Skip to main content

आठवणी १ - प्रस्तावना

लेखक मनस्विता यांनी सोमवार, 28/09/2020 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी म्हणजे ५-६ वर्षांपूर्वी मला आठवणीत रमणे जमायचेच नाही. असं वाटायचं की गेला तो काळ, आता काय रमायचं आहे त्यात! पण दरम्यानच्या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या. वेगात धावणाऱ्या आयुष्याला जाणीवपूर्वक एक ब्रेक लावला. आणि ह्या लॉकडाऊनने तर आयुष्य अजूनच संथ झालं. घरातले सगळेच त्यामानाने निवांत असल्याने, बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तशातच मिसळपावने गणेश लेख मालेअंतर्गत 'आठवणी' हा विषय दिला आणि मी आठवणींमध्ये कधी रमले ते कळलंच नाही. माझ्या बाबांच्या बदलीच्या नोकरीमुळे आम्हाला वेगवेगळ्या गावांत राहायला मिळाले. त्यामुळे लिहायला सुरु केलं तेव्हा आमचा तो प्रवास टिपावा असा विचार केला.

न बदलणारं 'पंगतीतलं पान'

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 28/09/2020 12:06 या दिवशी प्रकाशित केले.

आपल्या गावगाड्यात जात नावाची व्यवस्था अगदी पाचर मारल्यासारखी फिट्ट बसली आहे. कितीही हाकला म्हंटलं तर जात नाही ती जात असं तिचं वर्णन केलं जातं. आपण सगळे जण कळत नकळतपणे का होईना या जातिव्यवस्थाचे पाईक आहोत. भारताच्या कुठल्याही खेड्यात गेलं तर हे वास्तव सहजपणे दिसून येतं. शहरात थेट नसला तर वेगवेगळ्या पद्धतीने जातीभेद दिसतोच. कधी तो रहाण्याच्या बाबतीत असतो, तर कधी खाण्यापिण्याच्या बाबतीत.

हळव्यांची गळवे

लेखक उपयोजक यांनी रविवार, 27/09/2020 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
मनावर यांच्या ठसठसणारी गळवे आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. गैरसमज करुन घ्यायला हे नेहमी पुढे आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. हे इतरांना टोचतील; प्रत्युत्तरे त्यांना नको आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. हे नेहमीच बरोबर असतात; इतर लोकच चुकत आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. भावनांना डिवचलेत? आता ते सूडाच्या तयारीत आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. शब्दबाण मारलेत?
Taxonomy upgrade extras

"मित्रा"स पत्र...!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी रविवार, 27/09/2020 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
*"मित्रा"स पत्र...!!* आज *"रवि"* वार, माझा आवडता वार. रोजच्याप्रमाणे सकाळी, पक्षांच्या किलबिलाटाने लवकर जाग आली. लोळत बसण्याचा कंटाळा आहेच मला. पटकन चहा घेऊन तुझ्या आठवणीने माडीवर गेले. आजही तुझं दर्शन नशिबात दिसेना... मस्त ढगाळ हवा होती. गार वाराही सुटला होता... काय रे हे.....? किती वेळ वाट पाहू..? दोन दिवस झाले आपली भेटच होत नाहीये. नुसत्याच मनात आठवणी दाटून येत आहेत. डोळ्यासमोर येतोय तुझा तेजस्वी चेहरा.. सकाळी भेटतोस, तेव्हा नं तू अगदी नुकत्याच न्हाऊ-माखू घातलेल्या लहान बाळासारखा निरागस, लालचुटूक दिसतोस.. तेव्हा मला खूप आवडतोस.. पण आज मात्र....

एस. पी. आम्ही फक्त तुलाच नाही तर आमच्या तारुण्याला देखील गमावलं आज....

लेखक अबोलघेवडा यांनी रविवार, 27/09/2020 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलो SP ... कालच बातमी आली तू आम्हाला सोडून गेल्याची आणि खरं सांगतो तुझा चेहरा आणि आमच्या आठवणीतलं आमचं तारुण्य दोन्हीही पकडीतून निसटून गेलं बघ... बातमी वाचली तेव्हा कुठे कळलं की तू ७४ वर्षांचा होतास. हो कारण या अगोदर आम्ही तुला तुझ्या आवाजामुळे सतत तरुणच समजत होतो. आवाजाला कुठे रे असतं कधी वय? आणि तू जी हिट गाणी दिलीस ना तेव्हा आमचं तारुण्य ऐन भरात होतं त्यामुळे SP कधी म्हातारा होऊच शकत नाही अशी ठाम समजूत झाली होती आमची. मैने प्यार किया (१९८९) पासून तू जो आमच्या तारुण्यात आलास तिथपासून ते हम आपके है कौन (१९९४) पर्यंत म्हणजे आमचं सगळं कॉलेज विश्व तू बरोबर व्यापून राहिलास.

गायक S.P. बालसुब्रहमण्यम् यांचे निधन

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 25/09/2020 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीपति पंडिताराध्युला बालसुब्रहमण्यम् अर्थात एस. पी. बालसुब्रहमण्यम् यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नईत निधन झाले. सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक म्हणून सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि गायनक्षेत्रातले विविध पुरस्कार मिळवलेले , ४० हजारहून अधिक गाणी गायलेले गायक आणि अभिनेते म्हणून प्रामुख्याने ते आपल्याला माहित आहेत. हिंदी,संस्कृतसह दक्षिणेच्या चारही राज्यभाषांमधे त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेली अवीट गाणी आपल्या सर्वांना नेहमीच आनंद देत राहतील. एस.पी. बालसुब्रहमण्यम् यांच्या माझ्या आवडीच्या सिनेगीतांच्या युट्यूब लिंक्स देत आहे.

अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग 2

लेखक नयना माबदी यांनी शुक्रवार, 25/09/2020 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
22 जुन 2012 गाडीने वेग पकडला व आम्ही जम्मु कडे प्रस्थान केले. मुंबई ते जम्मु हे अंतर 1950 कि.मी आहे ते पार करण्यासाठी स्वराज एक्सप्रेस 30 तास घेते. आम्ही पहिल्यांदाच इतक्या लांबचा प्रवास करत होतो. मजा येत होती. 22 जुन चा संपूर्ण दिवस गाडीमधेच गेला. मुंबई-सुरत-रतलाम-कोटा-मथुरा-दिल्ली-अंबाला-जालंधर-पठानकोट असे करत आम्ही 23 जुन ला दुपारी 3 वाजता जम्मु ला पोहोचलो. 23 जुन 2012 काश्मीरला जातोय म्ह्टल्यावर डोळ्यासमोर येतात बर्फाच्छदीत डोंगर , खुप थंडी. आम्हाला ही असेच वाटले होते पण जम्मुला उतरताच आमची भ्रमनिराशा झाली. जुन महीना असल्याकारणाने जम्मुला खुप उकडत होते.

लघुसिद्धान्तकौमुदी

लेखक साहना यांनी शुक्रवार, 25/09/2020 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत भाषेच्या अभ्यासाच्या निमित्ताने `लघुसिद्धान्तकौमुदी` ह्या पुस्तकाची ओळख झाली. इथे ओळख ह्या शब्दाचा अर्थ अक्षरशः मी पुस्तकाचे फक्त बाह्यपृष्ठ आणि प्रथम पान पहिले असा होतो. भाषाशास्त्राची मला फार आवड आणि त्यातल्या त्यांत शब्दांचे इतिहास जाणून घ्यायची फार इच्छा. पुस्तक उघडून ते वाचण्याआधी मी आधी लघुसिद्धान्तकौमुदी ह्या शब्दाचा अर्थ जाणून घेतला. लघुसिद्धान्तकौमुदी हे पुस्तक पाणिनी महर्षींच्या अष्ठाध्यायी ह्या पुस्तकाचे एक छोटे स्वरूप आहे.

दौलतगड उर्फ दासगावचा किल्ला

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 25/09/2020 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर असलेल्या महाड तालुक्यात गांधारी नदीकाठी सातव्या शतकातील गांधारपाले या बौद्धकालीन लेणी आहेत. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे. इतिहासकाळी महाड, खेड, गोवळकोट, चिपळूण ही नामांकित बंदरे होती. अरब, रूमशान, ग्रीस इथपासूनचा माल चौल, दाभोळ आणि नालासोपारा अश्या मोठ्या बंदरात यायचा. या मोठ्या बंदरातून मग तो माल छोट्या गलबतामधून महाडसारख्या आतल्या बंदरात आणला जायचा. सावित्री नदीच्या मार्गाने महाड परिसरात मालाची आवक-जावक होत असे.