Skip to main content

आठवण सुद्धा...

लेखक मी अश्विनी यांनी शनिवार, 12/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.

घेता घेता नशा चढेल

देता देता प्रेम वाढेल

बोलता बोलता शब्दच संपेल

बघता बघता नजर अडकेल

भेटता भेटता मनच गुंतेल

निघता निघता पाऊल थबकेल

चालता चालता वाटच संपेल

पाहता पाहता नजर पाणावेल

घेता घेता श्वासही थांबेल

वळून बघता वाटेल, इथं सारंच संपेल

या निरगाठी तोडता ह्रदय नक्की तुटेल

सारंच संपताना नंतर आठवण सुद्धा रडेल..!
--- मी अश्विनी

Taxonomy upgrade extras

एक ऐकशील?

लेखक मी अश्विनी यांनी शनिवार, 12/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तू येशील आणिक जाशील
काही देशील ,काही घेशील
पहाटेच्या साखरस्वप्नांना
गुलाबी बनवून जाशील!

भरती-ओहोटीचा खेळ होईल
किनारा परत एकटा राहील
तेव्हा जपलेल्या खुणांना
सांग नातं कधी देशील?

अर्थ, संदर्भ गोठून जातील
जेव्हा तुझे शब्द ऐकू येतील
पण एकटं असताना
तेच तर माझी साथ देतील!

मग अशीच तू वेळ ठरवशील
भेटण्यासाठी इथं येशील
घड्याळातल्या काट्यांना
सांग तेव्हा तू कसं बांधशील?

वेळ संपली, आता तू निघशील
पण आता एक करशील?
पुन्हा आपण भेटताना
निदान ह्या नात्याचं नाव सांगशील?
--- मी अश्विनी
Taxonomy upgrade extras

नको मारू खडा रे सख्या

लेखक फटू यांनी शनिवार, 12/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
(1993 च्या आसपास कधीतरी आलेल्या दलाल या मिथुन चक्रवर्ती अभिनीत टुकार हिंदी चित्रपटातील "ठेहरे हुए पानीमें" या भावस्पर्शी गीताचा स्वैर मराठी अनुवाद...) नको मारू खडा रे सख्या संथ निवांत या पाण्यावर उमटतील रे तरंग त्याचे माझ्या स्तब्ध या मनावर तुझ्यासाठी अनोळखी मी अन् तुही तसा परका मला कसं जाणल तू दु:ख माझं घाव जगापासून लपलेला सा~यानाच वेड असतं रे फुलांचं कुणी प्रेम करत नाही काट्यांवर मीही अशीच एक अभागी काटा नसू दे रे त्याची सावट तुझ्यावर तूच सांग रे सख्या मला आता कसा घ्यायचा स्वप्नांचा झोका अपुर्‍या राहतील इच्छा मनीच्या चालत नसते कधी वाळूत नौका नको मारू खडा रे सख्या संथ निवांत या पाण्याव

महात्म्याला आदरांजली.

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 11/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
Jyotiba Fule
आज भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि आद्य महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे समाजसुधारक श्री ज्योतीबा फुले यांची जयंती. त्यांना शतशः नमन. महाराष्ट्रात जेव्हा वाईट रूढींचा बोलबाला होता आणि सामाजिक कुरितींनी कळस गाठला होता तेव्हा त्या अंधारातून ज्योतीबांनीच महाराष्ट्राला व त्यायोगे संपूर्ण देशाला नवी दिशा दिली. त्याकाळात त्यांनी सुरू केलेल्या अनेक कार्यांपैकी एकेक कार्य करीत पुढे लोक मोठे बनत गेले.

ढोकळा

लेखक चकली यांनी शुक्रवार, 11/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, याप्रकारे ढोकळा मस्त होतो.
Taxonomy upgrade extras

थोडे असे, थोडे तसे

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 11/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार." खरोखरच चांगला विचार. तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला, एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा ;)) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या.

बंगळूरवासी मिपाकर...

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 11/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बंगळुरात कुणी मिपाकर आहे काय? पुढील आठवड्यात मंगळवार ते गुरुवार बंगळूरात आहे, जमल्यास गाठ भेट होईल.

भारत एक खोज

लेखक परीचा परा यांनी शुक्रवार, 11/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
भरपूर वर्षांपूर्वी भारत एक खोज ही मालिका नेमाने पहायचो. तेव्हाचे ते टायटल चे मंत्र जाम आवडायचे आम्हाला. मायाजालावर आम्हाला ते मिळाले ...

काही आठवत नाही

लेखक शितल यांनी शुक्रवार, 11/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता मी ११ वीत असताना वाचली होती एक तारका हवी होती आकाश सजविण्यासाठी एक स्पर्श हवा होता धु॑द क्षण जगण्यासाठी एक तुच हवी होतीस मला साथ देण्यासाठी

नचिकेताचे उपाख्यान कोणी सांगेल का?

लेखक सागर यांनी शुक्रवार, 11/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नचिकेताचे उपाख्यान कोणाला माहीत आहे काय? असेल तर कृपया सांगावे ही विनंती. एखादा यावर लेख कोणी लिहिला तर आनंदच वाटेल. एकदा दान देताना नचिकेताच्या पित्याने नचिकेताला रागात सांगितले की मी तुला यमाला दान केले आहे. त्यानंतर नचिकेत आणि यम यांचा संवाद ते नचिकेताचे उपाख्यान. यात यमलोकाचे वर्णन नचिकेताने केलेले आहे. मला नचिकेताची अशी फक्त ढोबळ अशी गोष्ट माहित आहे. पण मला सविस्तर जाणून घ्यायचे आहे. कोणी सांगेल का? (वेदोपनिषदप्रेमी) सागर