[शशक' २०२०] - लॉटरी
लॉटरी ...

माम्मा मिया
चिकोडी तालुक्यातल्या एकसंब्याचा पहिलवान श्रीपती खंचनाळे जेव्हा "हिंद केसरी"ची लढत दिल्लीत जिंकला तेव्हा सगळ्या चिकोडी तालुक्याला आणि कोल्हापूर-बेळगांव परिसरातल्या कुस्ती शौकिनांना ही कुस्ती बघण्यासाठी आपण दिल्लीला हजर नसल्याची चुटपूट लागलेली होती. जर तीच कुस्ती कोल्हापुरात झाली असती तर हेच सगळे कुस्ती शौकीन, गावागावांतून वर्गणी काढून, कसेही करून आपापल्या गावातून ६०-७० मैलांचा प्रवास करून खासबागेत घुसून "त्यांच्या" पहिलवानाची ही ऐतिहासिक कुस्ती प्रत्यक्ष बघण्याकरता हजर राहिले असते.
चकाकीच्या नावाखाली दमणूक
सद्या 'वर्क फ्रॉम होम' सुरू आहे. प्रवासाचे दिड तास वाचत आहेत. धूळ, प्रदूषण, रहदारी यापासून सुटका आहे. पण तरीही खूप दमायला होतं . गेल्या काही दिवसांत कोणतीच नवीन रेसिपी बनवली नाही. तरीही संध्याकाळ पर्यंत जीव मेटाकुटीला येतोय. कामवाल्या मावशी येत नाहीत. त्यामुळे दोन्ही वेळचा स्वयंपाक, ऑफिसचे काम पण हे तर मी पूर्वीही करायचे पण आता प्रवासाचा वेळ वाचूनही सायंकाळपर्यंत जीव मेटाकुटीला येतो. फरशीही मी काही रोज पुसत नाहीये पण तरीही दिवसभर घरातले काम, ऑफिसचे काम ( अगदी काटेकोरपणे त्या मिटिंग करणे, सारखे तेच तेच स्टेटस घेणे, देणे).
चिकन मोमोज
*#सोअरे_भारतीय_पाककृती_चॅलेंज*
नावात जरी चॅलेंज असलं तरी हे दुसऱ्याला भरीस पाडणारं चॅलेंज नाही, तर तुमच्यातल्याच कलेला वाव देणारं, खुलवणारं चॅलेंज.
'सोप्या अवघड रेसिपीज' या आमच्या एका वाॅट्सप कंपूवर आमच्या याडमिन बै प्राची गरूड यांच्या सुपीक डोक्यातुन कल्पना आली की येत्या रैवारी भारतिय खाद्य संस्कृतीचा जागर करावा. एकसे एक सुगरणी अन बल्लवांचा भरणा असलेल्या या कंपुतल्या प्रत्येकाला वेगववेगळी राज्य, प्रदेश बहाल करण्यात आला. माझ्या वाटेला आलं ते इशान्येचं छोटंसं सिक्किम. सुरूवात झाली ती सिक्किमची खाद्य संस्कृती धुंडाळण्यापासुन. तिथले पदार्थ शोधण्यापासुन.
होसूर: एक उनाड रविवार (उत्तरार्ध)
आधीचा धागा: होसूर: एक उनाड रविवार (पुर्वार्ध)
पुर्वसुत्रः
….. तिथून गावात जाण्यासाठी शेअररिक्षा मिळाली. त्यात बसून बाजारपेठेत पोहोचलो. आता भूकची वेळ झाली होती. एक साधं पण छानसं हॉटेल पाहून आत शिरलो ….. पुढे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हॉटेलात मेन्यूकार्ड बघून स्पेशल थाळी ऑर्डर केली.
घरात असलेलया गोष्टींपासून खायला बनवा
घरात असलेलया गोष्टींपासून खायला बनवा हि परिस्थिती सध्या असल्यामुळे आम्लेट आणि नूडल्स या तर नेहमीच्याच गोष्टी ... आज जरा "इधर का माल उधार करावा " म्हणले
"बेक्ड नुडल आम्लेट !"
साहित्य:
घरात असतील त्या भाज्या आणि काही मांसाहारी खिमा असेल तर
( मी गाजर, पातीचा कांदा आणि पर्वाची झुकिनी वापरली आणि मास म्हणून नुकत्याच केलेली ग्योझे चे तुकडे करवून परतवून घेतले, यात झिंगे / पातीचा कांदा हे सारण होते )
- आपल्या आवडीच्या झटपट नुडल वापराव्यात ..
( मी आज कोरियन पद्धतीच्या सी फूड चवीच्या नुडल वापरल्या..
मठ
ना गुणी गुणीनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी ।
गुणीच गुणरागीच विरलः सरलो जन: ॥
अर्थ- गुण नसलेल्याला गुणी माणसाची परिक्षा होत नाही, जो स्वत: गुणी आहे तो दुसर्या गुणी माणसाचा मत्सर करतो. स्वत: गुणी असुनही दुसर्याच्या गुणावर प्रेम करणारा सरळ मनाचा माणूस विरळाच असतो.
एकदा सामाजिक, मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्या कार्यकर्तीस भेटायला गेलो. बोलता बोलता स्त्रीवादाचा विषय निघाला. मी मिळून सार्या जणींच कौतुक केल. विद्या बाळ, गीताली व इतर अशा या क्षेत्रात काम करणार्या लोकांविषयी आदर व्यक्त केला. बाई मनातून खवळल्या पण मोठ्या संयमाने पण तुच्छतेने मी त्यांच्यापैकी नाही असे निक्षून सांगितले.
हैदोस [18+]
बी.डी. चाळीच्या कोपऱ्यावरची शेवटची खोली आहे तिथे वारा खूप थंडगार सुटतो. म्हणूनच मालकाने आम्हांस तीच खोली देऊ केली. आणि विशेष म्हणजे भाडेही कमी घेतले. त्यांचे आभारच मानायला हवेत. तसंही त्या बाजूला जरा अंधारच असायचा. सार्वजनिक नळावरून भल्या सकाळी घमेली आणि भगुनी पाण्याने भरून ठेवणे हाच आमचा रोज सकाळचा दिनक्रम असायचा. कारकून असलो तरी सरकारी नोकरीत असल्याने 'आराम' सदासर्वकाळ ठरलेला असायचा. मोजून दोन अडीच तास कचेरीत जाऊन खुर्ची गरम करण्याखेरीज अन्य काम नसल्याने मन विटाळून गेले होते. तसे दिवसभर चौपाटीवर भटकण्यातही मजा राहिली नव्हती.
तर त्या दिवशी भुर्जीचं पार्सल आणून खोलीवर निवांत आस्वाद घेत होतो.
धात्री
(मृत्युंजय मधल्या धात्रीच्या उल्लेखातून मला सुचलेली ही संपूर्ण काल्पनिक कथा तुमच्या समोर मांडते आहे. 'धात्री' ही महाभारतातील तसं म्हंटल तर खूप महत्वाची व्यक्तिरेखा. पण काहीशी दुर्लक्षित!)
धात्री
माझे पती अधिराज मला लग्न करून शूरसेन महाराजांच्या मथुरा नगरीमध्ये घेऊन आले त्यावेळी मी केवळ बारा-चौदा वर्षांची होते. गावाची वेस ओलांडतानाच मला माझ्या मातेने जवळ घेऊन कानात सांगितले होते;"धात्री, पुत्री, आज मी तुला तुझ्या नावाचा अर्थ सांगते.
मिसळपाव