुष्यभर साथ देते.