Skip to main content

भावातीत अवस्था - कोडींग करताना

लेखक वगिश यांनी रविवार, 29/11/2020 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावर बरेच धागे विदेहत्व आणि भावातीत अवस्था यांची चर्चा करत आहे. लेख लिहायचे प्रयोजन म्हणजे आम्हालाही भावातीत अवस्था गाठण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे .परंतु ते बोटात बोटे घालून बसण्याइतके सोपे नाही किंवा कुठल्याही नशेत तंद्री लागण्याइतका सरळ हि नाही . हि अवस्था गाठण्यासाठी १०-१५ वर्षांची तापशर्या आहे . संगणक विज्ञान आणि अणुविद्युत तंत्रज्ञान शिकण्यासाठी अतीव मेहनत घेतली आहे .अनेक गुरु व ग्रंथ यांचे आमच्या तपात मोलाचे योगदान आहे. हि अवस्था गाठण्यासाठी आम्हला कुठल्याही एकांताची वा विशिष्ट जागेची गरज नाही, गरज आहे ती फक्त एका ट्रिगर ( प्रेरणा ?) ची. हा ट्रिगर आम्हाला अनेक रूपाने मिळतो.

लेख

लेखक VRINDA MOGHE यांनी रविवार, 29/11/2020 12:55 या दिवशी प्रकाशित केले.

'अरूणाचल पंचरत्नम' (भावानुवाद)

लेखक मूकवाचक यांनी रविवार, 29/11/2020 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
दि. २९/११/२०२० (कार्तिक पौर्णिमा) प्रस्तावना: भगवान रमण महर्षींचा आश्रम पंचमहाभूतांपैकी अग्निचे स्वरूप, तसेच साक्षात शिवस्वरूप मानल्या गेलेल्या अरूणाचल पर्वताच्या पायथ्याशी आहे हे आता तसे सर्वज्ञात आहे. दर वर्षी तमिळ पंचागाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला अरूणाचलाच्या शिखरावर दीप महोत्सव असतो.
काव्यरस

वृक्षासिनी

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 29/11/2020 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
एमपीएसीच्या क्लासच्या बाहेरच्या आवारात तरुण मुला-मुलीचा घोळका नेहमीसारखाच. दुपारचे तीन वाजायला दहा मिनिटं होती, सतिश आणि बाकी जण तिथं कधीचेच येऊन तिथल्या घोळक्यात सामील होत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते, बरोबर तीनच्या ठोक्याला चालू बॅच संपून यांना आत प्रवेश मिळणार होता, त्याला आता या येणा-या खेपेला काही करुन एमपीएसी पास होत सरकारी नोकरी पक्की करायची होती, अगोदरचे दोन प्रयत्न काहीश्या गुणांमुळे हुकले होते, त्यामुळे यावेळी निर्धार पक्का होता.

सात वेळा मेलेला माणूस "The Dead Man"

लेखक rushikapse165 यांनी शनिवार, 28/11/2020 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ.खेळ म्हणजे खेळच.मग तो कुठलाही असो.आजकाल एक नवा ट्रेंड चाललाय,काय तर,90'Kids.तसा मी काही नव्वदच्या दशकातील नाही.आणि नसलो तरी मी काही दुर्देवीही नाही,कारण माझा जन्म तो २००० सालचा,त्यामुळे संगत होती ती नव्वदच्याच दशकाची. तो काळही तसाच होता.T.V.नावाचा प्रकार तितकासा सगळ्यांकडे नसायचा.त्यात त्यावेळच्या रामानंद सागरांच्या रामायण आणि श्रीकृष्ण या मालिकांनी अगदी दशक उलटल्यानंतरही आपलं वर्चस्व प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं होतं,आणि त्यामुळे ज्याघरी T.V.त्याघरी संध्याकाळी गर्दी हे ठरलेलं.आणि दुसरं काय तर?क्रिकेट,त्यावेळी क्रिकेट म्हणलं की सचिन अाणि सचिन म्हणलं की क्रिकेट,एवढंच गणित.आणि आमच

डोक्याला शॉट [ (पेट्रोल) पंचमी ]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 28/11/2020 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
हेल्लो फूल्स... आवाक झालात ना ? मी आज नमस्कार चमत्कार करायचा सोडून तुम्हाला डायरेक्ट हेल्लो फूल्स... म्हणतोय म्हणून... येस...आय न्यू धिस! मला हे आधीच माहित होतं की मी असं बोलल्यावर तुमच्या थोबाडावर असेच बावळट भाव येतील म्हणून... कसं ते विचारा... लाजतांय काय असे विचारायला?

बारमास - हायकू

लेखक मी-दिपाली यांनी शुक्रवार, 27/11/2020 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
लाॅकडाउनमध्ये लागलेल्या छंदाने आता थोडं बाळसं धरलंय म्हणायला हरकत नाही. काही लेख आणि थोड्याफार कविता एवढी मोजकीच शिदोरी गाठीशी असताना असं म्हणणं धाडसाचंच आहे, पण मूळ मुद्दा हा की नाविन्याची ओढ बऱ्याचदा स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे काव्याचे वेगवेगळे प्रकार करून पाहावेसे वाटले. (नाही, मी बाळबोध, बऱ्या, थोड्या अधिक बऱ्या कवितांबद्दल नाही सांगत, तशाही त्या आपसूकच झाल्या असतील.) अभंग, अष्टाक्षरी, षडाक्षरी, मुक्तछंदातील कविता, सवालजवाब, अगदी गझलेचंही तंत्र शिकून त्याही रचून झाल्या. निसर्ग, प्रेम, विरह, जीवनविषय, सामाजिक आशयही यासारखे विविध विषयही हाताळून झाले.

गोव्याचा इतिहास- शिवकाल

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 27/11/2020 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापुर्वी मिसळपाव.कॉमवर गोव्याचा इतिहासाची सविस्तर माहिती देणारी नितांत सुंदर मालिका टिम गोवा या आय.डी.ने लिहीली होती.त्याच्या सर्व भागांची एकत्रित लिंक खाली दिलेली आहे. आमचें गोंय - समारोप - आजचा गोवा या मालिकेत भाग ५ मध्ये शिवकाल आणि मराठेशाहीविषयी माहिती लिहीली आहे.त्याची लिंक खाली दिलेली आहे. आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही मात्र हि माहिती पुरेशी सविस्तर नसल्याने या कालखंडातील इतिहासावर

कोंढवी ( kondhavi )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 27/11/2020 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
जावळी परिसरातील किल्ले या मालिकेतील हा अखेरचा धागा. पोलदपूरहून खेड - चिपळूणकडे जातांना कशेडी हा प्राचिन घाटमार्ग लागतो. या घाटातून गोवा, रत्नागिरीकडे जाणार्‍या गाड्या रात्रंदिवस धावत असतात.पण या वर्दळीवर एक प्राचीन गड नजर रोखून बसला आहे, हे कोणाच्या गावीही नसते. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या पोलादपुर तालुक्यात कशेडी घाटमार्गात पुर्वबाजुला असलेल्या डोंगराच्या कुशीत कोंढवी हे प्राचिन गाव वसले आहे. गावात दिसणाऱ्या सतीशिळा,विरगळ,कोरीव मुर्त्या तसेच मंदिराचे कोरीव स्तंभ या गावाचे प्राचीनत्व अधोरेखीत करतात.