सामान्य माणूस....
सामान्य माणूस...
वर्गात लोकं म्हणती स्कॉलर,
जपतो आमची स्वच्छ कॉलर,
सहसा नशिबी नसतात डॉलर,
खिशात फक्त ओंजळभर चिल्लर...
रांगोळीत आमच्या सजते,
आकांक्षांची नक्षी,
स्वप्नांच्या झाडावर रोज,
नव्या इच्छांचे पक्षी...
मनातल्या नकाशावर,
आयुष्याची रूपरेखा,
वाळूत काढतो रेषा,
ते आम्ही पांढरपेशा...
सुख दुःखाच्या प्रसंगी,
आम्हा सोडत नाही चिंता,
डोळ्यासमोर सतत फिरतो,
महागाईचा वरवंटा..
कोणतीही असो दशा,
आम्ही सोडत नाही दिशा,
कर्तृत्वाला झळाळी देते,
आमच्या मनातली आशा..
गरजा कंठशोष करून सांगतात,
तू क्षणभर नको थांबूस,
छातीवरलं बिरुद अभिमानाने मिरवतो,
"मी सामान्य माणूस"....!
जयगंधा...
१०-१२-२०२०.
मिसळपाव
समापन
या पुस्तकात आग्र्याहून सुटकेच्या नव्या प्रमेयाशिवाय अशी बरीच माहिती संग्रहित केलेली आहे, जी इतिहासाच्या चाहत्यांना वाचायला व मनन करायला आवडेल. त्यांची ओझरती ओळख करून ह्या ग्रंथाचा परिचय आवरता घेतो.
लेखक इतिहास शब्दाची व्याख्या,(पान ९) इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी मांडलेली इतिहास अभ्यासकांसाठी थोडक्यात खालील मार्गदर्शक तत्वे सादर करून आपलाही दृष्टीकोन सांगतो.
१. कोणताही पुर्वाग्रह नको.
२. अस्सल माहिती मिळवल्याशिवाय लेखन हाती घेऊ नये.
३.
लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन, पुणे. मो . क्र. ९९२२४३१६०९
शिवाजी महाराज कसे निसटले ?
नव्या प्रमेयाप्रमाणे नजरकैदेतून सुटकेच्या दृष्टीने जून १६६६च्या अखेरीपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवून आणण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले होते.
१. राजांनी स्वतःच्या माणसांना परत जाण्याची परवानगी देऊन दूर केले होते. परवान्याअभावी राजांची ही माणसे रामसिंहाच्या डेऱ्याजवळ राहात होती.
२. रामसिंहाने दिलेला शिवाजी महाराजांबद्दलचा ‘जामीनकतबा’ औरंगजेबाने रद्द केला होता.
वरील चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरती सारख्या ठिसूळ व नरम मिठायांना ६० -७० किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल.