Skip to main content

शहाणी मुलगी....

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 05/11/2020 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या समोर मी नेहमीच शहाण्यासारखं वागायचं ठरवते. खूप वाटंत असतं तुझ्याकड अनिमिष नेत्रांनी पहावं.. तुझ्या कपाळावर येणारी चुकार बट, तुझे भुरभुरणारे केस, तुझ्या गालावरची खळी, बोलताना हलणारे लोभस ओठ.. पण मी अगदी शहाण्या मुलीसारखी बसते, डोळे झुकवून. झुकलेल्या नजरेला दिसतात तू कोपरापाशी अस्ताव्यस्त दुमडलेल्या बाह्या, तुझी ती लांबसडक कलाकाराची बोटं, शर्टाच्या पहिल्या उघड्या बटणातून खुणावणारी तुझी रुंद छाती. मी नजर अजूनच आवरून घेते. मग दिसतो ऐकू न येणा-या तालावर हलकेच हलणारा तुझा पाय, त्याचा तो देखणा अंगठा, मृगमुखी! मी तिथेच हरवून जाते... भानावर येते तेव्हा तू माझ्या उत्तराची वाट पहात असतोस. "अं?"

स्मरणाला मदत

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 04/11/2020 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
चांगली स्मरणशक्ती कोणाला नको असते? सर्वांनाच हवी असते. याच स्मरणशक्तीच्या विश्वाचा एक भाग आहे स्मृती सहायक.स्मृती सहायक म्हणजे जे काही आठवायचं आहे ते आठवायला मदत करणारी साधने.या साधनांपैकीच एक साधन आहे आद्याक्षरांपासून बनवलेली लघुरुपे. भरपूर मुद्दे किंवा मोठी यादी असेल तेव्हा या प्रत्येक मुद्द्यातला महत्वाचा शब्द किंवा यादीतल्या वस्तू यांची आद्याक्षरे घेऊन त्यापासून एखादा शब्द किंवा वाक्य बनवणे ही युक्ती वापरली जाते. यातले काही शब्द हे मजेदार असतात.किंबहूना ते मजेदार असल्यानेच लक्ष वेधून घेतात आणि दीर्घकाळ स्मरणात राहतात. उदा.

कोऱ्याकागदावरील भृगुसंहिता वाचन...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 04/11/2020 00:17 या दिवशी प्रकाशित केले.

भृगु संहिता वाचन...

काही कोरे ए4 साईझचे कागद हातात घेऊन वाचन केले जाते. त्याचे प्रात्यक्षिक. वाचनाचा भाग ३ सादर केला आहे. आधीच्या भागात माझ्या पूर्व जन्माचे कथन चालू होते. या भागात माझे, पत्नीचे, तिच्या वडिलांचे - केशव आणि माझ्या वडिलांचे - जनार्दन ही नावे आपसूकच आली आहेत. पंडितजींना मी पहिल्यांदा मोगा येथे भेटायला गेलो होतो. तिथे त्या दिवशी एक समारंभ आधीच आयोजित होता. नेहमी येणार्‍या ४०-५० भृगुऋषींच्या शिष्यमंडळींनी महर्षींच्या दरबार स्थानी अनेक मिठाई पाकिटे वगैरे आणली होती. मी हात हलवत गेलो होतो. म्हणून मला संकोचून जायला झाले.

बॉईल्ड अंडा भुर्जी

लेखक मुक्तचिंतक यांनी मंगळवार, 03/11/2020 04:12 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला कधीमधी मस्त तिखट, झणझणीत, spicy खाण्याची इच्छा होते. नवरात्र आत्ताच संपलेले असतं. गेले काही महिने घरचचं खाल्लेलं असत, बाहेरच चमचमीत खाण्याची इच्छा असूनही खाता येत नसतं, अश्या वेळेस काय करावं असा यक्षप्रश्न तुमच्यासमोर असतो ! अश्यातच घरात काही अंडी असतात. उकडलेली अंडी,भुर्जी, ऑम्लेट, हाफ फ्राय हे सगळं खाऊन कंटाळा आलेला असतो, काहीतरी वेगळं खायला पाहिजे, पण काय हा प्रश्न कायम असतो. मग तुम्ही you tube वर जातात, तिथे काही व्हिडिओ पाहतात. तिथेही तेच तेच असतं. मग तुम्हाला डेक्कन किंवा स्वारगेटला भुर्जीपाव च्या गाडीवर खाल्लेल्या तिखट boiled भुर्जी ची आठवण येते.

दोन अनोखे कोर्ट मार्शल

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 02/11/2020 18:22 या दिवशी प्रकाशित केले.

दोन अनोखे कोर्ट मार्शल

एअरफोर्समध्ये कोर्टमार्शल होणं हे एक अतिशय लज्जास्पद प्रकार म्हणून मानला जातो. पूर्वीच्या काळी आर्मीमध्ये विशेषतः कॅशिरिंग अशी एक पनिशमेंट होती. कॅशिरिंग म्हणजे अक्च्युअली तुम्ही फिल्डमध्ये ऐनवेळी साहस दाखवायला कचरता किंवा तुमची ब्रेव्हरी किंवा तुमचा काय तो धाडसीपणा दाखवत नाही किंवा काही काही वेळेला अतिधाडसीपणा करून दाखवता की जो त्या कामाकरता उपयोगी नाही. अशा वेळेला त्या व्यक्तीला कॅशियर्ड केलं जातं. त्याच्या अंगावरची रँक बॅजेस काढून त्याला ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिलं जातं आणि त्याचं पेन्शन वगैरे तेही बंद होते.

प्रतिमा जपायची आहे

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/11/2020 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे साहित्यिक, कलावंत वा संवेदनाशील व्यक्‍तींना ‍जीवनात हटके अनुभव घ्यायला आवडतात. पण असे अनुभव घेतांना काही चटके बसणंही अपरिहार्य असतं. हे चटके सोसण्याची ताकद प्रत्येकात असतेच असं नाही. उलट परिणाम उद्‍भवले की व्यक्‍ती गांगरून भीतीने थरथरते. आपण ज्या सामाजिक चौकटीत वावरतो त्या जनमानसात आपल्या प्रतिमेला तडा जाऊ नये असं वाटणं स्वाभाविक आहे. आपल्या मूळ स्वरूपाहून केवळ आपली प्रतिमा उत्कट करण्याच्या अट्टहासामुळे, माणूस हटके अनुभव घेण्यासाठी आपणहून साहस करत नाही. पचेल, परवडेल, समाजात चुकीचा संदेश जाणार नाही असा मोजून मापून आपण अनुभव घेतो. परिणाम उलटा होताच हादरून जातो.

सत्यमेव जयते.

लेखक Jayant Naik यांनी रविवार, 01/11/2020 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यमेव जयते. प्राध्यापक जगदीश कदमांना एकदम दचकून जाग आली . कोणी तरी त्यांचे पाय हलवत होते .. “ ओ ..साहेब .. जरा उठा ..आम्हाला जरा बसायला जागा द्या…” एक क्षण भर त्यांना आपण कुठे आहोत हेच आठवेना ..मग हळू हळू त्यांच्या मेंदूवरचा झोपेचा पडदा अलगद सरकला ,आणि त्यांना आठवले कि आपण कोल्हापूरला जाणाऱ्या एक्सप्रेस मध्ये आहोत आणि कुणी तरी आपल्याला अगदी माजोर पणे उठवत आहे. त्यांनी नीट डोळे उघडून पाहिले . मग उशाशी असलेला चष्मा आपल्या डोळ्यांना लावला. त्यांना आता नीट दिसले तीन चार जण ते झोपले होते त्या बर्थ पाशी उभे होते.

मिसळ पाव मिसळ पाव

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 01/11/2020 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ पाव मिसळ पाव खा रे खा मिसळ पाव मिसळ पाव मटकीची उसळ तिची करा मिसळ उसळीत घातला शेव कांदा त्यात पिळला लिंबू अर्धा रस्सा टाका त्यात चांगला पावाबरोबर खाऊन टाका मिसळ पाव मिसळ पाव झणझणीत तर्री अर्धी वाटी ओता त्यात होईल खाशी नाकातोंडातून येईल धुर मग दह्याने बदला नूर असली मिसळ अन दहा पाव खाऊन तर पहा राव मिसळ पाव मिसळ पाव एकदाच खा अन ढेकर द्या उगाच नंतर जेवायचे काम नाय नको ते इडली सांबर पुन्हा घ्याल का पराठे नंतर? मिसळीत आहे सारे गुण एकदा खाल तर व्हाल टुन्न हातावरचे अन पोटावरचे एकच झाले मिसळीवरचे केवळ नाव तुम्ही घ्याल मिसळ खाल मिसळ खाल मिसळ पाव मिसळ पाव - पाषाणभेद ०१/११/२०२०
काव्यरस

हसरतों का ज़नाज़ा..!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शनिवार, 31/10/2020 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
हसरतों का ज़नाज़ा...! लुटा रही थी खुशियाँ, मैं तो सारे जहाँ में, सौगात कोई गम की, मुझें भीख दे गया । हसरतों का मेरी, ज़नाज़ा निकल गया.. दिल की मुराद लिखने, बैठी थी नाजुक कलम से, बेवफ़ाई की स्याही, कोई उनपे गिरा गया । हसरतों का मेरी, ज़नाज़ा निकल गया.. लिखे थे मैंने इम्तेहाँ, बड़े लगनों-इमान से, सफ़ल उन्हीं में मगर, कोई गैर हो गया । हसरतों का मेरी, ज़नाज़ा निकल गया.. जुड़ी थी साँसे जिनसे, मेरी ही जिंदगी की, चुराके मुझसे उनको, कोई मौत दे गया । हसरतों का मेरी, ज़नाज़ा निकल गया.. मुझे मुहब्बत थी जिनसे, जाँ से भी ज्यादा, वो शख्स भी तो मुझसे, रुठकर चला गया । हसरतों का मेरी, ज़नाज़ा निकल गया.. मिलने से

चमन के फुल

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शनिवार, 31/10/2020 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
अति मधुर मधुर..    -गाणी ऐकायची सवय  फार जुनी । एकोणीसशेसाठ ते सत्तर,चे दशकाच्या आसपासचा,पन्नास।साठ वर्षापूर्वी चा काळ । ।हा काळ ,हिंदी चित्रपटांचा सांगितिक सुवर्णयुग मानले जाते। त्या काळातअनेकसंगीतकार ,गायक, गायिका  ,गीतकार यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने , गीत संगीताचे जे  अक्षर,अतुट.अतुलनीय,रेशमी ,मधुर ,मायाजाल विणले आहे, त्याच्या बंधनामध्ये अजुनहीसंगीत प्रेमी गुंतलेले ,आहेत।बाहेर यायला तयार नाहीत।   आपल्या आयुष्यातले अनेक  क्षण , त्या  अविस्मरणीय गाण्यांनी भारुन टाकलेे सुख दु:खाच्या प्रसंगात सोबत केली । त्या सुवर्णकाळातील अनेक संगीत कार  आपल्य